शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
4
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
5
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
6
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
7
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
8
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
9
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
10
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
11
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
12
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
13
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
14
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
15
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
16
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
17
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
18
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
20
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?

आहेरांना आहेर...!

By किरण अग्रवाल | Published: June 17, 2018 1:29 AM

लोकांसाठी म्हणून काम करताना प्रत्येकच बाबतीत फायदा-तोटा बघायचा नसतो. अनेक संस्था पदरमोड करीत काम करतात, कारण घेण्यापेक्षा काही देण्याची त्यांची भूमिका असते. अशा भूमिकेपासून जे दूर होऊ पाहतात त्यांना स्वाभाविकच लोकांच्या रोषाला सामोरे जाण्याची वेळ येते. नाशिक जिल्हा सहकारी बँकेनेही तशी वेळ ओढवून घेतली होती; परंतु बरे झाले संचालकांना उपरती सुचली आणि होऊ घातलेली नामुष्की टळली.

ठळक मुद्दे सहकारातील विश्वासाचे वातावरणच डळमळीत बँकेची काही ना काही कारणाने नादारी सुरूच

सहकार क्षेत्राने ग्रामीण विकासाला हातभार लावतानाच नेतृत्वाच्या नवीन पिढीला पुढे आणण्यात मोठी भूमिका निभावलेली असली तरी, गेल्या काही वर्षांपासून या क्षेत्राला घरघर लागली आहे. पतसंस्था, विविध कार्यकारी सोसायट्या, साखर कारखाने व सहकारी तत्त्वावरील बँकाही गोत्यात आल्याने एकूणच सहकारातील विश्वासाचे वातावरणच डळमळीत झाले. अशातच केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्याने मध्यंतरी सहकारी बँकिंगचेही कंबरडे मोडले, नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकही त्याला अपवाद ठरू शकली नाही. अर्थात, तशीही या बँकेची काही ना काही कारणाने नादारी सुरूच होती. कधी कर्जमाफीच्या निर्णयामुळे तर कधी कर्जवसुली रखडल्याने त्यात भरच पडत गेली. अशात बँकेला नफ्यात आणण्याचे पर्यायी मार्ग शोधण्याऐवजी काटकसरीचा मार्ग म्हणून जिल्ह्यातील तब्बल सुमारे दोन डझन शाखांना कुलूप ठोकून त्या नजीकच्या शाखांमध्ये विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला गेला होता. खरे तर, जिल्हा बँकेच्या या शाखा म्हणजे ग्रामीण भागातील त्या-त्या ठिकाणच्या अर्थवाहिन्याच आहेत. कदाचित या शाखांमधून अपेक्षेएवढा ‘व्यवहार’ होत नसेलही; परंतु म्हणून त्यांचे विलीनीकरण करणे अनेकार्थाने अडचणींना निमंत्रण देणारे होते. यातून एकतर सभासदांची गैरसोय झाली असतीच; पण संबंधित शाखेतील कर्मचाऱ्यांच्या सेवेचाही प्रश्न उपस्थित होणारा होता. बरे, जिल्हा बँकेतील हे कर्मचारी म्हणजे कुणा ना कुणा, आजी-माजी संचालकांच्या मर्जीतले असण्याबाबत शंका बाळगता येऊ नये. त्यामुळे त्यांना दुसरीकडे सामावून घेताना कसोटीच लागली असती. परंतु निर्णय घेतला गेल्यावर व तो अंगाशी येण्याची चिन्हे दिसू लागल्याने अखेर रद्द केला गेला. एका अर्थाने, ‘देर आये दुरुस्त आये’ म्हणूनच त्याकडे पाहता यावे. आता म्हणे, या संबंधित शाखांचे उत्पन्न वाढवून त्या नफ्यात आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. म्हणजे, विलीनीकरणाऐवजी सक्षमीकरणाचा अगर मजबुतीकरणाचा प्रवास घडून येणार आहे. असा विचार या शाखा विलीन करण्यापूर्वी केला असता तर किती बरे झाले असते ! पण, असो. चेअरमन केदा आहेर यांची सुसाट निघालेली गाडी कुठे तरी ठेचकाळून का होईना, मार्गाला लागली म्हणायचे. गेल्या विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठीच्या निवडणुकीप्रसंगीही या आहेर यांना असाच घरचा आहेर लाभून गेला होता. बँकेच्या संबंधातून ते ज्या उमेदवाराच्या पाठीशी राहिले त्यानेच ऐनवेळी मैदान सोडले, कारण पक्षाची साथ त्यांना लाभली नाही. म्हणजे तो ‘आहेर’ त्यांच्या पक्षानेच त्यांना दिला. आता बँकेत निर्णय बदलाचा आहेर स्वीकारण्याची वेळ आली. तेव्हा, ‘अति घाई संकटात नेई’ हेच त्यांनी लक्षात घेतलेले बरे !

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्र