शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

धक्कादायक! राज्यात रस्ते अपघातात 4 महिन्यांत 5 हजार नागरिकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 12:44 IST

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली ...

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली तयार केली असली, तरी अनेक वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याने अपघात घडतात. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृतीवर भर दिला जातो. मात्र, असे असतानाही राज्यात चालू वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात १९ हजार ३८३ अपघात घडले आहेत. या अपघातात नऊ हजार १२० नागरिक जखमी झाले, तर ५ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात झालेल्या अपघातात एकूण अपघाताचे सर्वाधिक प्रमाण मुंबई शहरात असल्याचे स्पष्ट झाले. तर अपघातात बळी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले असून ५२ अपघातांत १७ नागरिकांनी जीव गमावला आहे. जानेवारी ते एप्रिल चार महिन्यांच्या कालावधीत एकट्या मुंबई शहरात तब्बल ८७६८ अपघात झाले. या अपघातात ५९७ नागरिक जखमी झाले असून १२९ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी ८२८ अपघातांत सुमारे ६४७ नागरिक जखमी होऊन १६४ नागरिकांचा जीव गेला होता. गतवर्षी २०२१ मध्ये सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले होते.

२०२२ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्यात झालेल्या एकूण अपघातांत मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. अपघातात नाशिक ग्रामीण चौथ्या क्रमांकावर असून जीव गेलेल्यांची संख्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे. चार महिन्यांत बळी जाणाऱ्यांची संख्या ४०७ असून अपघातात नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक ३४२ आणि नाशिक शहरात ६५ नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी होणाऱ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक असून त्याखालोखाल नागपूरचा क्रमांक लागतो. नाशिकचा तिसरा क्रमांक आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत झालेल्या अपघातांत बळी जाणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्याची आहे. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो.

नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

वाहन चालविताना वाहन चालक अति वेगाने धोकादायक पद्धतीने वाहने चालवितात. त्यावेळी स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात आणि त्यातून अपघात घडतात. वाहन चालकांनी हेल्मेट तसेच सीटबेल्टचा वापर करणे, वाहन वेग मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविले, तर अपघातावर नियंत्रण बसेल.

-प्रदीप शिंदे, (प्रभारी) प्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र