शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
2
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
3
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
4
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
5
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
6
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
7
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
8
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
9
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
10
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
11
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
12
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
13
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
14
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
15
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
16
VHT 2025-26 : पांड्याचं 'तांडव'! वनडेत ठोकली टी-२० स्टाईल सेंच्युरी; संघाने जिंकली ४०० पारची लढाई
17
Hello 2026! न्यूझीलंडमध्ये नववर्षाचे जंगी स्वागत; ऑकलंडच्या स्काय टॉवरवर फटाक्यांची आतषबाजी
18
साबणापासून फेस पॅकपर्यंत... गाढविणीच्या दुधामुळे पालटलं नशीब, आता करतेय लाखोंची कमाई
19
गुंतवणूकदारांची 'चांदी'! वर्षाच्या शेवटच्या दिवशी ४ लाख कोटींची कमाई; मेटल आणि रिलायन्स शेअर्समध्ये धूम
20
"भाजपाला मदत व्हावी म्हणून अंबादास दानवेंनी निवडून येणाऱ्या महिलांचे तिकीट कापले", ठाकरेंच्या दोन नेत्यांमध्ये वाजले!
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! राज्यात रस्ते अपघातात 4 महिन्यांत 5 हजार नागरिकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 12:44 IST

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली ...

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली तयार केली असली, तरी अनेक वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याने अपघात घडतात. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृतीवर भर दिला जातो. मात्र, असे असतानाही राज्यात चालू वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात १९ हजार ३८३ अपघात घडले आहेत. या अपघातात नऊ हजार १२० नागरिक जखमी झाले, तर ५ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात झालेल्या अपघातात एकूण अपघाताचे सर्वाधिक प्रमाण मुंबई शहरात असल्याचे स्पष्ट झाले. तर अपघातात बळी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले असून ५२ अपघातांत १७ नागरिकांनी जीव गमावला आहे. जानेवारी ते एप्रिल चार महिन्यांच्या कालावधीत एकट्या मुंबई शहरात तब्बल ८७६८ अपघात झाले. या अपघातात ५९७ नागरिक जखमी झाले असून १२९ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी ८२८ अपघातांत सुमारे ६४७ नागरिक जखमी होऊन १६४ नागरिकांचा जीव गेला होता. गतवर्षी २०२१ मध्ये सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले होते.

२०२२ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्यात झालेल्या एकूण अपघातांत मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. अपघातात नाशिक ग्रामीण चौथ्या क्रमांकावर असून जीव गेलेल्यांची संख्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे. चार महिन्यांत बळी जाणाऱ्यांची संख्या ४०७ असून अपघातात नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक ३४२ आणि नाशिक शहरात ६५ नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी होणाऱ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक असून त्याखालोखाल नागपूरचा क्रमांक लागतो. नाशिकचा तिसरा क्रमांक आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत झालेल्या अपघातांत बळी जाणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्याची आहे. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो.

नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

वाहन चालविताना वाहन चालक अति वेगाने धोकादायक पद्धतीने वाहने चालवितात. त्यावेळी स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात आणि त्यातून अपघात घडतात. वाहन चालकांनी हेल्मेट तसेच सीटबेल्टचा वापर करणे, वाहन वेग मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविले, तर अपघातावर नियंत्रण बसेल.

-प्रदीप शिंदे, (प्रभारी) प्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र