शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! राज्यात रस्ते अपघातात 4 महिन्यांत 5 हजार नागरिकांचा बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 12:44 IST

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली ...

पंचवटी : दुचाकी किंवा चारचाकी वाहने चालविताना होणाऱ्या अपघातावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रादेशिक परिवहन विभाग, शहर वाहतूक शाखेमार्फत वाहतूक नियमावली तयार केली असली, तरी अनेक वाहनधारक वाहतूक नियमांचे पालन करीत नसल्याने अपघात घडतात. अपघाताचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन विभागाकडून वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृतीवर भर दिला जातो. मात्र, असे असतानाही राज्यात चालू वर्षी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या काळात १९ हजार ३८३ अपघात घडले आहेत. या अपघातात नऊ हजार १२० नागरिक जखमी झाले, तर ५ हजार ३३३ जणांचा मृत्यू झाला आहे.

राज्यात झालेल्या अपघातात एकूण अपघाताचे सर्वाधिक प्रमाण मुंबई शहरात असल्याचे स्पष्ट झाले. तर अपघातात बळी पडणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले असून ५२ अपघातांत १७ नागरिकांनी जीव गमावला आहे. जानेवारी ते एप्रिल चार महिन्यांच्या कालावधीत एकट्या मुंबई शहरात तब्बल ८७६८ अपघात झाले. या अपघातात ५९७ नागरिक जखमी झाले असून १२९ नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. गेल्या वर्षी ८२८ अपघातांत सुमारे ६४७ नागरिक जखमी होऊन १६४ नागरिकांचा जीव गेला होता. गतवर्षी २०२१ मध्ये सर्वांत कमी अपघात सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाले होते.

२०२२ मध्ये जानेवारी ते एप्रिल महिन्यात झालेल्या एकूण अपघातांत मुंबईचा प्रथम क्रमांक लागतो. त्यापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्याचा समावेश आहे. अपघातात नाशिक ग्रामीण चौथ्या क्रमांकावर असून जीव गेलेल्यांची संख्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक आहे. चार महिन्यांत बळी जाणाऱ्यांची संख्या ४०७ असून अपघातात नाशिक ग्रामीणमध्ये सर्वाधिक ३४२ आणि नाशिक शहरात ६५ नागरिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अपघातात जखमी होणाऱ्यांची संख्या मुंबईत सर्वाधिक असून त्याखालोखाल नागपूरचा क्रमांक लागतो. नाशिकचा तिसरा क्रमांक आहे. जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांत झालेल्या अपघातांत बळी जाणाऱ्यांची सर्वाधिक संख्या नाशिक जिल्ह्याची आहे. त्याखालोखाल पुण्याचा क्रमांक लागतो.

नियमांचे काटेकोर पालन गरजेचे

वाहन चालविताना वाहन चालक अति वेगाने धोकादायक पद्धतीने वाहने चालवितात. त्यावेळी स्वतःचा व इतरांचा जीव धोक्यात घालतात आणि त्यातून अपघात घडतात. वाहन चालकांनी हेल्मेट तसेच सीटबेल्टचा वापर करणे, वाहन वेग मर्यादित ठेवणे गरजेचे आहे. वाहनधारकांनी वाहतूक नियमांचे पालन करून सुरक्षित वाहन चालविले, तर अपघातावर नियंत्रण बसेल.

-प्रदीप शिंदे, (प्रभारी) प्रादेशिक परिवहन अधिकारी

 

टॅग्स :AccidentअपघातMumbaiमुंबईNashikनाशिकMaharashtraमहाराष्ट्र