शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

नाशिक जिल्ह्यातील धरणांमध्ये ४५ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 6:49 PM

यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्याने जिल्ह्यात ८३ टक्केच पाऊस नोंदविला गेला, त्यातही ठराविक वेळेत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणाची क्षमता पाहून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धरणे भरू शकली नाहीत.

ठळक मुद्देउन्हाची तीव्रता : गंगापूर समूहात ६८ टक्के पाणीजिल्ह्यात आजच सुमारे साडेतीनशे गावे, वाड्यांना पाणीटंचाई

नाशिक : जिल्ह्यात थंडीची लाट ओसरून उन्हाची तीव्रता वाढू लागताच, धरणातील जलसाठ्यांमध्ये कमालीची पातळी खालावली असून, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात जेमतेम ४५ टक्के पाणी शिल्लक राहिले आहे. यंदा उन्हाळा कडक असणार असल्याचा हवामान खात्याने यापूर्वीच अंदाज वर्तविल्याने शिल्लक असलेला जलसाठा तब्बल सहा महिने पुरविण्याचे मोठे आव्हान प्रशासनापुढे उभे ठाकले आहे. दुसरीकडे जिल्ह्यात आजच सुमारे साडेतीनशे गावे, वाड्यांना पाणीटंचाई भेडसावू लागल्याने १११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.यंदा पावसाने वक्रदृष्टी केल्याने जिल्ह्यात ८३ टक्केच पाऊस नोंदविला गेला, त्यातही ठराविक वेळेत पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे धरणाची क्षमता पाहून मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. त्यानंतर मात्र पावसाने दडी मारली. परतीच्या पावसानेही पाठ फिरविल्याने धरणे भरू शकली नाहीत. आॅक्टोबर अखेर ७३ टक्केच पाणी धरणांमध्ये साठले, हे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत जवळपास ३७ टक्के कमी होते. पाऊस कमी झाल्याने साहजिकच आॅक्टोबर महिन्यापासूनच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नदी, नाले, विहिरी कोरड्या पडल्याने पाण्याची टंचाई निर्माण झाली. नोव्हेंबर महिन्यापासूनच टंचाईग्रस्त गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी टॅँकरची मागणी वाढत असून, सद्यस्थितीत ३५० गावे, वाड्यांना १११ टॅँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. जानेवारीत थंडीचा कडाका वाढल्यामुळे पाण्याच्या वापराला काही प्रमाणात अटकाव बसला असला तरी, धरणांमध्ये सिंचनासाठी ठेवलेले आवर्तन सोडावे लागले, त्याचबरोबर प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू ठेवण्यासाठी धरणातून विसर्ग करण्यात आला. जानेवारीच्या तिसºया आठवड्यापर्यंत जिल्ह्यातील धरणांमध्ये जेमतेम ४५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यात नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाºया गंगापूर धरणात ५९ टक्के तर समूहात ६८ टक्के पाणी आहे. पालखेड व दारणा धरणात अनुक्रमे ३४ व ४१ टक्के जलसाठा असून, चणकापूरमध्ये ७८ तर हरणबारीत ५७ टक्के पाणी आहे. जळगाव जिल्हा व मालेगाव शहराला पाणीपुरवठा करणाºया गिरणा धरणात ३१ टक्केच पाणी शिल्लक आहे.आगामी काळात उन्हाचा तडाखा वाढणार असून, त्याप्रमाणात धरणातील पाण्याचे बाष्पीभवन व गळतीचे प्रमाण वाढेल, त्याचबरोबर पाण्याची मागणीही मोठ्या प्रमाणावर होणार आहे. अशा परिस्थितीत धरणातील पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याबरोबरच, त्याची चोरी रोखण्याचे प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्याचे पाणी जुलैअखेर पुरेल, असा प्रशासनाचा दावा आहे.

टॅग्स :WaterपाणीNashikनाशिक