शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नाशिकच्या उच्चभ्रू परिसरात नाकाबंदीदरम्यान ४२३ बेशिस्त चालकांकडून एक लाखाचा दंड वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2017 22:04 IST

कॉलेजरोड, शरणपूररोड, येवलेकर मळा, विसेमळा, गंगापूररोड, जेहान सर्कल आदी परिसरात सोनसाखळी चोरी, दुुचाकीचोरी, कारफोडीसारख्या वाढत्या गुन्हेगारी घटनांसोबत बेशिस्त वाहनचालकांचा उपद्रवही वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे.

ठळक मुद्दे ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून यावेळी १ लाख २३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल सोनसाखळी चोरट्यांसह एकही संशयित पोलिसांच्या हाती लागला नाही नाकाबंदीच्या सापळ्यात चोरटे अडकले नाही

नाशिक : शरणपूररोड, कॉलेजरोड व गंगापूररोड परिसर हा उच्चभ्रू वसाहत म्हणून ओळखला जातो. या भागात वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्यासाठी शहर पोलिसांनी विशेष नाकाबंदी मोहीम सोमवारी (दि.११) राबविली. दरम्यान, ४२३ बेशिस्त वाहनचालकांकडून यावेळी १ लाख २३ हजार २०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.कॉलेजरोड, शरणपूररोड, येवलेकर मळा, विसेमळा, गंगापूररोड, जेहान सर्कल आदी परिसरात सोनसाखळी चोरी, दुुचाकीचोरी, कारफोडीसारख्या वाढत्या गुन्हेगारी घटनांसोबत बेशिस्त वाहनचालकांचा उपद्रवही वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहे. यााबबत वारंवार पोलिस आयुक्तांकडे प्राप्त होणा-या तक्रारीनुसार पोलीस प्रशासनाने या भागात सोमवारी विशेष नाकाबंदी मोहीम आखली. या मोहिमेदरम्यान बेशिस्त वाहनचालकांकडून दंड वसूल करण्यात आला. सुमारे ४२३ वाहनचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या नाकाबंदीदरम्यान मात्र सोनसाखळी चोरट्यांसह अन्य गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले एकही संशयित पोलिसांच्या हाती लागला नाही. विशेष म्हणजे रविवारी रात्री गंगापूररोड परिसरात एका लॉन्सच्या बाहेर दोन कारच्या काच फोडून चोरट्यांनी तब्बल दोन लाखांचे दागिने लंपास केल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. या घटनेचा छडा लावण्यासाठी मोहीम राबविल्याची चर्चा होती; मात्र नाकाबंदीच्या सापळ्यात चोरटे अडकले नाही. या नाकाबंदीदरम्यान पोलिसांनी विविध पॉइंटवरून तब्बल ७८ वाहने जमा केली. नाकाबंदी मोहिमेत वाहनाची कागदपत्रे जवळ न बाळगणे, वीमा न उतरविणे, हेल्मेट परिधान न करणे, परवाना सोबत न ठेवणे अथवा विना परवाना वाहन चालविणे, वेग मर्यादेचे पालन न करणे, सीटबेल्टचा वापर टाळणे आदी प्रकारानुसार मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आल्याची माहिती उपआयुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी दिली.

नाकाबंदीवर ‘नजर’पॉइंट गुन्हे दंडजेहान सर्कल - ७७ १५,४००भोसला चौक - ३१ ८३००कॅनडा कॉर्नर - ६१ १६०००होलाराम कॉलनी चौक- १६० ७५,५००टिळकवाडी सिग्नल - २० ४००नागरिकांना दंड; ‘खाकी’वर मेहेरनजरमोटार वाहन कायद्यान्वये कोणताही व्यक्ती वाहन चालविताना नियमांचे भंग करत असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनाची आहे; मात्र ही जबाबदारी पार पाडणा-या या प्रशासनाच्या कर्मचाºयांकडून जेव्हा वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केले जाते तेव्हा...? कारवाई कोण करणार? किंवा त्यांना अडविण्याचे धाडस कोण दाखविणार? असा प्रश्न यावेळी मोहिमेदरम्यान नागरिकांनी उपस्थित केला. कारण बहुतांश पॉइंटवर नाकाबंदीच्या वेळी पोलीस कर्मचाºयांवर मेहेरनजर दाखविली गेली.

टॅग्स :NashikनाशिकPoliceपोलिसtraffic policeवाहतूक पोलीस