शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

वीजनिर्मिती क्षमतेत ३२८० मेगावॉटची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2018 1:26 AM

महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे.

नाशिक : महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॉट इतकी वाढ झालेली असल्यामुळे राज्य आता भारनियमनमुक्त झाल्याचा दावा एमएसईबी होल्डिंग कंपनीचे संचालक विश्वास पाठक यांनी केला आहे. महावितरण कंपनीच्या चार वर्षांच्या कामांची माहिती देण्यासाठी पाठक नाशिकमध्ये आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.  शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत पाठक यांनी सांगितले की, कंपनीने ५० मेगावॉट सौर ऊर्जा प्रकल्प व ३२३० मेगावॉटचे औष्णिक ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केल्यामुळे राज्यातील विजेची उपलब्धता वाढली आहे. दिवाळीत पाचशे ते साडेपाचशे मेगावॉटची तूट निर्माण झाल्याने काही काळ भारनियमन करावे लागले. परंतु आता वाढविलेली वीजनिर्मिती आणि खासगी वीजनिर्मिती कंपन्यांशी केलेल्या करारामुळे विजेसाठी राज्य स्वयंपूर्ण बनल्याचे पाठक म्हणाले. सद्यपरिस्थितीत राज्यात सर्व भागात अखंडित वीजपुरवठा सुरू असून, कृषी ग्राहकांना चक्राकार पद्धतीने दररोज ८ ते १० तास वीजपुरवठा करण्यात येत असल्याचेही त्यांनी सांगितले.  गेल्या २२ आॅक्टोबर रोजी तब्बल २४,९३२ मेगावॉट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली होती. ही मागणी पूर्ण करण्यात आली आहे. अमरावती जिल्ह्णातील मेळघाट या अतिदुर्गम आदिवासी उपयोजना क्षेत्रात १३२ केव्ही, धारणी उपकेंद्र तसेच नेपानगर ते धारणी अशी ६० किमीची आंतरराज्य वाहिनीची उभारणी करण्यात आली. त्यामुळे या भागातील १५२ गावांतील सुमारे १२००० गावकऱ्यांना सुरळीत व अखंडित वीजपुरवठ्याचा लाभ मिळत असल्याचा दावाही पाठक यांनी केला.१ हजार दिवसांत १४ हजार गावात वीजज्या गावात वीज पोहचलेली नाही अशा गावांमध्ये वीज जोडणी देण्यासाठीची योजना आखण्यात आली आहे. त्यानुसार १८ हजार गावांमध्ये वीज पोहचविण्याचे उद्दिष्ट असून, केवळ १ हजार दिवसांत १४ हजार गावांमध्ये वीज पोहचली आहे. येत्या जानेवारीपर्यंत उर्वरित गावांमध्येदेखील वीज पोहोचेल असेही पाठक यांनी यावेळी सांगितले. नंदुरबार आणि गडचिरोलीतील अतिदुर्गम भागात अद्याप वीज पोहोचलेली नाही. तेथेही कामे लवकर सुरू होणार आहेत.

टॅग्स :electricityवीजNashikनाशिक