शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

सरळ सेवेतून तीन टक्के पदे भरण्याची अट रद्द

By admin | Updated: June 5, 2014 01:21 IST

सरळ सेवेतून तीन टक्के पदे भरण्याची अट रद्द

 

नाशिक : शासकीय विभाग/ कार्यालयांतील गट अ ते ड संवर्गातील सरळ सेवेची पदे भरण्यासाठी विहित केलेली प्रतिवर्षी मंजूर पदांच्या कमाल तीन टक्के पदे भरण्याची मर्यादा रद्द करण्याचा निर्णय शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने घेतला आहे. त्यामुळे येत्या जूनमधील जिल्हा परिषदेची नोकरभरती शंभर टक्के उमेदवार निवडीतून होण्याची चिन्हे आहेत. ३ जून २०१४ रोजी यासंदर्भात शासननिर्णय झाला आहे. शासकीय विभाग/कार्यालयांतील गट अ ते ड मधील सरळ सेवा कोट्यातील पदांपैकी मंजूर पदांच्या प्रतिवर्षी कमाल तीन टक्के इतक्या कमाल मर्यादेपर्यंतच रिक्त पदे विहित कार्यपद्धतीने भरण्याचे अधिकार नियुक्ती प्राधिकार्‍यांना राहतील, असे आदेश शासननिर्णयान्वये दिले आहेत. तसेच सरळ सेवेची पदे प्रतिवर्षी मंजूर पदांच्या कमाल तीन टक्क्यांपेक्षा जास्त प्रमाणात भरण्याची आवश्यकता असल्यास या शासननिर्णयान्वये स्थापन केलेल्या प्रधान सचिव (सेवा) यांच्या अध्यक्षतेखालील समितीपुढे प्रस्ताव पूर्ण समर्थनासह ठेवण्याची मुभा प्रशासकीय विभागांना दिली आहे. आता नवीन निर्णयानुसार सरळ सेवेची पदे प्रतिवर्षी मंजूर पदांच्या कमाल तीन टक्के मर्यादेपर्यंत भरण्याबाबत संदर्भाधीन क्र. १ व २ येथील शासननिर्णयान्वये दिलेले आदेश याअन्वये रद्द करण्यात आले आहेत. त्यामुळे नियुक्ती प्राधिकार्‍यांना त्यांच्या अधिपत्याखालील गट अ ते ड संवर्गातील सरळ सेवा कोट्यातील रिक्त पदे विहित कार्यपद्धतीने भरण्याची कार्यवाही करता येईल. (प्रतिनिधी)