शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' ५ जागांबाबत राजनाथ सिंह आणि शरद पवारांमध्ये फोनवरून चर्चा; प्रकाश आंबेडकरांचा दावा
2
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
3
आजचे राशीभविष्य - ८ मे २०२४; धन - मान - सन्मान मिळतील, सरकार कडून फायदा होईल
4
ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप सरकार कोसळणार? हरयाणामध्ये तीन अपक्ष आमदारांनी काढला पाठिंबा
5
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
6
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
7
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
8
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
9
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
10
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
11
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
12
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
13
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
14
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
15
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
16
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
17
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
18
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
19
उपनगरांतील मतदार दिलदार, शहरात कंजुषी; मुंबईतील सर्व मतदारसंघांचे आकडे काय सांगतात...
20
दौडा दौडा... भागा भागा सा... प्रचार करताना दमछाक

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना २८७ कोटींचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 04, 2019 1:30 AM

उशिरा व अपुºया पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम हातच्या गेलेल्या जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना दुष्काळी जाहीर करून शासनाने सुमारे २८७ कोटी रुपयांची मदत त्यांच्या बॅँक खात्यात जमा केली असून, यातील सुमारे ३४ कोटी रुपयांची रक्कम शेतकºयांच्या अंतर्गत भाऊबंदकीच्या वादामुळे पडून आहे.

ठळक मुद्देशासनाची मदत : ३४ कोटी रुपये अंतर्गत वादामुळे पडून

नाशिक : उशिरा व अपुºया पडलेल्या पावसामुळे खरीप हंगाम हातच्या गेलेल्या जिल्ह्यातील साडेपाच लाख शेतकऱ्यांना दुष्काळी जाहीर करून शासनाने सुमारे २८७ कोटी रुपयांची मदत त्यांच्या बॅँक खात्यात जमा केली असून, यातील सुमारे ३४ कोटी रुपयांची रक्कम शेतकºयांच्याअंतर्गत भाऊबंदकीच्या वादामुळे पडून आहे.गेल्या वर्षी जिल्ह्यात जुलै महिन्यात मान्सूनचे आगमन झाले, परिणामी पावसाच्या भरवशावर जमिनीची मशागत करून जूनअखेर पीक पेरणी केलेल्या शेतकºयाला पावसासाठी आकाशाकडे डोळे लावून बसावे लागले. जुलैच्या अखेरीस पावसाचे आगमन झाले असले तरी, जिल्ह्यातील काही विशिष्ट भागाकडे पावसाने वक्रदृष्टी कायम ठेवली. आॅगस्ट महिन्याच्या दुसºया सप्ताहात हजेरी लावलेल्या पावसाने थेट सप्टेंबरमध्येच पुन्हा आगमन केले.शासनाने सरसकट संपूर्ण जिल्हा दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी सातत्याने करण्यात आली, परंतु शासनाने त्याकडे दुर्लक्ष केले व राष्टÑीय आपत्ती निवारण व्यवस्थापनांतर्गंत दुष्काळी मदत जाहीर केली. यात जिल्ह्णातील पाच लाख ४१ हजार २५७ शेतकºयांचे चार लाख, ८० हजार ६८५ हेक्टर क्षेत्र दुष्काळामुळे बाधित झाले. शासनाने कोरडवाहू जमीन असलेल्या शेतकºयाला साडेसहा हजार रुपये प्रति हेक्टरी, बागायती जमीन असलेल्यांना तेरा हजार रुपये व फळबागांना अठरा हजार रुपये आर्थिक मदत जाहीर केली. त्यानुसार तीन टप्प्यांमध्ये जिल्ह्याला २८७ कोटी ७३ लाख, ४७ हजार रुपये अनुदान देण्यात आले असून, ते दुष्काळी तालुक्यांना बाधित शेतकºयांच्या संख्येच्या प्रमाणात वाटप करण्यात आले असून, तालुका पातळीवरून शेतकºयांच्या बॅँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत.परंतु ३४ कोटी २६ लाख २६ हजार रुपये विनावाटप पडून आहेत. त्यात काही शेतकरी शासनाची मदत मिळण्यापूर्वीच मयत झाले तर काही शेतकरी कुटुंबात न्यायालयात वाद सुरू आहेत. काहींचे बॅँक खात्याची माहिती नसल्यामुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे.जिल्ह्यातील ९३३ गावांमध्ये दुष्काळ जाहीरखरिपाचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यातील मालेगाव, बागलाण, चांदवड, सिन्नर, नांदगाव, देवळा, नाशिक, इगतपुरी या आठ तालुक्यांत खरीप पिकांचे प्रचंड नुकसान झाले. शासनाने दुष्काळ जाहीर करण्यापूर्वी केंद्रीय पथकामार्फत दौरा करून माहिती जाणून घेतली. त्यात खरिपाचे ३३ टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यातील ९३३ गावांमध्ये शासनाने गंभीर व मध्यम स्वरूपाचा दुष्काळ जाहीर केला.

टॅग्स :NashikनाशिकFarmerशेतकरी