शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
3
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
4
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
5
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
6
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
7
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
8
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
9
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
10
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
11
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
12
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
13
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
14
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
15
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
16
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
17
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
18
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
19
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
20
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

नाशिकची 20 धरणे भरली; आता पाण्याची चिंता मिटली; जिल्ह्यात ९० टक्के उपयुक्त पाणीसाठा

By अझहर शेख | Updated: September 12, 2023 16:26 IST

९०.४८टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असून २३पैकी २१ धरणांची पाणी पातळी ९०टक्क्यापर्यंत पोहचली आहे. यामध्ये पाच धरणे तर शंभर टक्के भरली आहेत.

नाशिक : जिल्ह्याला महिनाभरापासून मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम होती. गेल्या शुक्रवारी (दि.८) शहरासह जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसाने मोठा दिलासा नाशिककरांना मिळाला आहे. धरणांची खालावलेली पाणीपातळीतही वाढ झाली आणि सरींच्या वर्षावाने सरासरी ओलांडली. जिल्ह्यात आता ९०.४८टक्के इतका उपयुक्त पाणीसाठा असून २३पैकी २१ धरणांची पाणी पातळी ९०टक्क्यापर्यंत पोहचली आहे. यामध्ये पाच धरणे तर शंभर टक्के भरली आहेत.

नाशिक शहरात शुक्रवारी ६३ तर जिल्ह्यात ५२ मिमी इतका पाऊस पडला. जिल्ह्यात सर्वाधिक कळवण तालुक्यामध्ये १२१ मिमी तर त्र्यंबकेश्वरमध्ये ९९, पेठमध्ये ९२ तर दिंडोरीत ८८ सुरगाणा तालुक्यात ८२ आणि इगतपुरीमध्ये ७१ मिमी इतका पाऊस त्यादिवशी मोजण्यात आला होता. कळवण, दिंडोरीसह निफाड, चांदवड, येवला या तालुक्यांमध्येही समाधान पाऊस झाला. मालेगाव, नांदगाव या दोन तालुक्यांमध्ये मात्र त्यादिवशीही पावसाने निराशा केली. शुक्रवारच्या पावसाने नाशिक जिल्ह्यावरील दुष्काळसदृश्य परिस्थितीचे दाटून येणारे ढग दूर केले. यामुळे हवालदिल झालेल्या बळीराजा आणि प्रजेच्या आशा पल्लवित झाल्या आहे. गोदावरीसह जिल्ह्यातील अन्य नद्याही त्यादिवशी दुथडी भरून वाहताना नाशिककरांनी बघितल्या. या हंगामात पहिल्यांदाच असे चित्र नजरेस पडले. सध्यस्थित नाशिकच्या धरणांमध्ये एकुण उपयुक्त जलसाठा ४५ हजार ६७२ दशलघफु इतका आहे. मागील वर्षी १२ सप्टेंबर रोजी ४९ हजार ४४६ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा धरणांमध्ये होता. ३ हजार ७७४ दलघफूटाने पाणीसाठा त्या तुलनेत अद्यापही कमी आहे.

पावसाची पुन्हा दडी

हवामान खात्याने शुक्रवारी ‘ऑरेंज’ तर शनिवारी ‘यलो’ अलर्ट दर्शविला होता. यानुसार पावसाने शुक्रवारी जोरदार ‘बॅटींग’ करत दमदार पुनरागमन केले खरे; मात्र रविवारपासून पुन्हा दडी मारली आहे. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र कडक ऊन तीन दिवसांपासून पडू लागले आहे. यामुळे पावसाने पुन्हा ओढ दिल्याची आता चर्चा होऊ लागली आहे.

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस