खरिपासाठी १६ भरारी पथके तैनात

By Admin | Updated: May 9, 2014 23:10 IST2014-05-09T21:13:27+5:302014-05-09T23:10:04+5:30

शेतकर्‍यांंसाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन

16 firing squad for Kharif | खरिपासाठी १६ भरारी पथके तैनात

खरिपासाठी १६ भरारी पथके तैनात

नाशिक : खरीप व रब्बी हंगामात शेतकर्‍यांना येणार्‍या अडचणींची सोडवणूक करण्यासाठी व शेतकर्‍यांनी केलेल्या तक्रारींची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने जिल्हास्तरावर एक व तालुकास्तरावर १५अशा एकूण १६ भरारी पथकांची नियुक्ती केली आहे. तसेच शेतकर्‍यांसाठी खास जिल्हा परिषदेत तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे.
भरारी पथकांमध्ये प्रत्येकी पाच अधिकार्‍यांचा समावेश आहे. जिल्हास्तरावरील भरारी पथकाचे अध्यक्ष कृषी विकास अधिकारी ज्ञानेश्वर बोेराडे, तर सदस्य सचिव म्हणून मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे यांच्यासह जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक पी. वाय. साळुंखे व सहाय्यक निरीक्षक वजन व मापे डी.पी. पवार यांचा समावेश आहे. पंधरा तालुक्यांसाठी १५ भरारी पथकांची नियुक्ती केली असून, त्यात तालुका भरारी पथकाच्या अध्यक्षपदी संबंधित तालुका कृषी अधिकार्‍यांची तर सदस्य सचिव म्हणून कृषी अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे भरारी पथके खरीप व रब्बी हंगामासाठी कार्यरत असतील. त्याचप्रमाणे खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट व रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०१४ या काळात जिल्हास्तरावर कृषी विकास अधिकारी यांची निविष्ठा उपलब्धता व निविष्ठांच्या गुणवत्तेबाबतच्या तक्रारीचे निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या तक्रार निवारण कक्षाचे कामकाज पाहण्यासाठी मोहीम अधिकारी राजेंद्र साळुंखे व कृषी विस्तार अधिकारी व्ही. पी. केदार यांची नेमणूक करण्यात आली आहे. हा तक्रार निवारण कक्ष सुटीचे दिवस वगळून दररोज सकाळी १० ते सायंकाळी ७ या वेळेत कार्यरत राहणार असून, या कालावधीत आलेल्या शेतकर्‍यांच्या अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्याचे काम या अधिकार्‍यांना करावयाचे आहे.(प्रतिनिधी)

Web Title: 16 firing squad for Kharif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.