शहरं
Join us  
Trending Stories
1
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
2
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
3
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन परत देण्याची शक्यता 
4
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
5
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
6
संतापजनक! लहान मुलांना कागदाच्या तुकड्यांवर दिलं मध्यान्ह भोजन, Video पाहून बसेल धक्का
7
'सोन्याची आहे की चंद्रावरून आणलीत?'; प्राडाच्या सेफ्टी पिनचा सोशल मीडियावर धुमाकूळ! किंमत किती?
8
सेन्सेक्स-निफ्टी लाल रंगात बंद! 'या' सेक्टरमध्ये सर्वाधिक घसरण, पण PSU बँकांमध्ये मोठी तेजी!
9
आता घरबसल्या पाहा 'आरपार', ललित प्रभाकर-हृता दुर्गुळेचा रोमँटिक सिनेमा ओटीटीवर रिलीज
10
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
11
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
12
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
13
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
14
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
15
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
16
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
17
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
18
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
19
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
20
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप

११४ ग्रामपंचायतींमधील जलस्त्रोतांची झाली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:20 IST

ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुध्द पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील सार्वजनिक जलकुंभ, शाळा अंगणवाड्यांच्या पाण्याच्या टाक्या, हातपंपांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीे. सिन्नर तालुक्यातील ११४ गावात १७ आणि १८ जून असे दोन दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुध्द पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील सार्वजनिक जलकुंभ, शाळा अंगणवाड्यांच्या पाण्याच्या टाक्या, हातपंपांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीे. सिन्नर तालुक्यातील ११४ गावात १७ आणि १८ जून असे दोन दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तालुक्यातील ५०१ जलस्त्रोत या मोहिमेदरम्यान स्वच्छ करण्यात आले. जलकुंभांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यातूनच जलकुंभ, टाक्या, हातपंपांचे शुद्धीकरण आणि स्वच्छताकरणाची मोहीम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतींकडून केली जाणारी टीसीएल साठवणूक आणि हाताळणी, नमूना तपासणी याचीही पडताळणी या मोहिमेदरम्यान संपर्क अधिकाऱ्यांकरवी केली. ग्रामपंचायतींच्या जलकुंभासोबतच शाळा, अंगणवाड्यांतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छताही करण्यात आली. स्वच्छता केल्याची तारीख आॅइल पेंटच्या सहाय्याने सदर जलस्त्रोतावर नमूद करण्यात आली.पाण्याच्या टाक्यांमध्ये सहा इंच उंचीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी काढून टाकी रिकामी केली. आउटलेट बंद करून टाकीच्या आतील भिंती, तळ तारेच्या ब्रशच्या सहाय्याने घासण्यात आल्या. त्या पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा ब्लिचिंग पावडरच्या द्रावणाने भिंती आणि तळ स्वच्छ धुवून घेतला. शाळा, अंगणवाड्यांच्या सिमेंट, प्लॅस्टिक आणि लोखंडी टाक्या धुण्यासाठी हीच पद्धत अवलंबण्यात आली. तर हातपंप शुद्धीकरण करताना पंपाच्या झाकणाचे तीन बोल्ट काढून त्यात सहा इंचसाठी ३०० ग्रॅम तर चार इंचसाठी १५० ग्रॅम ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून शुद्ध करण्यात आले. स्वच्छ करण्यात आलेल्या टाक्या एक दिवस पाण्याविना ठेवून कोरडा दिवस पाळण्यात आला.तालुक्यातील ५०१ जलस्त्रोत या मोहिमेदरम्यान स्वच्छ करण्यात आले. जलकुंभांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यातूनच जलकुंभ, टाक्या, हातपंपांचे शुद्धीकरण आणि स्वच्छताकरणाची मोहीम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी