शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

११४ ग्रामपंचायतींमधील जलस्त्रोतांची झाली स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2019 18:20 IST

ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुध्द पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील सार्वजनिक जलकुंभ, शाळा अंगणवाड्यांच्या पाण्याच्या टाक्या, हातपंपांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीे. सिन्नर तालुक्यातील ११४ गावात १७ आणि १८ जून असे दोन दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सिन्नर : ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी त्यांना शुध्द पाणी देणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व ग्रामपंचायतींनी शुध्द पाण्याचा पुरवठा करावा असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी दिले होते. त्यानुसार तालुक्यातील प्रत्येक गावातील सार्वजनिक जलकुंभ, शाळा अंगणवाड्यांच्या पाण्याच्या टाक्या, हातपंपांची स्वच्छता मोहीम राबविण्यात आलीे. सिन्नर तालुक्यातील ११४ गावात १७ आणि १८ जून असे दोन दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.तालुक्यातील ५०१ जलस्त्रोत या मोहिमेदरम्यान स्वच्छ करण्यात आले. जलकुंभांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यातूनच जलकुंभ, टाक्या, हातपंपांचे शुद्धीकरण आणि स्वच्छताकरणाची मोहीम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहे. ग्रामपंचायतींकडून केली जाणारी टीसीएल साठवणूक आणि हाताळणी, नमूना तपासणी याचीही पडताळणी या मोहिमेदरम्यान संपर्क अधिकाऱ्यांकरवी केली. ग्रामपंचायतींच्या जलकुंभासोबतच शाळा, अंगणवाड्यांतील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांची स्वच्छताही करण्यात आली. स्वच्छता केल्याची तारीख आॅइल पेंटच्या सहाय्याने सदर जलस्त्रोतावर नमूद करण्यात आली.पाण्याच्या टाक्यांमध्ये सहा इंच उंचीपर्यंत पाणी ठेवून उर्वरित पाणी काढून टाकी रिकामी केली. आउटलेट बंद करून टाकीच्या आतील भिंती, तळ तारेच्या ब्रशच्या सहाय्याने घासण्यात आल्या. त्या पाण्याने स्वच्छ धुतल्यानंतर पुन्हा ब्लिचिंग पावडरच्या द्रावणाने भिंती आणि तळ स्वच्छ धुवून घेतला. शाळा, अंगणवाड्यांच्या सिमेंट, प्लॅस्टिक आणि लोखंडी टाक्या धुण्यासाठी हीच पद्धत अवलंबण्यात आली. तर हातपंप शुद्धीकरण करताना पंपाच्या झाकणाचे तीन बोल्ट काढून त्यात सहा इंचसाठी ३०० ग्रॅम तर चार इंचसाठी १५० ग्रॅम ब्लिचिंग पावडरचे द्रावण टाकून शुद्ध करण्यात आले. स्वच्छ करण्यात आलेल्या टाक्या एक दिवस पाण्याविना ठेवून कोरडा दिवस पाळण्यात आला.तालुक्यातील ५०१ जलस्त्रोत या मोहिमेदरम्यान स्वच्छ करण्यात आले. जलकुंभांची पावसाळ्यापूर्वी स्वच्छता झाल्याने नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ आणि शुद्ध पाणी मिळण्यास मदत होणार आहे.ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध आणि सुरिक्षत पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे, जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षणाचा प्रमुख उद्देश आहे. त्यातूनच जलकुंभ, टाक्या, हातपंपांचे शुद्धीकरण आणि स्वच्छताकरणाची मोहीम पावसाळ्यापूर्वी हाती घेण्यात आली आहे.

टॅग्स :nashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषदWaterपाणी