शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
6
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
7
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
8
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
9
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
10
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
11
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
12
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
13
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
14
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
15
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
16
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
17
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
18
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
19
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
20
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
Daily Top 2Weekly Top 5

वसुंधरा अभियानात नंदुरबारच मागे का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

नंदुरबार : जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून शनिवारी राज्य शासनातर्फे सन २०२०-२१ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे पुरस्कार ...

नंदुरबार : जागतिक पर्यावरण दिनाचे निमित्त साधून शनिवारी राज्य शासनातर्फे सन २०२०-२१ मध्ये राबविण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाचे पुरस्कार घोषित करून वितरित करण्यात आले. या अभियानात राज्यात नाशिक विभागाने ३१ पैकी १९ पुरस्कार मिळवून बाजी मारली. त्यानिमित्ताने विभागीय आयुक्तांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गौरवही झाला. ही बाब समाधानकारक असली तरी अभियानात नाशिक विभागातीलच सर्वाधिक जंगल क्षेत्र असलेला नंदुरबार जिल्हाच मागे का पडला हा प्रश्न मात्र जिल्हावासीयांसाठी आत्मचिंतन करणारा आहे.

नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक जंगलक्षेत्र आहे. या जंगलाचा ऱ्हास स्वातंत्र्यपूर्व काळापासून सुरू आहे तो आजतागायत सुरूच आहे. सुरत-भुसावळ रेल्वे मार्गासाठी सातपुड्यातील जंगल तोडण्यात आले. त्यानंतर सातपुड्यातीलच कोळसा भट्ट्यांचे प्रकरण देशभर गाजले. त्यातूनही मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल करून त्याचा कोळसा पाडून विक्री झाला. पुढे सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाणलोटात सातपुड्यातील शेकडो हेक्टर जंगल बुडाले. अवैध वृक्षतोड सातत्याने वाढतच गेली. त्याला जिल्ह्यातील साक्षरता वाढविण्यासाठी ‘मोळी विकू, पण शाळा शिकू’ असे घोषवाक्य खुद्द शासनानेच प्रसारित करून जंगलतोडीला प्रोत्साहन दिले. अशा विविध माध्यमातून जंगलतोडीने सातपुड्याची सफाई झाल्यानंतर कुठे ९० च्या दशकात शासनाचे लक्ष सातपुड्यातील अवैध वृक्षतोडीकडे वेधले गेले आणि वृक्ष लागवड चळवळ सुरू झाली; पण ही चळवळदेखील प्रशासनाच्या कागदावरील आकडेमोडीतच सुरू राहिली. त्यामुळे एकीकडे लाखो वृक्षांची लागवड दरवर्षी कागदावर होत गेली तरी प्रत्यक्षात मात्र जंगल सुनेसुनेच राहिले. त्यातच अतिक्रमीत वनजमीनधारकांना जमीन देण्याची प्रक्रिया दीर्घकाळ प्रलंबित सुरू असल्याने त्याचाही परिणाम जंगलाचा ऱ्हास होण्यावर झाला. आज सातपुड्याच्या पायवाटेवरून हिंडतांना अनेक भागात उन्हाळ्यात सावलीसाठीही वृक्ष सापडणे कठीण जाते. अशा स्थितीत गेल्या काही वर्षांपासून सोशल मीडियावर वृक्ष लागवड आणि पर्यावरण जागृतीची मोहीम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. दरवर्षी पर्यावरण दिवस आला की, या मोहिमेला इतकी गती येते की जणू काही प्रत्येकजण पर्यावरणाच्या संवर्धनासाठी अंतकरणापासून सरसावला आहे. पण, प्रत्यक्षात मात्र कृतीतून ते कुठेही दिसून येत नाही. गेल्या दशकातील चित्र पाहिल्यास १०० कोटी वृक्ष लागवड मोहीम असो की शासनाची दरवर्षी सुरू असलेले वृक्ष लागवडीचे विविध उपक्रम असो. वृक्ष लागवड केल्याचे लाखो आणि कोटीतून आकडे येत असले तरी प्रत्यक्षात लागवड किती झाली? किती झाडे जगली? ही शोधण्याची अथवा गणती करण्याची अधिकृत यंत्रणाच नसल्याने सर्व काही हवेत असल्यागत स्थिती आहे. अनेक सामाजिक संघटना व कार्यकर्ते प्रामाणिकपणे वृक्ष लागवडीसाठी पुढे येत असल्याचे समाधानकारक चित्र असले तरी ही मोहीम लोकचळवळीत बदलत नाही, ही मोठी शोकांतिका आहे. त्यामुळे यंदाच्या जागतिक पर्यावरण दिनापासून किमान यापुढे तरी वृक्ष लागवड आणि संवर्धनाची चळवळ व्यापक व्हावी, प्रत्येकाच्या मनात ती रुजावी आणि कृतीतून साकारावी यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. प्रशासनातील यंत्रणेनेही याबाबत यापूर्वी झाले ते झाले पण किमान यापुढे तरी लोकसेवक म्हणून आपल्या कृतीतून पर्यावरण संवर्धनाची चळवळ पुढे नेण्याची आवश्यकता आहे, अन्यथा सातपुड्याच्या डोंगरावर दिसणारे तुरळक झाडे व अधूनमधून दिसणारे वृक्ष अच्छादित जंगलाचे टापू लुप्त झाल्यास सर्वांनाच त्याचा परिणाम भोगावा लागेल.