शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

सोंगाड्यांची पारंपरिक कला उपेक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र गाव दिवाळीची धुम सुरू आहे. गावदिवाळीनिमित्त होणाऱ्या सोंगाड्यांच्या कार्यक्रमात मनावर वार करुन ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात सर्वत्र गाव दिवाळीची धुम सुरू आहे. गावदिवाळीनिमित्त होणाऱ्या सोंगाड्यांच्या कार्यक्रमात मनावर वार करुन जाणारे सावत्र आई, विविध कारणांनी विभक्त होणारा परिवार, व्यसनांमुळे उघड्यावर येणारा संसार असे भावनिक विषय प्रभावीपणे मांडले जात आहे. शिवाय हसून-हसून लोटपोट करणारे विषयही कलात्मक पद्धतीने मांडले जात आहे. परंतु या सोंगड्या पार्टीतील कलाकारांना प्रशासकीय पातळीवरुन कुठलीही दखल घेतली जात नाही.आदिवासींमधील बºया-वाईट बाबींना समाजाभिमुख करण्याची सुरुवात गांडा गिंबा तमाशा पार्टीने केली. १९६० मधील दुष्काळामुळे आदिवासींवर उपासमारीची वेळ आली होती. त्यावेळी आदिवासींचा कुठलाही जोडधंदा नव्हता त्यांना गुजरातमधील रोजंदारीशिवाय एकही उपाय नव्हता. गांडा गिंबा रा.सागाळी ता. नवापूर यांनी कुटुंबियांच्या उपजिविकेसाठी तमाशाला सुरूवात केली. त्यांनी वाड्या-पाड्यांवर मनोरंजन केले. नाटकातून गांडा गिंबा हे एखादा ज्वलंत विषय असा तरी अगदी कल्पकतेने मांडत असल्याने त्यांना चांगला प्रतिसाद मिळत गेला. तमाशा सादर करण्यासाठी जातांना भोजनाची सुविधा होत होती शिवाय आर्थिक लाभही होत होता. त्याचे काही मित्रही सोबतीने खेडोपाडी तमाशा सादर करु लागले. उपजिवीकेसाठी केलेली सुरुवात आज जनजागृतीचे प्रभावी माध्यम बनले. समाजसुधारक पार्ट्या म्हणूनही ओळख निर्माण झाली.पूर्वी एका रात्रीसाठी ५ ते १० रुपये घेऊन तमाशाचे कार्यक्रम होऊ लागले. पार्टीत सर्व कलाकार पुरुषच असून स्त्रिची भूमिकाही पुरुषच करीत आहे. गांडा गिंबा व त्यांच्या सहकाऱ्यांच्या कलागुणांना प्रतिसाद मिळत गेला, समाजात पार्टी नावारुपास आली. तमाशा बघणाºयांची संख्याही झपाट्याने वाढली. त्यानंतर दादी सोंगाड्या, मोजू कर्मा पाडवी यांच्यासह बाबू खोडदेकर, राजमोही, सोमावल, करंजवेल अशा सोंगाड्या पार्टी अस्तित्वात आल्या.सोंगाड्यातील कलाकारामार्फत गायले जाणाºया याहा मोगी मातेच्या गीत रुपातील कथा ऐकुन प्रत्येक आदिवासी गहिवरुन जात आहे. चैतन्यमय वातावरण निर्माण होत आहे. कुठेही रोडाली सुरू झाल्यास निश्चितच पायाचाही ठेका सुरू होतो. १९७० च्या दशकात मोजू कर्मा पाडवी (लोयकर) सोनारेकर, केवलीपाडा या पार्ट्या प्रकाशात आल्या. बाबूराव पाडवी (खोडदेकर) यांनीही नवी पार्टी सुरू करीत मनोरंजन क्षेत्रात वेगळा ठसा उमटवला. बाबू सोंगाड्यांचे विनोद अगदी हृदयाला जाऊन भिडत होते, त्यामुळे प्रत्येक जण हसून लोटपोट होत होते. भावनिक प्रसंगाचे प्रदर्शन होताच उपस्थितांना भावना अनावर होत होत्या.गांडा गिंबांसह आज दित्या सोंगाड्या, देवल्या व सोनारेकर पार्टीचे गुलाबसिंग कलाकार आपल्यात राहिले नसले तरी त्यांचा वारसा आज पुढे सुरूच आहे. लोय ता.नंदुरबार येथील रहिवासी तथा आदर्श कलाकार किसन, गोरख, नामा हे देखील समाज प्रबोधनात योगदान देत आहे. नवीन कलाकारांमध्येही दर्जेदार कला आहे. परंतु आर्थिकदृट्या बेदखल होत असल्याने त्यांच्यातील कलाच संकटात सापडली आहे. कला कायमस्वरुपी राहावी यासाठी समाजासह प्रशासकीय पातळीवरुन उपाययोजना होणे आवश्यक आहे.

४दर्जेदार कला असतानाही हे कलाकार गुजतरामध्ये उदरनिर्वासाठी जातात ही बाब मन दु:खावणारी ठरते. अन्य समाजातील कलाकारांना पेन्शन, घरे व जागा दिली जात असताना आदिवासी कलाकारांच्या नशिबी हे भाग्य का येत नाही? असा प्रश्न उपस्थित होती. या कलाकारांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी काही लोकप्रतिनिधींनी आश्वासने दिली, परंतु ती कलाकारांसाठी स्वप्नवतच ठरली. ज्यांनी आपले आयुष्य समाजाच्या मनोरंजनासाठी घालवले त्यांना विसरुन चालणार नाही.४सोंगाड्यांकडून ज्वलंत विषयांवरही प्रबोधन करण्यात येत आहे. समाजात चांगल्या गोष्टी प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठीही हे कलाकार योगदान देत आहेत. सोंगाड्यांमार्फत सावत्र आई हे नाटक सादर करुन उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण करण्यात येते. अशावेळी बहुतांश बांधवांना अश्रु अनावर होतात. तर वास्तव जीवन जगणाऱ्यांकडून कलाकारांना विशेष दाद दिली जाते. गर्दीतही हुंदक्यांचा आवाज येतो. ही बाब कलाकार उपस्थितांच्या थेट मनावर परिणाम केल्याचे सिद्ध करुन जाते.