शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे टरबूज व खरबूज रस्त्यावर विकण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

कोरोना महामारीचा परिणाम सलग दुसऱ्या वर्षी जाणवत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील ...

कोरोना महामारीचा परिणाम सलग दुसऱ्या वर्षी जाणवत असून शेतकऱ्यांना खूप मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. मागील महिन्यात कोरोना महामारीचा परिणाम केळी पिकावरही मोठ्या प्रमाणात दिसून आला. रमजान महिन्यात वाढती मागणी असूनदेखील व्यापाऱ्यांच्या मनमानीमुळे केळीचे उत्पादन खूपच कमी भावाने शेतकऱ्यांना विकावे लागले.

आताही शेतकऱ्यांच्या टरबूज व खरबूज पिकाला भाव मिळत नसून, व्यापारीही फिरकत नाही. व्यापारी आले तर खूपच कमी भावाने टरबूज व खरबुजाची मागणी करत आहेत. म्हणून, नाइलाजास्तव शेतकरी रस्त्यावर आपला माल विकून लावलेला खर्च काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. आर्थिक टंचाईच्या काळात शेतकऱ्यांनी उधार-उसनवारीने पैसे गोळा करून मोठ्या आशेने टरबूज व खरबुजाची लागवड केली. शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने मल्चिंग पेपर, दर्जेदार बियाण्यांची लागवड करून ठिबक सिंचनाद्वारे या पिकांची जोपासना केली. एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून खरेदीसाठी क्वचित व्यापारी येत असल्यामुळे अत्यंत कमी भावात मागणी करत आहेत. किंबहुना, अनेक वेळेस खरेदीसाठी व्यापारी येत नसल्याने माल विक्रीस मोठी अडचण निर्माण झाली आहे. शेतकरी स्वतः मार्केटपर्यंत आपला माल घेऊन गेला, तर तिथेही खूपच कमी भाव मिळत आहे. एखादवेळेस गाडीभाडेच निघत आहे.

जानेवारी महिन्यात लागवडीच्या वेळी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्यामुळे या पिकाला चांगला नफा मिळेल, अशी अपेक्षा शेतक-यांना होती. मात्र, फळतोडणीच्या वेळेस कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढल्याने शासनाला मागील वर्षाप्रमाणे या वर्षीही कठोर निर्बंध लादावे लागले. अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या, मृत्यूचे वाढते प्रमाण यामुळे शासनाला सरसकट लॉकडाऊन लावावे लागले. तालुक्यातील जयनगर, निंभोरे, वडाळी, कोंढावळ येथील शेतकऱ्यांनी लावलेल्या टरबूज व खरबूज पिकांसाठी व्यापारी भेटत नाही. म्हणून, शेतकऱ्यांना या पिकांसाठी लावलेले भांडवल काढण्यासाठी आपला माल रस्त्यावर घेऊन विक्रीस बसावे लागत आहे.

मी तीन एकर क्षेत्रात टरबुजाची लागवड केली होती. एकरी ५० ते ६० हजार रुपये खर्च आला असून व्यापारी कमी भावाने मागणी करत असल्यामुळे भांडवल निघणेही मुश्‍कील झाले आहे. म्हणून, शेतकऱ्यांना नाइलाजास्तव रस्त्यावर आपला माल विकावा लागत आहे.

शेतकरी - सुभाष आनंदसिंग गिरासे, निंभोरे

टरबूज व खरबुजाला भाव मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना आपला माल रस्त्यावर विकावा लागत आहे. फोटो - किशोर माळी, जयनगर