शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

तीन विद्यार्थी बाधीत मात्र प्रशासन अनभिज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2020 13:18 IST

नंदुरबार : अक्कलकुवाहून बिहारला गेलेले तीन विद्यार्थी कोरोनाबाधीत असल्याचे अहवाल सहरसा (बिहार) येथील प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या ...

नंदुरबार : अक्कलकुवाहून बिहारला गेलेले तीन विद्यार्थी कोरोनाबाधीत असल्याचे अहवाल सहरसा (बिहार) येथील प्रशासनाला प्राप्त झाले. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या येथील आरोग्य तपासणीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहे. चार दिवसांपूर्वी विशेष रेल्वेने अक्कलकुवा येथील अनेक विद्यार्थी तसेच उत्तर भारतीय नागरिकांना नंदुरबारहून रवाना करण्यात आले होते. त्यापूर्वी या विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी झाल्याचे सांगितले गेले होते. तरीही बिहारमध्ये जाताच या विद्यार्थ्यांचा अहवाल पॉझिटिव्ह कसा आला याबाबत प्रश्न उपस्थित होत आहे. प्रशासनाला याबाबत मात्र माहिती नसल्याचे सांगण्यात आले.’रेल्वेने गेलेल्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यासाठी रेल्वे स्थानकात लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित होते.’या तीन विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण नेमकी कुठे झाली याचाही शोध घेणे आवश्यक आहे.’विद्यार्थी सहरसाला पोहचल्यावर तेथील प्रशासनाने सर्वांची आरोग्य तपासणी करून काहींचे स्वॅब घेतले. त्यात हे तीन विद्यार्थी पॉझिटिव्ह आढळले आहेत.नंदुरबारहून गेलेले विद्यार्थी बिहारमध्ये कोरोना पॉझिटिव्ह निघत असतील ती बाब गंभीर मानावी लागणार आहे. याचा अर्थ या विद्यार्थ्यांची जिल्ह्यात कशा पद्धतीचे आरोग्य तपासणी झाली असेल हा प्रश्न उपस्थित होत आहे.नंदुरबार ते सहरसा हा दोन दिवसांचा प्रवास होता. या प्रवासात विद्यार्थ्यांना सोशल डिस्टन्सिंगसाठी सुचना देण्यात आल्या होत्या. तशी बैठक व्यवस्था देखील होती.सहरसाचे जिल्हाधिकारी कौशल कुमार यांनी १३ वर्षीय दोन तर १८ वर्षीय एक विद्यार्थी असल्याचे सांगितले आहे. या विद्यार्थ्यांच्या सोबत इतर विद्यार्थ्यांचेही स्वॅब घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.