शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
3
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
4
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
5
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
6
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
7
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
8
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
9
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
10
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
11
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
12
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
13
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
14
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
15
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
16
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
17
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
18
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
19
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
20
टेबलाखालून स्पर्श अन् प्रमोशनसाठी शरीरसंबंधांची सक्ती; महिला बॉसवर आरोप करणारे चिरायु राणा कोण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील २४ केंद्रांवर १६ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 11:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर १६ हजार विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला़ तळोदा आणि खोंडामळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील २४ परीक्षा केंद्रांवर १६ हजार विद्यार्थ्यांनी बारावीचा पहिला पेपर दिला़ तळोदा आणि खोंडामळी ता़ नंदुरबार वगळता सर्वच ठिकाणी परीक्षा सुरळीत पार पडल्याची माहिती असून परीक्षा बंदोबस्तासाठी यंदा होमगार्ड नसल्याने पोलीस दलाच्या मात्र अडचणी वाढल्याचे दिसून आले़नाशिक विभागीय परीक्षा मंडळाकडून बारावीच्या परीक्षांना मंगळवारी सुरुवात झाली़ परीक्षेसाठी नंदुरबार जिल्ह्यातून १६ हजार ४६९ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते़ यासाठी २४ परीक्षा केंद्रांची निर्मिती करण्यात आली होती़ आज पहिला पेपर असल्याने सकाळपासूनच पालक व परीक्षार्थी नंबर शोधण्यासाठी परीक्षा केंद्रावर दाखल झाले होते. परीक्षार्थी एकमेकांना शुभेच्छा देत होते. तर पालक शांततेत पूर्ण पेपर लिहिण्याचा सूचना विद्यार्थ्यांना देत होते. सकाळी दहा वाजेपासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी व विद्यार्थिनींची शिक्षक शिक्षकांकडून तपासणी करण्यात येत होती़ विद्यार्थ्यांचे मोबाईल बॅग इतर मौल्यवान वस्तू , हॅन्ड बॅग पॉकेट किंवा इतर साहित्याला परीक्षा केंद्रावर बंदी करण्यात आलेली होती़ नंदुरबार शहरात चार, नंदुरबार तालुका तीन, तळोदा एक, शहादा सहा, अक्कलकुवा तालुक्यातील चार, नवापुर तालुक्यात पाच तर धडगाव तालुक्यातील एका केंद्रांवर परीक्षा केंद्रावर आधीपासून तयारी करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना अडचणी आल्या नव्हत्या़ परीक्षेसाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने सुरळीत पार पडल्याची माहिती देण्यात आली आहे़दोघे डिबारपरीक्षेदरम्यान दुपारी तळोदा येथील न्यू हायस्कूलच्या परीक्षा केंद्रावर दोघा विद्यार्थ्यांवर डायटचे प्राचार्य जालिंदर सावंत यांनी कारवाई केली़ प्राचार्य सावंत यांच्या भेटीदरम्यान केंद्रात विद्यार्थ्यांची झडती घेणे सुरु असताना दोघांकडे कॉपी आढळून आल्यानंतर कारवाई करण्यात आली़दरम्यान गेल्या तीन महिन्यापासून राज्यातील होमगार्ड यांना पगार मिळत नसल्याने गृहरक्षक दलाचे जवान कर्तव्यावर नसल्याचे चित्र परीक्षेच्या पहिल्याच दिवशी दिसून आले़ बारावीची परीक्षा आणि शिवजयंती या दोन्ही अतीमहत्त्वपूर्ण उपक्रमांवेळी बंदोबस्तासाठी होमगार्ड कर्मचारी नसल्याने पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांची तारांबळ उडाल्याचे चित्र दिसून आले होते़ मंगळवारी परीक्षा केंद्रांवर पोलिसांवरच जादा भार आल्याने त्यांची दमछाक झाली होती़ याबाबत पोलीस अधिकाऱ्यांसोबत संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता, तो होवू शकला नाही़नियुक्त करण्यात आलेल्या परीक्षा केंद्रांवर गैरप्रकार रोखण्यासाठी सकाळपासून उपाययोजना करण्यात येत होत्या़ यातून बºयाच ठिकाणी परीक्षा निकोप वातावरणात पार पडल्याचा दावा करण्यात आला़शेतशिवारातून पळाले हुल्लडबाजइंग्रजीच्या पहिल्याच पेपरसाठी प्रविष्ठ झालेल्या ६ हजार ४५९ पैकी १६ हजार २११ विद्यार्थ्यांनी हजेरी लावली़ सर्व २४ केंद्रातून २५६ विद्यार्थी गैरहजर होते़शिक्षण विभागाने यंदा कॉपीमुक्त अभियान राबवल्याने त्याचा परिणाम दिसून आला परंतू खोंडामळी ता़ नंदुरबार येथील नूतन माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाबाहेर हुल्लडबाजी झाल्याने पळापळ झाली़ कॉपी पुरवण्यासाठी याठिकाणी मोठी गर्दी जमली होती़ या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीसांकडून कारवाई होताच अनेकांनी मोटारसायकली सोडून पळ काढला़ यातून शाळेच्या मागे जागोजागी दुचाकी पडून असल्याचे दिसून आले़ अनेकजण शेतशिवारातून पळत सुटले होते़