शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मलगाव ते सटीपाणी रस्त्याचे काम पूर्ण होण्याआधीच तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:34 IST

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासी भागातील गाव व पाड्यांना जोडणारा मलगाव ...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम व डोंगराळ आदिवासी भागातील गाव व पाड्यांना जोडणारा मलगाव ते सटीपाणी हा सात किलोमीटरचा रस्ता आहे. शिरपूर तालुक्याकडून वाडी-चिकसे ते सटीपाणी या रस्त्याचे काम मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत काही वर्षांपूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र, सटीपाणी ते मलगाव हा नंदुरबार जिल्हा व शहादा तालुक्याला जोडणारा रस्ता नदी-नाल्यातून व डोंगराळ, तसेच जंगलातून जात असल्याने सटीपाणी हे गाव तालुका व जिल्ह्याच्या संपर्कात येत नसल्याने येथील आदिवासी बांधवांची वर्षानुवर्षे पायपीट सुरू होती. सटीपाणी येथील विद्युतीकरणाच्या उद्घाटनासाठी तत्कालीन आमदार व आताचे पालकमंत्री ॲड. के.सी. पाडवी हे मलगाव येथून मोटारसायकलीने सटीपाणी याठिकाणी पोहोचले होते. तेव्हा तेथील समस्यांचे दर्शन आमदारांना घडले होते. अखेर सटीपाणी ते मलगाव या सात किलोमीटर रस्त्याचे मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत चार कोटी २२ लाख रुपये खर्चाच्या कामास मंजुरी मिळाली व फेब्रुवारी २०१७ पासून कामास प्रारंभही झाला. मात्र, हा रस्ता वनक्षेत्रातून जात असल्याने काम सुरू होण्यास अडचणी आल्या होत्या. वनविभागाच्या सर्व प्रकारच्या मंजुरी मिळाल्यानंतर रस्त्याच्या कामास प्रत्यक्ष सुरुवात झाली. मात्र, ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या संगनमताने रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने झाल्याने रस्त्याचे बारा वाजले आहेत. तांत्रिकदृष्ट्या सदोष पद्धतीने काम झाल्याने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारक त्रस्त झाले आहेत.

मोऱ्यांची कामे अपूर्ण

या रस्त्यावरील अनेक नदी-नाल्यांवर पूल व पाइप मोऱ्यांची कामे अद्यापही अपूर्णावस्थेत आहेत. अनेक ठिकाणी मोऱ्यांसाठी रस्त्यावर गेल्या दोन वर्षांपासून चाऱ्या खोदण्यात आल्या आहेत. मात्र, तेथे पाइप टाकले जात नसल्याने चाऱ्यांमुळे वाहन रस्त्यावरून जाऊ शकत नाही. सध्या पावसाळा सुरू असल्याने व खोदलेल्या चाऱ्यामुळे पर्यायी मार्गाने चिखलातून लोकांना आपल्या वाहनाने यावे-जावे लागत आहे. त्यामुळे अनेकदा वाहने चिखलात फसतात, घसरतात व लहान-मोठे अपघात होतात. लाखो रुपये खर्च करूनही आदिवासी बांधवांना या रस्त्यावरून जाणे कसरतीचे ठरत असल्याने ठेकेदाराच्या व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे प्रचंड संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावर काही ठिकाणी पुलाचे काम झाले; परंतु पुलावर दोन्ही बाजूला कठडे बांधले नसल्याने वाहनधारक रात्री-बेरात्री पुलावरून पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. अपघात होऊन जीवितहानी झाल्यास यास जबाबदार कोण राहील, ठेकेदार की बांधकाम विभाग, असा प्रश्न उपस्थित होत आहे.