शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
2
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
3
हंटाव्हायर बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
4
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
5
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
6
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
7
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
8
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
9
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
10
ऑस्ट्रेलियन क्रिकेटची पाकिस्तानसारखी अवस्था, करारावरून वाद, खेळाडू आणि बोर्ड आमने-सामने, ५ क्रिकेटपटूंनी घेतला असा निर्णय
11
परदेशातून भारतात आले ११.४ लाख कोटी रुपये, जगातील सर्वाधिक 'रेमिटन्स' मिळवणारा देश
12
ड्रायव्हर, नोकर अन् नातेवाईकांच्या नावे जमवलेली संपत्ती होणार जप्त; सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
13
"आई-वडिलांना सोड तरच..."; हमाली करुन बायकोला शिकवलं, नोकरी मिळताच नवऱ्याला धमकी
14
फोटोवर थुंकला, मग हर की पैडीमध्ये जिवंत पत्नीचं केलं पिंडदान, व्हिडीओ व्हायरल होताच खळबळ
15
मातृत्वाचे ममत्व अन् सर्वोच्च त्याग ; ‘ती’च्या किडनीदानाने ३७ मुलांना जीवनदान
16
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
17
तिन्ही बापलेक विहिरीत उतरले अन अचानक विहीर ढासळली; मातीच्या ढिगाऱ्याखाली दबून अंत
18
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
19
सोमनाथ : अखंड श्रद्धापर्व अन् महाराष्ट्राशी जडलेले अभेद्य नाते
20
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नियमावली बनवून मंदिरे खुली करावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : मंगळवारपासून हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. या महिन्यात मंदिरांवर ...

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : मंगळवारपासून हिंदू धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या श्रावण महिन्याला प्रारंभ होत आहे. या महिन्यात मंदिरांवर भाविकांची पूजाअर्चा व उपासनेसाठी गर्दी होते. मात्र यंदा कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मंदिरे बंद आहेत. त्यामुळे प्रशासन व संबंधित मंदिराचे विश्वस्त यांनी समन्वय साधून व नियमावली तयार करून श्रावण महिन्यात मंदिरे खुली करावीत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या चार महिन्यापासून धार्मिकस्थळे व प्रार्थनास्थळे बंद करण्यात आली आहेत. शासनाने लॉकडाऊननंतर मंदिरे, धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे यांच्याबाबत काही प्रमाणात अटी आणि शर्ती लावून शिथीलता दिली आहे. पण अद्यापही अनेक मंदिरे केवळ सकाळी व सायंकाळी पूजाविधीसाठी उघडतात व पुन्हा बंद करतात. मंगळवारपासून श्रावण महिन्याला प्रारंभ होत असून प्रशासन व मंदिर विश्वस्तांनी नियमावली तयार करून भाविकांसाठी मंदिरे खुली करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. त्यासाठी मंदिरांवर कोणत्याही प्रकारची गर्दी होणार नाही, सोशल डिस्टन्स पाळले गेले पाहिजे, प्रत्येक भाविकाच्या तोंडाला मास्क हा सक्तीने असला पाहिजे, प्रत्येक मंदिर ट्रस्टने दररोज तीनवेळा मंदिराच्या परिसरात फवारणी करावी, मंदिराच्या बाहेर भाविकांसाठी सॅनिटायझर ठेवावे, भाविकांना रांगेत उभे राहण्यासाठी सोशल डिस्टन्सची आखणी करावी आदी प्रकारचे नियोजन करणे गरजेचे आहे.
जिल्ह्यातील प्रकाशा हे दक्षिणकाशी म्हणून प्रमुख तीर्थक्षेत्र आहे. येथील केदारेश्वर महादेव मंदिरात दरवर्षी श्रावण महिन्यात मोठी गर्दी होते. परप्रांतातील भाविकही दर्शनासाठी येतात. तसेच जयनगर येथील हेरंब गणेश मंदिर, सारंगखेडा येथील दत्त मंदिर, पिंगाणे येथील गोमाई नदीकाठावरील नागेश्वर महादेव मंदिर, खेड येथील कोचरा माता मंदिर, शहादा येथील पुरातन पंचमुखी महादेव मंदिर, रामेश्वर मंदिर, कोटेश्वर मंदिर आदी धार्मिकस्थळे भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. त्यामुळे श्रावण महिन्यात या मंदिरांवर भाविकांची गर्दी होते. काही भाविक महिनाभर पूजाअर्चा व उपासना करतात. त्यामुळे त्या त्या गावातील ग्रामपंचायत, नगरपालिका, पोलीस विभाग, प्रशासन व मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यांनी समन्वय साधून स्वतंत्र नियमावली करून धार्मिक स्थळे खुली करावीत, अशी मागणी भाविकांकडून होत आहे.