शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

विमाकवचाशिवाय करताहेत शिक्षक कोरोना ड्यूटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:39 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कोरोना काळात विविध कामे लावण्यात आली आहेत. गावोगावी सर्वेक्षण करणे, लसीकरणासाठी नोंदणी ...

नंदुरबार : जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांना कोरोना काळात विविध कामे लावण्यात आली आहेत. गावोगावी सर्वेक्षण करणे, लसीकरणासाठी नोंदणी करणे, कन्टेन्मेंट झोनमध्ये नियुक्ती यासह इतर कामे शिक्षक करीत आहेत. परंतु शासनाने जाहीर केल्याप्रमाणे शिक्षकांना कोरोना विमाकवच दिले गेलेले नाही. याबाबत शिक्षक संघटनांचा पाठपुराव्यालाही पाहिजे ते यश आलेले नसल्याची स्थिती आहे.

कोरोना काळात काम करणाऱ्या फ्रंटलाईन वर्करप्रमाणे शिक्षकांनादेखील कोरोना विमाकवच देण्याचे शासनाने जाहीर केेले होते. परंतु वर्ष उलटले तरी त्याची अंमलबजावणी झालेली नाही. राज्यासह जिल्ह्यातदेखील अनेक शिक्षक कोरोना बाधित झाले. काहींना आपला जीव गमवावा लागला तर काहीजण त्यातून बाहेर पडले. या काळात त्यांची व कुटुंबाची अपरिमित हानी झाली. असे असतानाही विमाकवच नसल्यामुळे शिक्षकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागले.

गेल्या वर्षी कोरोनाची पहिली लाट असताना शिक्षकांना क्वारंटाईन केंद्र, कन्टेन्मेंट झोन या ठिकाणी ड्यूटीसह विविध बाबींचे सर्वेक्षणदेखील सोपविण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षणदेखील पार पाडावे लागत होते. ही सगळी कसरत करीत असताना दिवाळीनंतर शाळा सुरू झाल्या. जानेवारीपर्यंत प्राथमिक शाळाही सुरू करण्यात आल्या. त्यामुळे शिक्षक पुन्हा आपल्या शाळेवर जाऊ लागले. आता कोरोनाची दुसरी लाट आली.

ही लाट भयंकर असल्याने प्रशासन त्याच्याशी लढतांना विविध माध्यमांतून प्रयत्न करीत आहेत. कर्मचारी संख्या अपूर्ण पडू लागल्याने शिक्षकांची सेवा अधिग्रहीत करण्यात आली आहे. शिक्षणाधिकारी आपल्या स्तरावरून शिक्षकांच्या नियुक्त्या करीत आहेत.

आता तर माझे कुटुंब माझी जबाबदारी याचे सर्वेक्षण सुरू आहे. त्यासाठी नेमलेल्या गावातील पथकात एक शिक्षक आहे. घरोघरी जाऊन प्रत्येकाची आरोग्याची माहिती घेतली जात आहे. अनेक गावे ही कोरोना बाधित आहेत. अशा ठिकाणी शिक्षक आपली सेवा बजावत आहेत.

यापूर्वी शिक्षकांनी गावात ४५ वर्षावरील नागरिकांचे लसीकरणासाठी सर्वेक्षण केले आहे. असे असताना शिक्षकांना विमाकवच नसल्यामुळे नाराजी पसरली आहे.

विविध शिक्षक संघटनांनी यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू ठेवला आहे. परंतु शासन त्याबाबत फारसे गांभीर्य दाखवत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीची भावना आहे.