शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये वाद वाढला? शिंदेसेनेच्या शहाजीबापू पाटील यांच्या कार्यालयावर छापा; भरारी पथकाकडून झाडाझडती
2
बिनविरोध निवडणूक झालेल्या अनगरमध्ये मोठी घडामोड! राजन पाटलांच्या सुनेची बिनविरोध निवड स्थगित; पुन्हा निवडणूक होणार
3
आधार कार्ड, रेपो दरापासून एलपीजी सिलिंडरच्या किंमतीपर्यंत काय काय झाले बदल, खिशावर थेट होणार परिणाम
4
आमदार ज्ञानेश्वर कटकेंची मर्सिडीज कार चार वर्षांच्या मुलीला धडकली; अपघाताचा CCTV व्हिडिओ आला समोर
5
Stock Market Today: ३५९ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; निफ्टीतही तेजी, हे स्टॉक्स ठरले टॉप गेनर्स
6
'ग्रेगरी थॉमस' नव्हे, 'मिलिंद सेठ'! १४ वर्षांच्या कायदेशीर लढ्यानंतर ३२ वर्षीय तरुणाला मिळाले हक्काचे हिंदू नाव
7
RBI MPC Policy: कर्जदारांना खूशखबर, हप्ता कमी होणार; दरकपात का होणार?
8
लग्नानंतर खंडोबाच्या दर्शनाला गेला सूरज चव्हाण, बायकोला खांद्यावर घेऊन चढला जेजुरी गड; व्हिडीओ व्हायरल
9
व्हॉट्सअ‍ॅपला स्टेटस ठेवून भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलं; पत्नीसह २ मुलांचा खून, पतीनं संपवलं आयुष्य
10
Crime: “तुझे दात चांगले नाहीत,निघून जा! नाही तर, मारून टाकीन” बायकोचा छळ, गुन्हा दाखल
11
भाजपाचं 'ऑपरेशन लोटस'! काँग्रेस अन् शिंदेसेनेला मातब्बर फोडणार; गोल्डन वुमननं हाती घेतलं कमळ
12
डोंबिवली पश्चिमेत शिंदेसेना, भाजप कार्यकर्ते आमने-सामने; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
13
पाकिस्तानी निमलष्करी दलाच्या तळावर हल्ला, बॉम्बस्फोट; तीन जण ठार
14
सनी देओलसोबत किसींग सीन, जुही शूटच्या दिवशीच गायब झालेली; निर्मात्यांनी सांगितला किस्सा
15
IND vs SA: विराट कोहली पुन्हा कसोटी क्रिकेट खेळणार? रांची एकदिवसीय सामन्यानंतर केलं मोठं विधान!
16
Post Office च्या या स्कीममध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹४४,९९५ चं फिक्स व्याज; मिळतेय सरकारची 'गॅरेंटी'
17
जया बच्चन यांनी लग्नाला म्हटलं 'जुनी परंपरा', नात नव्याच्या बाबतीत व्यक्त केली ही इच्छा
18
संसदेतील ग्रंथालय झाले आहे शोभेची वास्तू? ९० टक्क्यांहून अधिक खासदार वाचतच नाहीत!
19
लग्नानंतर देवदर्शनाला जाताना काळाचा घाला; भीषण अपघातात ५ जण जागीच ठार, सुदैवाने नवरा नवरी वाचले
20
Local Body ELections: उमेदवारीसाठी पैसे मागितल्याच्या आरोपावरून भाजपचे दोन गट भिडले
Daily Top 2Weekly Top 5

वीज तारांमुळे तळोदेकरांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 13:17 IST

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : एकाचा बळी गेल्यानंतरही सुधारणा नाही

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 27 : वीज वितरण कंपनीच्या हायटेन्शन लाईंनने शहरातील काही भागातील इमारतींना अक्षरश: स्पर्श केला असल्याचे चित्र दिसून येत असून, येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून वावरत आहेत. याबाबत तेथील  नागरिकांनी सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांकडे तक्रारी करूनही त्या तारा हटविण्याबाबत साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या तारांमुळे आधीच एकाचा जीव गेला आहे. अजून आणखीन बळी जाण्याची वाट कंपनी अधिकारी पाहात आहे का? असा संतप्त प्रश्न संबंधित रहिवाशांनी उपस्थित केला आहे. निदान वरिष्ठ प्रशासनांनी तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शहरातील ग्राहकांच्या वीजपुरवठय़ासाठी तलावडी जवळील 133 के.व्ही. उपकेंद्रातून वीजपुरवठा जोडण्यात आला आहे. याशिवाय तहसील परिसर, साकरलालनगर, विमलनगर, भोईवाडा, कुंभारवाडा, कॉलेज रस्ता, या भागातून वीज कंपनीची हायटेन्शन लाईनदेखील गेली आहे. परंतु या लाईनच्या तारा प्रचंड लोंबकळल्या आहेत. त्या अक्षरश: या भागातील इमारतींना स्पर्श करीत असल्याचे चित्र आहे. साहजिकच हे रहिवाशी छपरावर, स्लॅबवर चढतांना आपला जीव मुठीत घेवून वावरत आहेत. हवेमुळे अथवा झाडांच्या फांद्यामुळे तारा एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा मोठ-मोठय़ा चिंग्या उडत असतात. त्याचबरोबर शॉर्टसर्कीटमुळे वीजेची उपकरणेदेखील सतत जळण्याचा प्रकार घडत असतो. विशेष म्हणजे तहसीलरोड कडील भागात तर तारांचे विदारक चित्र आहे. या भागात सर्वच शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे कामकाजासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही. आधीच तीन-चार वर्षापूर्वी या भागातच एकाचा जीव तारांना स्पर्श झाल्यामुळे गेला होता. तरीही वीज वितरण कंपनीने अजूनही तारा हटविलेल्या नाहीत. वास्तविक येथील रहिवाशांनी हायटेन्शन लाईन हटविण्यासाठी कंपनीच्या संबंधित कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या उपरांत कंपनीच्या अधिका:यांना प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले आहे. संबंधीत अधिका:यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे. प्रस्तावदेखील पाठविला आहे, असे वायदे देत असल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक ही एल.एन.की. लाईन आहे. तिचा प्रवाहदेखील 11 हजार होल्टचा असतो. साहजिकच सावधानता बाळगण्याची आवश्यकता असतांना वीज कंपनीने रहिवाशांच्या सुरक्षिततेकडे उदासिन धोरण घेतले आहे. एवढेच नव्हे तेथे ब्रॅकेट बसविण्याची तसदीदेखील घ्यायला तयार नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. निदान वरिष्ठ प्रशासनाने तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची रहिवाशांची मागणी आहे.