शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
4
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
5
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
6
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
7
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
8
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
9
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
10
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
11
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
12
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
13
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
14
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
15
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
16
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
17
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
18
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
19
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
20
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 

वीज तारांमुळे तळोदेकरांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 13:17 IST

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : एकाचा बळी गेल्यानंतरही सुधारणा नाही

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 27 : वीज वितरण कंपनीच्या हायटेन्शन लाईंनने शहरातील काही भागातील इमारतींना अक्षरश: स्पर्श केला असल्याचे चित्र दिसून येत असून, येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून वावरत आहेत. याबाबत तेथील  नागरिकांनी सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांकडे तक्रारी करूनही त्या तारा हटविण्याबाबत साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या तारांमुळे आधीच एकाचा जीव गेला आहे. अजून आणखीन बळी जाण्याची वाट कंपनी अधिकारी पाहात आहे का? असा संतप्त प्रश्न संबंधित रहिवाशांनी उपस्थित केला आहे. निदान वरिष्ठ प्रशासनांनी तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शहरातील ग्राहकांच्या वीजपुरवठय़ासाठी तलावडी जवळील 133 के.व्ही. उपकेंद्रातून वीजपुरवठा जोडण्यात आला आहे. याशिवाय तहसील परिसर, साकरलालनगर, विमलनगर, भोईवाडा, कुंभारवाडा, कॉलेज रस्ता, या भागातून वीज कंपनीची हायटेन्शन लाईनदेखील गेली आहे. परंतु या लाईनच्या तारा प्रचंड लोंबकळल्या आहेत. त्या अक्षरश: या भागातील इमारतींना स्पर्श करीत असल्याचे चित्र आहे. साहजिकच हे रहिवाशी छपरावर, स्लॅबवर चढतांना आपला जीव मुठीत घेवून वावरत आहेत. हवेमुळे अथवा झाडांच्या फांद्यामुळे तारा एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा मोठ-मोठय़ा चिंग्या उडत असतात. त्याचबरोबर शॉर्टसर्कीटमुळे वीजेची उपकरणेदेखील सतत जळण्याचा प्रकार घडत असतो. विशेष म्हणजे तहसीलरोड कडील भागात तर तारांचे विदारक चित्र आहे. या भागात सर्वच शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे कामकाजासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही. आधीच तीन-चार वर्षापूर्वी या भागातच एकाचा जीव तारांना स्पर्श झाल्यामुळे गेला होता. तरीही वीज वितरण कंपनीने अजूनही तारा हटविलेल्या नाहीत. वास्तविक येथील रहिवाशांनी हायटेन्शन लाईन हटविण्यासाठी कंपनीच्या संबंधित कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या उपरांत कंपनीच्या अधिका:यांना प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले आहे. संबंधीत अधिका:यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे. प्रस्तावदेखील पाठविला आहे, असे वायदे देत असल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक ही एल.एन.की. लाईन आहे. तिचा प्रवाहदेखील 11 हजार होल्टचा असतो. साहजिकच सावधानता बाळगण्याची आवश्यकता असतांना वीज कंपनीने रहिवाशांच्या सुरक्षिततेकडे उदासिन धोरण घेतले आहे. एवढेच नव्हे तेथे ब्रॅकेट बसविण्याची तसदीदेखील घ्यायला तयार नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. निदान वरिष्ठ प्रशासनाने तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची रहिवाशांची मागणी आहे.