शहरं
Join us  
Trending Stories
1
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
2
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
3
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
4
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
5
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
6
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
7
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
8
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
9
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
10
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
11
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
12
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
13
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
14
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
15
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
16
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
17
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
18
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
19
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
20
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न

वीज तारांमुळे तळोदेकरांचा जीव धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 13:17 IST

वीज वितरण कंपनीचे दुर्लक्ष : एकाचा बळी गेल्यानंतरही सुधारणा नाही

ऑनलाईन लोकमतनंदुरबार, दि़ 27 : वीज वितरण कंपनीच्या हायटेन्शन लाईंनने शहरातील काही भागातील इमारतींना अक्षरश: स्पर्श केला असल्याचे चित्र दिसून येत असून, येथील रहिवाशी जीव मुठीत घेवून वावरत आहेत. याबाबत तेथील  नागरिकांनी सातत्याने वीज वितरण कंपनीच्या अधिका:यांकडे तक्रारी करूनही त्या तारा हटविण्याबाबत साफ दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या तारांमुळे आधीच एकाचा जीव गेला आहे. अजून आणखीन बळी जाण्याची वाट कंपनी अधिकारी पाहात आहे का? असा संतप्त प्रश्न संबंधित रहिवाशांनी उपस्थित केला आहे. निदान वरिष्ठ प्रशासनांनी तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.शहरातील ग्राहकांच्या वीजपुरवठय़ासाठी तलावडी जवळील 133 के.व्ही. उपकेंद्रातून वीजपुरवठा जोडण्यात आला आहे. याशिवाय तहसील परिसर, साकरलालनगर, विमलनगर, भोईवाडा, कुंभारवाडा, कॉलेज रस्ता, या भागातून वीज कंपनीची हायटेन्शन लाईनदेखील गेली आहे. परंतु या लाईनच्या तारा प्रचंड लोंबकळल्या आहेत. त्या अक्षरश: या भागातील इमारतींना स्पर्श करीत असल्याचे चित्र आहे. साहजिकच हे रहिवाशी छपरावर, स्लॅबवर चढतांना आपला जीव मुठीत घेवून वावरत आहेत. हवेमुळे अथवा झाडांच्या फांद्यामुळे तारा एकमेकांना स्पर्श करतात तेव्हा मोठ-मोठय़ा चिंग्या उडत असतात. त्याचबरोबर शॉर्टसर्कीटमुळे वीजेची उपकरणेदेखील सतत जळण्याचा प्रकार घडत असतो. विशेष म्हणजे तहसीलरोड कडील भागात तर तारांचे विदारक चित्र आहे. या भागात सर्वच शासकीय कार्यालय आहेत. त्यामुळे कामकाजासाठी नागरिकांची मोठी वर्दळ असते. दुर्घटनेची शक्यता नाकारता येणार नाही. आधीच तीन-चार वर्षापूर्वी या भागातच एकाचा जीव तारांना स्पर्श झाल्यामुळे गेला होता. तरीही वीज वितरण कंपनीने अजूनही तारा हटविलेल्या नाहीत. वास्तविक येथील रहिवाशांनी हायटेन्शन लाईन हटविण्यासाठी कंपनीच्या संबंधित कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला आहे. या उपरांत कंपनीच्या अधिका:यांना प्रत्यक्ष निदर्शनास आणून दिले आहे. संबंधीत अधिका:यांनी वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा केला आहे. प्रस्तावदेखील पाठविला आहे, असे वायदे देत असल्याचे नागरिक सांगतात. वास्तविक ही एल.एन.की. लाईन आहे. तिचा प्रवाहदेखील 11 हजार होल्टचा असतो. साहजिकच सावधानता बाळगण्याची आवश्यकता असतांना वीज कंपनीने रहिवाशांच्या सुरक्षिततेकडे उदासिन धोरण घेतले आहे. एवढेच नव्हे तेथे ब्रॅकेट बसविण्याची तसदीदेखील घ्यायला तयार नसल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. निदान वरिष्ठ प्रशासनाने तरी याप्रकरणी गंभीर दखल घेण्याची रहिवाशांची मागणी आहे.