शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
Canara Bank मध्ये ४४४ दिवसांच्या FD मध्ये २ लाख जमा केल्यास किती मिळेल व्याज, खात्यात एकूण किती रक्कम येईल?
4
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
5
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
6
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
7
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
8
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
9
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
10
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
11
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
12
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
13
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
14
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
15
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
16
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
17
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
18
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
19
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
20
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
Daily Top 2Weekly Top 5

ऐच्छिक असतानाही कर्जातून कापली गेली विम्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2020 13:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती़ यातून यंदा कर्ज घेताना पिक विमा ऐच्छिक करण्यात आला होता़ परंतू यानंतरही असंख्य शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्याची रक्कम कापली गेली असून हे कसे, झाले हा विचार करुन आता शेतकरी हैराण झाले आहेत़
जिल्ह्यात दरवर्षी खरीप पिकांची लागवड करणाºया शेतकºयांपैकी ४० टक्के शेतकरी पिक कर्ज घेतात़ जिल्हा बँकेमार्फत सोसायटी, प्रत्यक्ष बँक शाखांसह राष्ट्रीयकृत बँकांकडून हे कर्ज घेण्यात येते़ यंदा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्व बँकांनी १०० टक्के कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते़ परंतु अद्याप बँकांचे कामकाज रेंगाळल्याचे चित्र आहे़ महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेतून १३ हजार शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली आहे़ परंतू यातील बहुतांश शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहेत़ एकीकडे हे शेतकरी कर्जापासून वंचित असताना दुसरीकडे कर्ज देणाºया बँकांनी शेतकºयांच्या कर्जातून विम्याची रक्कम कापून घेत कर्ज दिल्याचे प्रकार समोर आले आहेत़ या प्रकारात शेतकºयांची चूक दर्शवत बँकांनी हात वर केले आहेत़ शेतकºयांनी कर्ज घेताना बँकांकडे भरलेल्या अर्जात विमा घ्यावी किंवा नाही, अशा खूणा करावयाच्या होत्या़ यातून बºयाच बँकांचे कर्जाचे अर्ज हे अत्यंत किचकट आणि इंग्रजाळलेले असल्याने शेतकºयांनी हा कॉलम सोडून दिला होता़ मात्र चाणाक्ष बँकांनी होकार असो किंवा नसो शेतकºयांचा विमा कापून कर्जाची रक्कम दिली आहे़ असे असले तरी ३१ जुलै रोजी पूर्ण झालेल्या पिक विम्याच्या मुदतीत जिल्ह्यातील साडेचार हजारापेक्षा अधिक शेतकºयांनी विमा केलेला नसल्याची माहिती आहे़ यातून कर्ज वाटपात बँका उघड्या पडत असल्याचे समोर आले आहे़ जिल्हा बँकेने शेतकºयांना वाटप केलेले कर्ज हे १० ते ३० हजाराच्या घरात आहे़ यातही बºयाच शेतकºयांचा विमा कापला गेला असल्याने त्यांना तुरळक रक्कम भेटली आहे़

शासनाकडून यंदा प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै देण्यात आली होती़ हा विमा ऐच्छिक करण्यात आल्याचे आधीच घोषित होते़ परंतू शेतकऱ्यांनी अर्जावर हवे किंवा नाही अशी खूण न केल्यास सरसकट विमा रक्कम कापून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते़ यात आदेशांचे बँकांनी तंतोतंत पालन केले आहे़
जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांनी यंदा विमा केल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातही हे शेतकरी जिल्हा बँकेचे सभासद असल्याचे सांगण्यात आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकेत विम्यात सहभागी होण्यासाठी सीएससी सेंटरवर जावून अर्ज करणे बंधनकारक होते़ सीएससी सेंटर्सची जिल्ह्यातील आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ ही आकडेवारी १५ आॅगस्टसमोर येणार आहे़ यात दीड हजार शेतकºयांचा समावेश होवून पिक विम्याची आकडेवारी ही सहा हजारापर्यंत जाण्याची चिन्हे आहेत़
बºयाच शेतकºयांच्या खात्यातून ३१ जुलै नंतर रक्कम कापली गेल्याचे संदेश येऊ लागल्यानंतर या प्रकाराचा ग्रामीण भागात उलगडा झाला आहे़ सोमवारी बºयाच शेतकºयांनी बँकांना संपर्क केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़ शासनाच्या निर्र्देशानुसार ही रक्कम कापली गेली असल्याचे बँकांच्या प्रशासनाकडून शेतकºयांना सांगण्यात आले आहे़