शहरं
Join us  
Trending Stories
1
पवार वि. पवार वादाला मतदार कंटाळला; बारामतीत टक्का घसरला
2
तीन ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न; तरुणावर गुन्हा दाखल; सोलापूर जिल्ह्यातील बागलवाडी येथील बूथवरील प्रकार
3
‘सेक्स स्कँडल’च्या २५,००० पेन ड्राइव्हचे पोलिसांनीच वाटप केले; कुमारस्वामी यांचा आरोप, मोदीही प्रथमच बोलले
4
अरविंद केजरीवाल यांना जामीन देण्यास सुप्रीम कोर्ट अनुकूल; पण...
5
'तुला सहानंतर कोण आहे? बारामतीचा कोण येत नाही'; आमदार दत्ता भरणेंची शरद पवार गटाच्या कार्यकर्त्याला शिवीगाळ
6
मतदानाच्या दिवशी बारामतीत नात्यांचा ट्विस्ट, सुप्रिया सुळेंनी घेतली अजित पवारांच्या आईची भेट; तर अजित पवार म्हणाले... मेरी माँ मेरे साथ है!
7
‘मुस्लीम आरक्षण’ नवा मुद्दा; प्रचारात होतोय वारंवार उल्लेख, मोदींच्या जाळ्यात विरोधक अडकले
8
१० लाख इनाम असलेल्या बासित दारसह ४ अतिरेकी चकमकीत ठार
9
४ जून ‘इंडिया आघाडी’ची एक्स्पायरी डेट : पंतप्रधान मोदी 
10
घराण्याचा वारसा जिंकणार की नव्या चेहऱ्याला कौल मिळणार? विखे-लंके लढत : महसूलमंत्र्यांची प्रतिष्ठा पणाला
11
‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार
12
डाॅक्टरांच्या मनाईनंतरही धोनी खेळतोय आयपीएल; याच्या मांसपेशी फाटल्या
13
दिल्लीच्या प्ले ऑफच्या आशा कायम; राजस्थानचा २० धावांनी पराभव; संजू सॅमसनची अपयशी झुंज
14
बीअर शॉपीच्या परवान्यासाठी लाच; उत्पादन शुल्क अधीक्षकासह तीन अधिकारी जाळ्यात
15
‘मॅट’ने केले राज्य सरकारचे पोस्टमार्टेम; वैद्यकीय शिक्षण संचालकांची नियुक्ती तत्काळ संपुष्टात आणण्याचे आदेश; नवीन संचालक नेमा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

ऐच्छिक असतानाही कर्जातून कापली गेली विम्याची रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 1:25 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पीक विम्याचा परतावा मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी कर्जातून कापल्या जाणाºया विमा पद्धतीवर नाराजी व्यक्त केली होती़ यातून यंदा कर्ज घेताना पिक विमा ऐच्छिक करण्यात आला होता़ परंतू यानंतरही असंख्य शेतकऱ्यांच्या पीक कर्जातून विम्याची रक्कम कापली गेली असून हे कसे, झाले हा विचार करुन आता शेतकरी हैराण झाले आहेत़जिल्ह्यात दरवर्षी खरीप पिकांची लागवड करणाºया शेतकºयांपैकी ४० टक्के शेतकरी पिक कर्ज घेतात़ जिल्हा बँकेमार्फत सोसायटी, प्रत्यक्ष बँक शाखांसह राष्ट्रीयकृत बँकांकडून हे कर्ज घेण्यात येते़ यंदा जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने सर्व बँकांनी १०० टक्के कर्ज पुरवठा करण्याचे नियोजन करण्यात आले होते़ परंतु अद्याप बँकांचे कामकाज रेंगाळल्याचे चित्र आहे़ महात्मा ज्योतिबा फुले कृषी कर्जमुक्ती योजनेतून १३ हजार शेतकºयांना कर्जमाफी देण्यात आली आहे़ परंतू यातील बहुतांश शेतकरी पिक कर्जापासून वंचित आहेत़ एकीकडे हे शेतकरी कर्जापासून वंचित असताना दुसरीकडे कर्ज देणाºया बँकांनी शेतकºयांच्या कर्जातून विम्याची रक्कम कापून घेत कर्ज दिल्याचे प्रकार समोर आले आहेत़ या प्रकारात शेतकºयांची चूक दर्शवत बँकांनी हात वर केले आहेत़ शेतकºयांनी कर्ज घेताना बँकांकडे भरलेल्या अर्जात विमा घ्यावी किंवा नाही, अशा खूणा करावयाच्या होत्या़ यातून बºयाच बँकांचे कर्जाचे अर्ज हे अत्यंत किचकट आणि इंग्रजाळलेले असल्याने शेतकºयांनी हा कॉलम सोडून दिला होता़ मात्र चाणाक्ष बँकांनी होकार असो किंवा नसो शेतकºयांचा विमा कापून कर्जाची रक्कम दिली आहे़ असे असले तरी ३१ जुलै रोजी पूर्ण झालेल्या पिक विम्याच्या मुदतीत जिल्ह्यातील साडेचार हजारापेक्षा अधिक शेतकºयांनी विमा केलेला नसल्याची माहिती आहे़ यातून कर्ज वाटपात बँका उघड्या पडत असल्याचे समोर आले आहे़ जिल्हा बँकेने शेतकºयांना वाटप केलेले कर्ज हे १० ते ३० हजाराच्या घरात आहे़ यातही बºयाच शेतकºयांचा विमा कापला गेला असल्याने त्यांना तुरळक रक्कम भेटली आहे़

शासनाकडून यंदा प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै देण्यात आली होती़ हा विमा ऐच्छिक करण्यात आल्याचे आधीच घोषित होते़ परंतू शेतकऱ्यांनी अर्जावर हवे किंवा नाही अशी खूण न केल्यास सरसकट विमा रक्कम कापून घेण्याचे आदेश काढण्यात आले होते़ यात आदेशांचे बँकांनी तंतोतंत पालन केले आहे़जिल्ह्यातील साडेचार हजार शेतकऱ्यांनी यंदा विमा केल्याची माहिती देण्यात आली आहे़ यातही हे शेतकरी जिल्हा बँकेचे सभासद असल्याचे सांगण्यात आले आहे़ राष्ट्रीयकृत बँकेत विम्यात सहभागी होण्यासाठी सीएससी सेंटरवर जावून अर्ज करणे बंधनकारक होते़ सीएससी सेंटर्सची जिल्ह्यातील आकडेवारी अद्याप समोर आलेली नाही़ ही आकडेवारी १५ आॅगस्टसमोर येणार आहे़ यात दीड हजार शेतकºयांचा समावेश होवून पिक विम्याची आकडेवारी ही सहा हजारापर्यंत जाण्याची चिन्हे आहेत़बºयाच शेतकºयांच्या खात्यातून ३१ जुलै नंतर रक्कम कापली गेल्याचे संदेश येऊ लागल्यानंतर या प्रकाराचा ग्रामीण भागात उलगडा झाला आहे़ सोमवारी बºयाच शेतकºयांनी बँकांना संपर्क केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आहे़ शासनाच्या निर्र्देशानुसार ही रक्कम कापली गेली असल्याचे बँकांच्या प्रशासनाकडून शेतकºयांना सांगण्यात आले आहे़