शहरं
Join us  
Trending Stories
1
Controversial Decision? आयुष बदोनीची विकेट वादात अडकली, KL Rahul संतापला, MI च्या बाजूने झुकवलेला सामना, Video 
2
लखनौ सुपर जायंट्सचा विजय! Mumbai Indians प्ले ऑफसाठी आता दुसऱ्यांवर अवलंबून  
3
एका महिन्यानंतर पाऊसच पाऊस, भारतासह या शेजारील देशांनाही मिळणार दिलासा
4
आघाडीच्या फलंदाजांनी शस्त्र टाकल्यानंतर...! हार्दिक पांड्याचा रोख रोहित शर्माकडे? म्हणाला... 
5
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
6
₹42 च्या शेअरवर गुंतवणूकदारांची झुंबड, लागलं 20% चं अप्पर सर्किट; जपानमधून मिळाली आहे मोठी ऑर्डर!
7
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : आरोपी समीर कुलकर्णी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा, खटल्याला स्थगिती
8
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
9
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
10
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
11
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
12
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
13
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
14
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर, पण बाळासह आईचा मृत्यू
15
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
16
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
17
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
18
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
19
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
20
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल

लांबलेल्या पावसामुळे साखर हंगामही लांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 12:33 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लांबलेला पाऊस आणि ऊसाची कमतरता यामुळे यंदा साखर हंगाम लांबण्याची शक्यता आहे. शासनाने आधीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लांबलेला पाऊस आणि ऊसाची कमतरता यामुळे यंदा साखर हंगाम लांबण्याची शक्यता आहे. शासनाने आधीच 1 डिसेंबरनंतर कारखाने सुरू करण्याचे आदेश दिलेले आहेत. दरम्यान, यंदा ऊसाची कमतरता असल्यामुळे ऊस पळवापळवीला जोर येण्याची शक्यता आहे. दरवर्षी साखर हंगामाला  नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुस:या आठवडय़ापासून सुरुवात होते. मुबलक प्रमाणात ऊस उपलब्ध राहिल्यास हंगाम मार्च, एप्रिल महिन्यार्पयत सुरू असतो. यंदाची नैसर्गिक स्थिती लक्षात घेता आणि उपलब्ध ऊस पहाता हंगाम उशीराने सुरू होऊन लवकर बंद होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांनी गाळप हंगामाची तयारी पुर्ण केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसात औपचारिक शुभारंभ होऊन प्रत्यक्षात डिसेंबरच्या पहिल्या आठवडय़ापासून गाळपाला सुरुवात होणार आहे. पावसाळा लांबल्याने उशीरा..यंदा पावसाळा लांबला, नोव्हेंबर महिन्याच्या दुस:या आठवडय़ार्पयत अवकाळी पाऊस देखील राहिला. यामुळे यंदा साखर कारखाने सुरू होण्यास विलंब होणार हे स्पष्टच   होते. त्यातच राज्यातील राजकीय अस्थिरता  देखील कारणीभूत ठरली आहे. पावसामुळे शेत, शिवारात अजूनही ओल आहे. त्यामुळे ऊस तोडणी करणे, वाहने शेत शिवारातील रस्त्यांवरून नेणे आणि वाहतूक     करणे ही बाब मोठी दिव्याची ठरणार आहे. अनेक भागातील नाले अजूनही प्रवाही आहेत. शेतशिवारातील रस्त्यांना नाल्याचे स्वरूप आले आहे. त्यामुळे ऊस वाहतुकीची मोठी डोकेदुखी यंदा राहण्याची शक्यता आहे. 1 डिसेंबरनंतरच सुरूयंदाचा साखर हंगाम 1 डिसेंबर नंतरच सुरु करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतलेला आहे. दरवर्षी साधारणत: 20 नोव्हेंबरनंतर साखर हंगाम सुरू होत असतो. यंदा ऊसाची कमतरता आणि इतर कारणांमुळे 1 डिसेंबरनंतर साखर कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. असे असले तरी शुभमूहर्त पाहून 1 डिसेंबरच्या आत देखील गाळप हंगामाचा शुभारंभ करता येणार आहे. परंतु प्रत्यक्षात गाळप 1 डिसेंबरनंतर होणार आहे. या दृष्टीने जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखान्यांची नियोजन करून ठेवले आहे. 15 ते 25 नोव्हेंबर दरम्यान गाळप हंगामाचा औपचारिक शुभारंभ जिल्ह्यातील तिन्ही साखर कारखाने करण्याची शक्यता आहे.ऊसाची कमरता..गेल्या वर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे ऊस लागवड कमी झाली होती. त्याचा फटका यंदा साखर हंगामाला बसणार आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा निम्मे क्षेत्रात देखील ऊस नसल्याचे चित्र आहे. साधारणत: 28 ते 30 हजार एकरावर ऊस उपलब्ध असल्याचे चित्र आहे. तिन्ही साखर कारखान्यांची गाळप क्षमता  लक्षता घेता हा ऊस पूरेसा नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे यंदा ऊस पळवापळवीचे संकट कारखान्यांसमोर राहणार आहे. गेल्या वर्षी ऊस क्षेत्र मोठय़ा प्रमाणावर होते. त्यामुळे मार्च, एप्रिलर्पयत साखर कारखाने सुरू राहिले होते. यंदा परिस्थिती याउलट आहे.दराबाबत उत्सूकताऊस दराबाबत आता शेतक:यांमध्ये उत्सूकता आहे. शासनाचा एफआरपी आणि त्याउपर कारखाने किती भाव देऊ शकतात याकडे ऊस उत्पादक शेतक:यांचे लक्ष लागून आहे. 

जिल्ह्यात सातपुडा साखर कारखाना व आदिवासी सहकारी साखर कारखाना हे सहकार तत्वावरील कारखाने तर आयन शुगर लिमिटेड हा खाजगी तत्वावरील साखर कारखाना आहे. या कारखान्यांनी ऊसतोड मजुर आणण्यासाठी मराठवाडासह राज्यातील विविध भागात आपले अधिकारी पाठविलेले आहेत. मजुर व त्यांचे मुकाडदम यांना आगावू रक्कमम देवून त्यांना कारखाना कार्यस्थळी आणावे लागते.  संबधीत अधिकारी गेल्या आठ ते दहा दिवसांपासून संबधीत भागात तळ ठोकून आहेत. परंतु पाऊस लांबल्याने मजुर निघत नसल्यची स्थिती आहे.