शहरं
Join us  
Trending Stories
1
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
2
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
3
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
4
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
5
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
6
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
7
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
8
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
9
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
10
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
11
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
12
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
13
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
14
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
15
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
16
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
17
"वादळ येतंय, कुणीही रोखू शकणार नाही!" डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने जगात खळबळ; नक्की संकेत कसले?
18
ओलाला गाशा गुंडाळावा लागणार! ओबेन रोर इवो इलेक्ट्रिक बाईक लाँच; १८० किमी रेंज आणि हायटेक फीचर्स, किंमत फक्त ९९,९९९ रुपये
19
Tech Tips : उन्हात तुमचा फोन होऊ शकतो टाइम बॉम्ब! 'या' एका चुकीमुळे स्मार्टफोन कायमचा होईल खराब
20
अमेरिकन नौदलावर इराणचा मोठा 'सायबर स्ट्राईक'! २,३७९ सैनिकांचा सीक्रेट डेटा लीक
Daily Top 2Weekly Top 5

खतांचा रॅक लागत नसल्याने तळोदा तालुक्यात टंचाई, शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:31 IST

तळोदा : येथे सर्वच रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली असून, पिकांना खताची मात्रा देताना शेतकऱ्यांची दमछाक वाढली आहे. खत ...

तळोदा : येथे सर्वच रासायनिक खतांची टंचाई निर्माण झाली असून, पिकांना खताची मात्रा देताना शेतकऱ्यांची दमछाक वाढली आहे. खत उत्पादक खतांच्या दर निश्चितीची वाट पाहत असल्यामुळे रॅक लागत नसल्याचे म्हटले जात आहे. तथापि, प्रशासनाने याप्रकरणी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.

तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना गेल्या दहा, बारा दिवसांपासून रासायनिक खते मिळत नसल्याचा तक्रारी आहेत. त्यातही युरियाबरोबरच सुपर फॉस्फेट, डी. ए. पी. अशी पिकांसाठी पोषक असलेली व वाढ करणारी प्रमुख खते तळोदा शहरातील विक्रेत्यांकडे उपलब्ध नसल्यामुळे पिकांना मात्रा देता येत नाही. शेतकरी या खतांसाठी नंदुरबार, शहदा, कुकरमुंदा येथे जात आहेत. परंतु, तरीही खते मिळत नसल्याचे शेतकरी सांगतात. खतांची मात्रा पिकांना मिळत नसल्यामुळे त्यांची वाढ खुंटली आहे. साहजिकच शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तळोदा तालुक्यात यंदा चांगल्या पर्जन्यमानामुळे केळी, पपई, ऊस, आदी नगदी पिकांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढले आहे. वास्तविक खरीप हंगाम अतिपर्जन्यवृष्टीने हातचा गेला होता.

साहजिकच शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. असे असताना शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने नगदी पिके लावली. मात्र, रासायनिक खतांच्या मात्रेअभावीही पिके तग धरून उभी आहेत. गेल्या बारा दिवसांपासून खतांची टंचाई निर्माण झाली असताना ती तातडीने उपलब्ध करून देण्याची अपेक्षा असताना प्रशासनानेही हात झटकल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. खतांच्या टंचाईप्रकरणी येथील कृषी कार्यालयाकडे विचारणा केली असता, खतांचे दर निश्चित झाले नसल्यामुळे रॅक लागत नसल्याचे सांगण्यात आले. तरीही दोन, तीन दिवसात खत येणार असल्याचे सांगितले. आधीच ग्रामीण भागात दहा-बारा तासांचे भारनियमनाव्यतिरिक्त विजेचा लपंडाव सुरू असतो. त्यामुळे कसेबसे पाण्याचे नियोजन करून शेतकरी आपली पिके वाचविण्याचा प्रयत्न करून वाढवत असतो. मात्र, रासायनिक खतांच्या टंचाईने पिकांची परिस्थिती नाजूक बनल्याने शेतकरी हतबल झाला आहे.

चौकट.

गोणीमागे २०० रुपये अधिक. खतांची टंचाई लक्षात घेऊन ज्या व्यावसायिकांकडे खत शिल्लक आहे, असे व्यावसायिक खताच्या गोणीमागे १५० ते २०० रुपये अधिक आकारात असल्याचे शेतकरी सांगतात. त्यामुळे तालुका कृषी प्रशासनाने अशांची चौकशी करावी, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. अन्यथा शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला आहे.

कोट...

मोठ्या मेहनतीने पाण्याचे योग्य नियोजन करून ऊसाचे पीक वाढवले आहे. आता त्याला खताची मात्रा द्यायची आहे. परंतु, दहा-बारा दिवसांपासून सर्वच खते मिळत नसल्यामुळे पिकाची वाढ थांबली आहे. प्रशासनाने खत तातडीने उपलब्ध करावे.

- धनराज कदम, शेतकरी, रांजणी तळोदा.

कोट...

वरिष्ठ पातळीवरच रासायनिक खतांच्या पुरवठा होत नाही. येत्या दोन दिवसात रॅक लागणार आहे.

- नरेंद्र महाले, तालुका कृषी अधिकारी, तळोदा