शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
2
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
3
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
4
"ज्या बूथवर काँग्रेसला एक मतही मिळणार नाही, तिथे 25 लाखांची विकासकामं केली जातील"
5
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
6
कोव्हिशिल्ड साईड इफेक्ट: दोन मृत मुलींचे पालक सीरम इन्स्टिट्यूटला कोर्टात खेचणार
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : भाजपचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण अपक्ष निवडणूक लढवणार
8
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...
9
ठाकरे गटाला पॉर्न संस्कृती रुजवायची आहे का? चित्रा वाघ यांचा हल्लाबोल
10
Rahul Gandhi : "न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी म्हणजे सरकारी नोकऱ्या नाहीत, आरक्षण नाही"; राहुल गांधींचा घणाघात
11
उद्धव ठाकरेंनी मागितली संभाजीराजेंची माफी; "आम्ही शेण खाल्लं म्हणून तुम्ही..."
12
Lok Sabha Election 2024: लोकसभेला 'मविआ' किती जागा जिंकणार? विधानसभा निवडणुकीत काय घडणार? Jayant Patil यांनी केले २ मोठे दावे
13
Health Tips: उन्हाळ्यात प्रकृती थंड ठेवण्यासाठी आहारतज्ज्ञ ऋजुता दिवेकरांनी सांगितला SST फॉर्म्युला!
14
मनसे नेते अमित ठाकरेंचं शालेय शिक्षणमंत्र्यांना पत्र; RTE प्रवेश प्रक्रियेवरून नाराजी
15
'देशात काँग्रेस संपत असताना पाकिस्तानला रडू येतंय'; व्होट जिहादवरुन मोदींचा निशाणा
16
Guru Asta 2024: गुरु अस्त काळात होणार राजकीय उलथापालथ? मंगल कार्य वर्ज्य? वाचा उपाययोजना!
17
Gold Price Today: सोन्याच्या किंमतीत झाली मोठी घसरण, ७५००० च्या उच्चांकावरून ७१००० रुपयांवर आलं गोल्ड
18
Goldy Brar Murder : गोल्डी ब्रारच्या हत्येची बातमी अफवा; अमेरिकन पोलिसांनी केले स्पष्ट
19
कोकणात दादा आणि भाईंचं मनोमीलन कसं झालं? खुद्द केसरकर यांनीच सांगितली 'इनसाईड स्टोरी'   
20
ब्रिजभूषण यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपा तिकीट देणार, सूत्रांची माहिती

बारामुखी धबधबा परिसरातील सुरक्षा वा:यावरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 12:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सातपुडा चांगलाच सजला आहेत. सद्यस्थितीत पाऊस बंद असून सुट्टीच्या दिवशी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सातपुडा चांगलाच सजला आहेत. सद्यस्थितीत पाऊस बंद असून सुट्टीच्या दिवशी तरुणाईला सातपुडय़ातील निसर्ग सौंदर्याचा मोह आवरता येत नाही. त्यात बिलगाव ता.धडगाव येथील बारामुखी धबधब्याचा विशेष उल्लेख करता येतो. परंतु पर्यटकांसाठी बिलगाव येथे आवश्यक त्या सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हे ठिकाण धोक्याचे ठरत आहे.  सातपुडय़ात यंदाच्या पावसामुळे काही प्रमाणातील नुकसान वगळता पाऊस चांगलाच  झाल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे पर्यटकांना खुणावणारी  सातपुडय़ातील स्थळांच्या सौंदर्यात मोठी भर पडली आहे. याशिवाय  लहान-मोठे धबधबेही ओसंडून कोसळत असल्याने हे ठिकाण जिल्ह्यातील उत्साही तरुणांना खुणावत आहे. सुटिचा दिवस राहिल्यास तरुणाईची पावले आपसुकच सातपुडय़ाकडे वळत आहे.  पर्यटकांना खुणावणा:या स्थळांमध्ये तोरणमाळनंतर बिलगाव ता. धडगाव येथील बारामुखी धबधब्याचा प्रामुख्याने उल्लेख होत आहे. याशिवाय तळोदा तालुक्यातील वाल्हेरीचा देखी उल्लेख होत आहे. बिलगावच्या धबधबा हा बारा धारांचा असल्यामुळे त्याला बारामुखी म्हटले जात असून त्याचे प्रत्येक पर्यटकांना आकर्षण आहे. तेथे भेट देणा:या पर्यटकांची संख्या लक्षात घेत तेथे सुरक्षा व्यवस्था  बळकट होणे आवश्यक आहे. सुविधेसाठी मागणीही होत आहे, परंतु कुठलीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे हे स्थळ वर्षानुवर्षे असुरक्षित राहिले  आहे. सुरक्षा व्यवस्था पुरविण्यासाठी  पर्यटन स्थळ विकासांतर्गत शासनामार्फत निधी उपलब्ध होणे आवश्यक आहे. यामुळे या ठिकाणाचा विकासापाठोपाठ तेथे सुरक्षेच्या सुविधा होतील, पर्यायाने  पर्यटकांच्या संख्येत भर पडत शिवाय स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. निधीसाठी शासनस्तरावरुन कार्यवाही होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. तीन वर्षापूर्वी तळोदा येथील तळोदा येथील सात युवक तेथे गेले होते. त्यापैकी पाटील परिवारातील दोघा संख्ख्या भावांचा या धबधब्यात बुडून दुर्दैवी अंत झाला होता. या घटनेमुळे तेथील असुरक्षीतता शासनाच्या निदर्शनास येऊन तेथे सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील असे वाटले होते. परंतु पर्यटकांची ही भाबडी आशा निराधार ठरली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी योग्य उपाययोजांनी गरज आहे. उत्साही तरुण आकर्षणामुळे धोका पत्करुनही या ठिकाणी नेहमी वावरताना दिसून येतात. त्यांच्या सुरक्षेसाठी सुविधा करता आली नसली तरी या धबधब्याची चांगली माहिती असलेल्या व्यक्तीला तेथे नेमणे गरजेचे आहे. पावसाळ्यातही तरुणाई त्याकडे वळत असल्याने धोक्याची पातळी अधिक वाढली आहे.