शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

देखावे, मिरवणुकांना यंदा फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : यंदाच्या गणेशोत्सवाची भव्यदिव्यता कोरोनामुळे झाकाळली जाणार आहे. राज्य शासनाचे आवाहन, स्थानिक प्रशासनाने मंडळांना घातलेली ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : यंदाच्या गणेशोत्सवाची भव्यदिव्यता कोरोनामुळे झाकाळली जाणार आहे. राज्य शासनाचे आवाहन, स्थानिक प्रशासनाने मंडळांना घातलेली साद यामुळे अनेक मंडळे यंदा अगदी साधेपणाने उत्सव साजरा करणार आहे. काही मंडळांनी तशी घोषणा देखील केली आहे. दरम्यान यंदा गणेश मंडळांची संख्या रोडावणार असल्याचे चिन्हे आहेत. अद्यापपर्यंत मोजक्याच मंडळांनी पोलीस प्रशासनाकडे अर्ज केला आहे.
कोरोनाने यंदा सार्वजनिक उत्सवांमधील उत्साहाला देण्यास भाग पाडले आहे. गेल्या पाच महिन्यातील सर्वच उत्सव व धार्मिक कार्यक्रमांना त्याच फटका सहन करावा लागला आहे. आता सर्वाधिक चैतन्य आणि उत्साहाचा असलेल्या गणेशोत्सवाला देखील कोरोनामुळे काही प्रमाणात फाटा द्यावा लागणार आहे. सामाजिक भान राखत काही मंडळांनी उत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरवून घेतले आहे.
गणेशमूर्ती उंचीची मर्यादा
यंदा गणेश मूर्तीची उंची कमाल चार फुटापर्यंत ठेवण्याचे आवाहन राज्य शासनाने केले आहे. त्याअंतर्गत तसा नियमही घालून दिला आहे. त्यामुळे नंदुरबारातील सार्वजनिक गणेश मंडळांची उंच मूर्तीची परंपरा यंदा खंडित करावी लागणार आहे. किमान पाच फूट ते जास्तीत जास्त २० फुटापर्यंत मूर्ती स्थापन करण्याची येथील मंडळांची परंपरा आहे. मंडळांमध्ये यासाठी स्पर्धाही असते. परंतु यंदा उंच मूर्तीला फाटा द्यावा लागणार आहे.
सजावट आणि देखावेही नाही
यंदा गणेश मंडळांनी सजावट आणि देखावे याबाबतही उदासिनता दाखविली आहे. सजावट आणि देखावे उभारल्यास ते पहाण्यासाठी भाविकांची गर्दी होणार आणि कोरोनाचे सर्व नियम पायदळी तुडवावे लागणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे देखाव्यांबाबतही यंदा कुणीही मंडळ पुढाकार घेतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे. देखावे तयार करण्यासाठी गणेश मंडळांचे मंडपाच्या ठिकाणी महिनाभर आधीपासूनच तयारी सुरू होत असते. परंतु यंदा अवघ्या १७ दिवसांवर बाप्पांचा उत्सव येऊन देखील कुणीही मंडळ त्यासाठी पुढाकार घेतांना दिसून येत नसल्याची स्थिती आहे. देखाव्यांसोबत सजावटीलाही यंदा फाटा दिला जाणार आहे. भव्यदिव्य मंडप, आकर्षक विद्युत रोषणाई देखील मोजकेच मंडळे करणार असल्याची स्थिती आहे.
मिरवणुका रद्द?
गणेशोत्सवातील स्थापना आणि विसर्जनाच्या मिरवणुकाही यंदा रद्द करण्यात याव्या असे आवाहन याआधीच प्रशासनाने केले आहे. मिरवणुकांमधील होणारी गर्दी लक्षात घेता हे आवाहन करण्यात आले आहे. नंदुरबारातील दादा व बाबा यासह इतर मानाच्या गणपतींची मिरवणूक साध्यापणाने काढली जाणार आहे. या दोन मानाच्या गणपतींची हरिहर भेट बाबत काय निर्णय होतो याकडे आता भक्तांचे लक्ष लागून आहे.
अनेकाच्या व्यवसायाला फटका
गणेशोत्सव साध्यापणाने साजरा करण्याच्या निर्णयामुळे अनेक व्यावसायिकांना आर्थिक फटका बसणार आहे. सार्वजनिक गणेशोत्सवासाठी लागणारा मंडप, सजावटीसाठी लागणारे साहित्य, विद्युत रोषणाई, ढोल व लेझीम पथके, डिजे चालक-मालक, यासह गुलाल विक्री यावरही मोठा परिणाम होणार आहे. आधीच हे व्यवसाय ठप्प आहेत.
लॉकडाऊनमुळे यंदा या व्यावसायिकांना आर्थिक मंदीचा सामना करावा लागला आहे. आता गणेशोत्सवातही त्यांना व्यवसाय मिळणार नाही हे स्पष्टच आहे.


नंदुरबारात मोठी सजावट, देखावा आणि भव्यदिव्य मिरवणुका काढणाऱ्या मंडळांपैकी माळी समाज पंच मंडळ देखील त्यातील एक आहे. या मंडळाने यंदा गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याचे ठरविले आहे. पंच कमिटीने घेतलेल्या निर्णयानुसार यंदा सार्वजनिक गणेशोत्सव हा स्थापना व विसर्जन मिरवणुकीचे आयोजन न करता, गुलालाचा वापर न करता शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सुचना प्रमाणेच साजरा करणार असल्याबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांना लेखी निवेदन देवून कळविले आहे. अध्यक्ष आनंद माळी, माणिक माळी, विजय माळी, मोहन माळी, निंबा माळी, लक्ष्मण माळी यांचा पोलीस अधीक्षकांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला. या मंडळाचा आदर्श इतर मंडळांनी देखील घेणे अपेक्षीत असल्याचे पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात आले आहे.