शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

पाऊस परतल्याने नंदुरबारातील पिकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:14 IST

नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात साधारणत जुन व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडलेला होता़ पावसाने ...

नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात साधारणत जुन व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडलेला होता़ पावसाने दडी मारली असल्याने एकूण खरिप हंगामातील 2 लाख 41 हजार 761 हेक्टरापैकी साधारणत दीड लाख हेक्टरावरील पिकं धोक्यात आलेली होती़ त्यात कापूस पिकाची स्थिती अधिकच चिंताजनक होती़ जिल्ह्यात  एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची पेरणी करण्यात आलेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत साधारणत 92 टक्के खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत़जिल्ह्यात सरासरी पावसाच्या निम्मे पाऊस झालेला असला तरी सध्या येत असलेल्या पावसामुळे पिके तरारली आहेत़ श्रावण महिन्यात झालेल्या पावसामुळे कापसावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येत आह़े तीन दिवसांपासून पावसाची हजेरीगेल्या आठवडय़ापासून पावसाने सलग हजेरी लावलेली आह़े नंदुरबार शहरासह, तळोदा अक्कलकुवा, नवापूर आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली दिसून येत आह़े ग्रामीण भागात पावसाची संततधार दिसून येत आह़े नंदुरबारात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती़ दुपार्पयत दमदार पाऊस झाल्यानंतर काहीसे उन्ह पडलेले दिसून आल़े  तळोद्यातील ग्रामीण भागात दिवसभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता़ त्यामुळे शेतक:यांना काही काळ शेती कामे थांबवावी लागली होती़केळी, पपई पिकांना दिलासाशहादा, तळोदा तालुक्यासह  नंदुरबार तालुक्यातील परिसरात केळी व पपई पिक घेण्यात येत असत़े जुन व जुलै महिन्यात पाउसपाणी नसल्याने ही पिकही धोक्यात आलेली होती़ हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून केळी तसेच पपईकडे पाहिले जात असत़े परंतु पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारली असल्याने शेतकरी संकटात सापडलेले होत़े ऑगस्ट महिन्यात पाऊस  परतल्याने ही पिक आता धोक्याबाहेर असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े 1 लाख हेक्टरवर कापूस लागवडजिल्ह्यातील एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आलेली आह़े  तालुकानिहाय पाहिले असता, नंदुरबार 39 हजार 480 हेक्टर, नवापूर 5 हजार 121 हेक्टर, शहादा 47 हजार 488, तळोदा 8 हजार 420 हेक्टर, अक्राणी 480 हेक्टर, अक्कलकुवा 3 हजार 660 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आह़े यंदाच्या पावसाळ्यात तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, रोझवा पूनर्वसन आदी परिसरात पिकपाणी बरे असले तरी, नंदुरबार तालुका, शहाद्यातील काही भाग वगळता इतर बहुतांश ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आह़े अशीच परिस्थिती अक्कलकुवा, धडगाव आदी परिसराचीसुध्दा          आह़े शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गणित हे खरिप हंगामावरच अवलंबून असत़े गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरडय़ा दिवसांची संख्या वाढली असल्याने साहजिकच याचा परिणाम उत्पन्नावर जाणवनार आह़े जलस्त्रोतांमध्ये वाढ होणे गरजेचेयंदाच्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याचा पारा 44 अंश सेल्शिअसर्पयत गेला होता़ वर्षागणिक उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आह़े त्यामुळे साहजिकच जिल्ह्याच्या पाणी पातळीत मोठी घट झालेली आह़े त्याताच पावसाळ्यात जुन व जुलै महिना संपूर्ण कोरडा गेल्याने पाण्याची समस्या निर्माण झालेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत सरासरी 54 टक्के इतका पाऊस झालेला आह़े त्यामुळे यातून लघु व मध्यप्रकल्पांमध्ये काही अंशीच वाढ झालेली दिसून येत आह़े सप्टेंबरच्या शेवटापासून परतीच्या पावसाला सुरुवात होत असत़े त्याला अजून साधारणत 1 महिन्याचा अवकाश आह़े त्यामुळे या दरम्यान, दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े परतीच्या पावसाचा कालखंड वाढत असल्याने त्या दरम्यानही चांगला पाऊस होणे अपेक्षीत आह़े