शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस परतल्याने नंदुरबारातील पिकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:14 IST

नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात साधारणत जुन व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडलेला होता़ पावसाने ...

नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात साधारणत जुन व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडलेला होता़ पावसाने दडी मारली असल्याने एकूण खरिप हंगामातील 2 लाख 41 हजार 761 हेक्टरापैकी साधारणत दीड लाख हेक्टरावरील पिकं धोक्यात आलेली होती़ त्यात कापूस पिकाची स्थिती अधिकच चिंताजनक होती़ जिल्ह्यात  एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची पेरणी करण्यात आलेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत साधारणत 92 टक्के खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत़जिल्ह्यात सरासरी पावसाच्या निम्मे पाऊस झालेला असला तरी सध्या येत असलेल्या पावसामुळे पिके तरारली आहेत़ श्रावण महिन्यात झालेल्या पावसामुळे कापसावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येत आह़े तीन दिवसांपासून पावसाची हजेरीगेल्या आठवडय़ापासून पावसाने सलग हजेरी लावलेली आह़े नंदुरबार शहरासह, तळोदा अक्कलकुवा, नवापूर आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली दिसून येत आह़े ग्रामीण भागात पावसाची संततधार दिसून येत आह़े नंदुरबारात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती़ दुपार्पयत दमदार पाऊस झाल्यानंतर काहीसे उन्ह पडलेले दिसून आल़े  तळोद्यातील ग्रामीण भागात दिवसभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता़ त्यामुळे शेतक:यांना काही काळ शेती कामे थांबवावी लागली होती़केळी, पपई पिकांना दिलासाशहादा, तळोदा तालुक्यासह  नंदुरबार तालुक्यातील परिसरात केळी व पपई पिक घेण्यात येत असत़े जुन व जुलै महिन्यात पाउसपाणी नसल्याने ही पिकही धोक्यात आलेली होती़ हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून केळी तसेच पपईकडे पाहिले जात असत़े परंतु पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारली असल्याने शेतकरी संकटात सापडलेले होत़े ऑगस्ट महिन्यात पाऊस  परतल्याने ही पिक आता धोक्याबाहेर असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े 1 लाख हेक्टरवर कापूस लागवडजिल्ह्यातील एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आलेली आह़े  तालुकानिहाय पाहिले असता, नंदुरबार 39 हजार 480 हेक्टर, नवापूर 5 हजार 121 हेक्टर, शहादा 47 हजार 488, तळोदा 8 हजार 420 हेक्टर, अक्राणी 480 हेक्टर, अक्कलकुवा 3 हजार 660 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आह़े यंदाच्या पावसाळ्यात तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, रोझवा पूनर्वसन आदी परिसरात पिकपाणी बरे असले तरी, नंदुरबार तालुका, शहाद्यातील काही भाग वगळता इतर बहुतांश ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आह़े अशीच परिस्थिती अक्कलकुवा, धडगाव आदी परिसराचीसुध्दा          आह़े शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गणित हे खरिप हंगामावरच अवलंबून असत़े गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरडय़ा दिवसांची संख्या वाढली असल्याने साहजिकच याचा परिणाम उत्पन्नावर जाणवनार आह़े जलस्त्रोतांमध्ये वाढ होणे गरजेचेयंदाच्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याचा पारा 44 अंश सेल्शिअसर्पयत गेला होता़ वर्षागणिक उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आह़े त्यामुळे साहजिकच जिल्ह्याच्या पाणी पातळीत मोठी घट झालेली आह़े त्याताच पावसाळ्यात जुन व जुलै महिना संपूर्ण कोरडा गेल्याने पाण्याची समस्या निर्माण झालेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत सरासरी 54 टक्के इतका पाऊस झालेला आह़े त्यामुळे यातून लघु व मध्यप्रकल्पांमध्ये काही अंशीच वाढ झालेली दिसून येत आह़े सप्टेंबरच्या शेवटापासून परतीच्या पावसाला सुरुवात होत असत़े त्याला अजून साधारणत 1 महिन्याचा अवकाश आह़े त्यामुळे या दरम्यान, दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े परतीच्या पावसाचा कालखंड वाढत असल्याने त्या दरम्यानही चांगला पाऊस होणे अपेक्षीत आह़े