शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

पाऊस परतल्याने नंदुरबारातील पिकांना जीवनदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2018 13:14 IST

नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात साधारणत जुन व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडलेला होता़ पावसाने ...

नंदुरबार : नंदुरबारात श्रावणाच्या सुरुवातीपासून आलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील साधारणत दीड लाख हेक्टरवरील पिकांना दिलासा मिळाला आह़े त्यामुळे साहजिकच शेतक:यांमध्ये समाधान दिसून येत आह़े पावसानंतर काही प्रमाणात उनदेखील पडत असल्याने हे वातावरण पिकांच्या वाढीसाठी पोषक असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आह़ेनंदुरबारात साधारणत जुन व जुलै महिन्यात पावसाचा मोठा खंड पडलेला होता़ पावसाने दडी मारली असल्याने एकूण खरिप हंगामातील 2 लाख 41 हजार 761 हेक्टरापैकी साधारणत दीड लाख हेक्टरावरील पिकं धोक्यात आलेली होती़ त्यात कापूस पिकाची स्थिती अधिकच चिंताजनक होती़ जिल्ह्यात  एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची पेरणी करण्यात आलेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत साधारणत 92 टक्के खरिपाच्या पेरण्या आटोपल्या आहेत़जिल्ह्यात सरासरी पावसाच्या निम्मे पाऊस झालेला असला तरी सध्या येत असलेल्या पावसामुळे पिके तरारली आहेत़ श्रावण महिन्यात झालेल्या पावसामुळे कापसावर सकारात्मक परिणाम झालेला दिसून येत आह़े तीन दिवसांपासून पावसाची हजेरीगेल्या आठवडय़ापासून पावसाने सलग हजेरी लावलेली आह़े नंदुरबार शहरासह, तळोदा अक्कलकुवा, नवापूर आदी तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावलेली दिसून येत आह़े ग्रामीण भागात पावसाची संततधार दिसून येत आह़े नंदुरबारात सकाळी जोरदार पावसाने हजेरी लावलेली होती़ दुपार्पयत दमदार पाऊस झाल्यानंतर काहीसे उन्ह पडलेले दिसून आल़े  तळोद्यातील ग्रामीण भागात दिवसभर कमी अधिक प्रमाणात पाऊस सुरु होता़ त्यामुळे शेतक:यांना काही काळ शेती कामे थांबवावी लागली होती़केळी, पपई पिकांना दिलासाशहादा, तळोदा तालुक्यासह  नंदुरबार तालुक्यातील परिसरात केळी व पपई पिक घेण्यात येत असत़े जुन व जुलै महिन्यात पाउसपाणी नसल्याने ही पिकही धोक्यात आलेली होती़ हमखास उत्पन्न मिळवून देणारे पिक म्हणून केळी तसेच पपईकडे पाहिले जात असत़े परंतु पावसाने अनेक दिवसांपासून दडी मारली असल्याने शेतकरी संकटात सापडलेले होत़े ऑगस्ट महिन्यात पाऊस  परतल्याने ही पिक आता धोक्याबाहेर असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आले आह़े 1 लाख हेक्टरवर कापूस लागवडजिल्ह्यातील एकूण 1 लाख 6 हजार क्षेत्रापैकी खरिप हंगामात 1 लाख 4 हजार 649 हेक्टरावर कापसाची लागवड करण्यात आलेली आह़े  तालुकानिहाय पाहिले असता, नंदुरबार 39 हजार 480 हेक्टर, नवापूर 5 हजार 121 हेक्टर, शहादा 47 हजार 488, तळोदा 8 हजार 420 हेक्टर, अक्राणी 480 हेक्टर, अक्कलकुवा 3 हजार 660 हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड करण्यात आली आह़े यंदाच्या पावसाळ्यात तळोदा तालुक्यातील रांझणी, प्रतापपूर, रोझवा पूनर्वसन आदी परिसरात पिकपाणी बरे असले तरी, नंदुरबार तालुका, शहाद्यातील काही भाग वगळता इतर बहुतांश ठिकाणी अजूनही पावसाची प्रतीक्षा कायम आह़े अशीच परिस्थिती अक्कलकुवा, धडगाव आदी परिसराचीसुध्दा          आह़े शेतक:यांचे मोठय़ा प्रमाणावर आर्थिक गणित हे खरिप हंगामावरच अवलंबून असत़े गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोरडय़ा दिवसांची संख्या वाढली असल्याने साहजिकच याचा परिणाम उत्पन्नावर जाणवनार आह़े जलस्त्रोतांमध्ये वाढ होणे गरजेचेयंदाच्या उन्हाळ्यामध्ये जिल्ह्याचा पारा 44 अंश सेल्शिअसर्पयत गेला होता़ वर्षागणिक उन्हाळ्याच्या झळा तीव्र होत आह़े त्यामुळे साहजिकच जिल्ह्याच्या पाणी पातळीत मोठी घट झालेली आह़े त्याताच पावसाळ्यात जुन व जुलै महिना संपूर्ण कोरडा गेल्याने पाण्याची समस्या निर्माण झालेली आह़े जिल्ह्यात आतार्पयत सरासरी 54 टक्के इतका पाऊस झालेला आह़े त्यामुळे यातून लघु व मध्यप्रकल्पांमध्ये काही अंशीच वाढ झालेली दिसून येत आह़े सप्टेंबरच्या शेवटापासून परतीच्या पावसाला सुरुवात होत असत़े त्याला अजून साधारणत 1 महिन्याचा अवकाश आह़े त्यामुळे या दरम्यान, दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े परतीच्या पावसाचा कालखंड वाढत असल्याने त्या दरम्यानही चांगला पाऊस होणे अपेक्षीत आह़े