शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लेटरपॅड चोरीचा बनाव रचून दिशाभूल करणाऱ्या रघुवंशींविरोधात फौजदारी गुन्हा नोंदवा- प्रा.चौधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:23 IST

माजी आमदार रघुवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर आरोपांची तोफ डागण्यात आली. यात प्रा.डाॅ.रवींद्र चाैधरी यांच्याकडून ...

माजी आमदार रघुवंशी यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर भाजपकडून त्यांच्यावर आरोपांची तोफ डागण्यात आली. यात प्रा.डाॅ.रवींद्र चाैधरी यांच्याकडून देण्यात आलेल्या पत्रकानुसार माजी आमदार रघुवंशी हे जनतेची दिशाभूल करीत असतात. जनतेच्या नजरेत धूळफेक करून जे त्यांच्याकडे नाही, ते दातृत्व दाखविण्याचा प्रयत्न करत असतात. ग्रामपंचायतींना निधी मिळवून देण्याच्या बढाईखोर आवाहनाने त्यांचा हा बुरखा फाटला आहे. बिनविरोध निवडून येईल, त्या प्रत्येक ग्रामपंचायतीला जिल्हा परिषदेमार्फत जनसुविधा योजनेतून १५ लाख रुपयांचा निधी मिळवून देऊ, अशी घोषणा त्यांनी १५ दिवसांपूर्वी केली होती. १ जानेवारी, २०२१ अशी तारीख घातलेल्या रघुवंशी यांच्याच लेटर हेडवर अधिकृतपणे हे आवाहन करण्यात आले होते. याबाबतचे वृत्त सर्वत्र छापून आले होते. यावर भाजपचे नगरपालिकेतील विरोधी गटनेते चारुदत्त कळवणकर आणि ज्येष्ठ कार्यकर्ते दिनकर श्यामराव पाटील यांनी राजभवनात तक्रार केल्यानंतर या प्रकाराची सत्यता समोर आली आहे. त्यांनी राजभवनात दिलेल्या तक्रारीत ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता चालू असताना आणि निवडणूक प्रक्रिया सुरू असताना, १५ लाख रुपये निधीचे प्रलोभन दाखविणे म्हणजे आचारसंहितेचा भंग आहे. माजी आमदार रघुवंशी हे जिल्हा परिषद सभागृह अथवा डीपीडीसीचे सदस्य नसल्याने, त्यांना अशी घोषणा करण्याचे अधिकार नसतानाही निधी मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले, शिवाय राजमुद्रेचा गैरवापर करण्यात आला. या सर्व कारणाने रघुवंशी यांच्याविरोधात आचारसंहिता भंग करणे, राजमुद्रेचा गैरवापर करणे, तसेच कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना प्रलोभन दाखवून बेकायदेशीर वर्तन करणे, याविषयी चौकशी होऊन गुन्हा दाखल केला जावा, अशीही मागणी आहे. आता राजभवनातून या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. यातून चंद्रकांत रघुवंशी यांचे धाबे दणाणले आहेत. ती चूक झाकण्यासाठी व आपला खोटारडेपणा लपवण्यासाठी आता ते कांगावा करत असल्याचे या पत्रकात म्हटले आहे.

दरम्यान, जिल्हा प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत कारवाई करावी, अशी मागणीही प्रा.डाॅ.रवींद्र चाैधरी यांनी केली आहे. या संबंधीचे सर्व पुरावे समोर आणून रघुवंशींचा खोटारडेपणा जनतेसमोर आणला जावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.