शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

पावसातील खंड वाढवतोय चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2018 16:35 IST

सन २००७ पासूनची स्थिती : खान्देशातील कोरड्या दिवसांचा आढावा, धुळे प्रथम स्थानी

- संतोष सूर्यवंशीनंदुरबार : खान्देशात पावसाचा खंड पडलेल्याने साहजिकच कोरड्या दिवसांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ नंदुरबार जिल्ह्याचा विचार करता गेल्या अकरा वर्षांच्या कालखंडात तब्बल ६७८ दिवस हे कोरडे गेले आहेत. त्यात, जळगाव व धुळे जिल्ह्यात कोरड्या दिवसांची स्थिती ही अनुक्रमे ७५७ व ८२२ इतकी आहे. खान्देशात कमी पावसामुळे पाणी पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही़ उन्हाळ्याच्या झळा सोसल्यानंतर पावसाच्या सरी सुखावतील अशी शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना अपेक्षा होती़ परंतु पावसात खंड पडलेला असल्याने या अपेक्षेवर पाणी फेरले गेले आहे़ अकरा वर्षातील कोरड्या दिवसांचा आढावा घेतला असता, त्यांच्या संख्येत वर्षागणिक असमानता दिसून येतेय़ पर्जन्यमानाचा विचार करता खान्देशासाठी २०१३ हे वर्ष सुखावह ठरले होते़ या वर्षी कोरड्या दिवसांची संख्या सर्वाधिक कमी होती़ जळगाव ३१, धुळे ४५ तर नंदुरबार २९ कोरडे दिवस होते़ त्या तुलनेत २०१५ या वर्षात सर्वाधिक कोरडे दिवस नोंदविले गेले़ साहजिकच हे बदलल्या पर्यावरणीय बदलांचे द्योतक असल्याचे हवामानतज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.

का पडलाय पावसात खंड?मान्सून ट्रफ म्हणजेच द्रोणीय वारे हिमालयाजवळ घोंगावत आहेत़ हवेचा दाब कमी झालेला असल्याने परिणामी वातावरणीय अडथळे निर्माण होऊन बाष्पयुक्त ढगांना दक्षिणेकडे येण्यास मार्ग नसल्याने परिणामी पावसात मोठा खंड पडलेला असल्याचे हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आलेले आहे. नाशिकचा पूर्व भाग, कोकण व विदर्भाचा बहुतांश भाग त्याच प्रमाणे पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिण भागात काही ठिकाणी तुरळक पर्जन्यमानाची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे़ परिणामी कोरडा दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याचा धोकाही व्यक्त करण्यात येत आहे.

राज्यातील १३६ तालुक्यांचे पर्यंजन्यमान खालावले४पुणे येथील हवामानतज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी पर्यावरणीय बदलांबाबत महाराष्ट्र शासनाला सादर केलेल्या अहवालानुसार राज्यातील १३६ तालुक्यांमध्ये पर्जन्यमान खालावले आहे़ १९७२ मध्ये यात ८४ तालुके तर २०१२ मध्ये १२२ तालुके समाविष्ठ होते, अशी माहिती डॉ़ साबळे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़ संबंधित तालुक्यांमध्ये ‘ड्रायस्पेल’ म्हणजेच पावसाळ्यातील कोरडा कालखंड वाढत असल्याचे दिसून येत आहे.जगातील १४५ देशांपैकी ५५ देशांकडून कृत्रिमरीत्या पाऊस पाडण्याचा प्रयोग करण्यात येत आहे़ हा प्रयोग सफलही होत असल्याचे जाणकारांकडून सांगण्यात येत आहे़ त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने याबाबत विचार करावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

कोरडे दिवस म्हणजे काय?दिवभरात २.५ मि़मी पेक्षा कमी पाऊस झाल्यास तसेच सलग सात दिवस २.५ मि़मी पेक्षा कमी पाऊस झाल्यास त्याला खगोलीय भाषेत ‘ड्रायस्पेल’ असे म्हटले जात असते़ तसेच याअंतर्गत मोडल्या जाणाऱ्या दिवसांना कोरडे दिवस असे म्हटले जात असते़

२००७ पासून वर्षनिहायकोरडे दिवसवर्ष     जळगाव     धुळे     नंदुरबार२००७       ६५         ७२     ६१२००८       ६९         ७३       ७०२००९       ९९         ८९     ८०२०१०        ५१         ५८     ५२२०११      ६४         ६३     ६६२०१२       ७६         ८६     ५८२०१३       ३१         ४५     २९२०१४       ८३         ८५     ६७२०१५        ९७         १०४     ९९२०१६         ६२         ६८     ४२२०१७         ६०         ७९     ५४एकूण-     ७५७         ८२२     ६७८

टॅग्स :RainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र