शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
4
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
5
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
6
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
7
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
8
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
9
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
10
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
11
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
12
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
13
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
14
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
15
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
16
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
17
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
18
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
19
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
20
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप

उकईच्या पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 9:38 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या तापी नदीवरील उकई धरणाच्या पाच टीएमसी पाण्याचा प्रश्न लवकरच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबीत असलेल्या तापी नदीवरील उकई धरणाच्या पाच टीएमसी पाण्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून देहली प्रकल्पग्रस्तांना 19 कोटी रुपयांच्या निधीसाठी येत्या कॅबीनेट बैठकीत मान्यता घेतली जाणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनी दिली. लोकसंघर्ष मोर्चातर्फे या प्रश्नावर मुंबईत नुकतीच बैठक झाली. जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत  लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जलसंपदा विभागाच्या सचिव, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा व डेप्युटी इंजिनिअर जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री  गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतखाली झालेल्या बैठकीत  लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, अपर जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे, जलसंपदा विभागाच्या सचिव, आदिवासी विकास विभागाच्या प्रधान सचिव मनीषा वर्मा व डेप्युटी इंजिनिअर जोशी व इतर अधिकारी उपस्थित होते. 2015 मध्ये महाराष्ट्र व गुजरात सरकार मध्ये पाणी उचलण्याचा निर्णय झाला आहे. ज्यामुळे महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यात 386 हेक्टर, तळोदा तालुक्यात 4,826 हेक्टर, नवापूर तालुक्यात 3,342 हेक्टर तर नंदुरबार तालुक्यात 15,146 हेक्टर म्हणजे एकुण 23, 700 हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. याला एकुण खर्च 957.83 कोटी असून  लाभाचे  गुणोत्तर 1.124 येते. या योजनेतील करारात असलेली त्रुटी दूर करण्यासाठी जलसंपदा मंत्री स्वत: गुजरात सरकारशी बोलणी करून लगेच कॅबिनेट मधे ठेवून तापीतून पाणी उचलण्याच्या प्रक्रियेला वेग देणार आहेत. देहली प्रकल्पातून जवळ जवळ 3200 हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे.  जर तापी व देहली प्रकल्पांचे काम पुढे गेले तर नंदुरबार जिल्ह्यात जवळ जवळ 27 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येणार आहे व अत्यल्प असणारे नंदुरबार जिल्ह्याचे सिंचन क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे.