शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

नवीन अधिका:यांनी लिलया पेलले निवडणुकीचे शिवधनुष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 23, 2019 12:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख अधिकारी नवीन असतांना आणि विशेष म्हणजे चारही निवडणूक निर्णय अधिकारी महिनाभरापूर्वीच ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील दोन्ही प्रमुख अधिकारी नवीन असतांना आणि विशेष म्हणजे चारही निवडणूक निर्णय अधिकारी महिनाभरापूर्वीच बदलून आलेले असतांना देखील निवडणूक मुक्त वातावरणात पार पडल्याने सर्वानीच सुटकेचा नि:श्वास टाकला.जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात सोमवारी शांततेत आणि सुरळीतपणे मतदान झाले. मतदानादरम्यान कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नाही. कुठेही निवडणुकीत विस्कळीतपणा आल्याचे दिसून आले नाही. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड आणि कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी असलेले पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित हे निवडणुकीच्या दोन महिन्याआधीच बदलून आल्याने त्यांच्यावर मोठी जबाबदारी येवून ठेपली होती. परंतु आपल्या प्रशासकीय कामाच्या अनुभवावरून त्यांनी निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे हाताळली.  याशिवाय मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी देखील जिल्हाधिकारी यांनी मोठी मेहनत घेतली. लोकसभा निवडणुकीत नंदुरबार जिल्हा सर्वाधिक मतदानाबाबत राज्यात दुस:या क्रमांकावर होता. विधानसभा निवडणुकीत प्रथम क्रमांकावर यावा यासाठी धडपड होती. राजकीय आणि इतर चित्र   पहाता 50 टक्केही मतदान होते की नाही अशी स्थिती असतांना तब्बल 66.37 टक्केर्पयत मतदान    नेण्यार्पयत यश आले. लोकसभा निवडणुकीत जिल्ह्यातील चारही मतदारसंघात एकुण 70.35 टक्के मतदान झाले होते. आता 66.37 टक्के झाले. निवडणूक निर्णय अधिकारीजिल्ह्यातील चारही निवडणूक निर्णय अधिकारी हे नव्याने जिल्ह्यात आलेले आहेत. नंदुरबारच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्वाती थवील या यापूर्वी नंदुरबारात उपजिल्हा निवडणूक अधिकारी होत्या. त्यांनी त्यांच्या त्या अनुभवाच्या जोरावर नंदुरबार विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी पार पाडली.नवापूरचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश शेलार यापूर्वी नंदुरबार तहसीलदार होते. शिवाय नवापूर येथे पर्यावेक्षाधिन तहसीलदार देखील होते. त्या अनुभवाच्या जोरावर त्यांनी नवापूरची निवडणूक पार पाडली. शहाद्याचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ.चेतन गिरासे हे मात्र, जिल्ह्यासाठी नवीनच होते. तरीही त्यांनी स्थानिक अधिका:यांच्या मदतीने शहाद्याची निवडणूक पार पाडली. अक्कलकुवाचे निवडणूक    निर्णय अधिकारी राहुल पाटील   यापूर्वी नंदुरबारात तहसीलदार होते. त्यांनी देखील जिल्ह्यातील      कामाच्या अनुभवाच्या जोरावर अक्कलकुवाची निवडणूक पार पाडली.