शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
2
'देवेंद्र फडणवीसांना खोटं बोलण्यात गोल्ड मेडेल मिळेल'; रोहित पवारांचा खोचक टोला
3
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
4
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट
5
"काँग्रेसनं नसीम खान यांना उमेदवारी दिल्यास पूर्ण ताकदीनं त्यांना निवडून आणू"
6
“नरेंद्र मोदी अन् अमित शाहांना महाराष्ट्राचे तुकडे करायचेत”; संजय राऊतांचा दावा
7
T20 World Cup साठी न्यूझीलंडचा संघ जाहीर; अनोख्या पद्धतीने घोषणा, नव्या जर्सीत किवी संघ
8
Fact Check : पंजाबमध्ये भाजपाच्या विरोधात लोकांनी झेंडे जाळल्याचा Video दिशाभूल करणारा; हे आहे 'सत्य'
9
नोकरीच्या शोधात फिरणारी युवती अचानक बनली कोट्यधीश; ८ वर्षापूर्वी नेमकं काय घडलं?
10
Digvijaya Singh : "तुम्हाला निराश करणार नाही, ही माझी शेवटची..."; दिग्विजय सिंह निवडणूक लढवणार नाहीत?
11
बापरे! चौथ्या मजल्यावरून खाली पडलं 7 महिन्यांचं बाळ; काळजाचा ठोका चुकवणारा Video
12
'एकट्यात बोलवून साडीची पिन काढायचे अन्...'; प्रज्वल रेवन्नांविरोधात महिलेची पोलिसांत तक्रार
13
प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या, मग पोलिसांत दिली बेपत्ता असल्याची तक्रार, पण असं फुटलं बिंग
14
...तेव्हा राज ठाकरेंवर प्राणघातक हल्ला करण्याचा प्लॅन रचला होता; मनसे नेत्याचा मोठा दावा
15
गुरुचे राशीपरिवर्तन: मेष ते मीन राशींवर कसा असेल प्रभाव? तुमची रास कोणती? लाभ की ताप? पाहा
16
भारत दौरा टाळून एलॉन मस्क पोहोचले थेट चीनमध्ये, चिनी पंतप्रधानांच्या भेटीनंतर दिले सूचक संकेत
17
उद्धवसेना, शिंदेसेना मुंबईत आज आमनेसामने! भव्य रॅलीत CM शिंदे vs आदित्य ठाकरे येणार, मोठा फौजफाटा
18
रत्नागिरीच्या सभेत मनसेची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका; "ज्यांनी आयुष्यभर दुसऱ्याचं..."
19
...अन् नम्रता संभेरावला पाहून बोमन इराणींनी चक्क त्यांची BMW थांबवली, अभिनेत्रीने सांगितला किस्सा
20
'ये रिश्ता क्या कहलाता है' मधून हिना खानला काढण्यात आलं होतं, शिवांगी जोशी ठरली कारण?

बाजारपेठची वेळ आता ७ ते ४

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 04, 2020 1:15 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील वाढती कोरोना बाधीतांची संख्या लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने नुकतेच आठ दिवस लॉकडाऊन केले. आता मंगळवार, ४ आॅगस्टपासून नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर या शहरांमधील बाजारपेठेची वेळ ही सकाळी सात ते दुपारी चार वाजेपर्यंतची राहणार आहे. चार वाजेपासून कडकडीत बंद पाळला जाणार आहे. केवळ अत्यावश्यक सेवा या काळात सुरू राहणार आहेत.जिल्ह्यातील विशेषतअ नंदुरबार, शहादा, तळोदा व नवापूर येथे कोरोना बाधीतांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या दोन दिवसात तर तब्बल १०० रुग्ण आढळले. शिवाय पाच जणांचा मृत्यू देखील झाला. त्यामुळे कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने काही गंभीर पाऊले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचअंतर्गत बाजारपेठा दुपारी चार वाजता बंद होणार आहेत.वेळेची अंमलबजावणीबाजारात सकाळी व सायंकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी असते. सकाळची गर्दी नियंत्रीत करण्यासाठी उपाययोजना असल्या तरी ग्रामिण भागातील नागरिकांना अत्यावश्यक खरेदीसाठी शहरी भागात यावेच लागते. त्यामुळे सकाळी नाही किमान सायंकाळची गर्दी सक्तीने कमी करण्यासाठी प्रशासनाने आता थेट बंदचा निर्णय घेतला आहे. सद्य स्थितीत सकाळी नऊ ते सायंकाळी सात वाजेपर्यंत बाजारपेठा सुरू ठेवण्याचा निर्णय आहे. आता ही वेळ बदलून सकाळी सात ते दुपारी चार अशी राहणार आहे. त्याची अंमलबजावणी मंगळवार, ४ आॅगस्टपासून करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने या चारही शहरांमध्ये अधिकृत सुचना देखील काढली आहे.साखळी तोडण्यासाठी प्रयत्नगर्दीतून कोरोनाचा फैलाव होतो. त्यामुळे गर्दी कमी करून साखळी तोडण्यासाठी ही उपाययोजना करण्यात येत असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. त्याची अंमलबजावणी नंदुरबार, शहादा, नवापूर व तळोदा या चार पालिकांनी सक्तीने करावी असेही निर्देश देण्यात आले आहेत.अत्यावश्यक सेवा सुरूदुपारी चार वाजेनंतर बाजारपेठा बंद राहणार असल्या तरी औषधी दुकाने, दवाखाने, दूध विक्री आदी सेवा सुरू राहणार आहेत. शिवाय रात्रीची संचारबंदी कायम राहणार आहे. संचारबंदीच्या काळात पेट्रोलपंप देखील बंद राहणार आहेत.

४चार शहरांव्यतिरिक्त इतर भागात नेहमीच्या वेळेत बाजारपेठ सुरू राहणार आहे. त्यात कुठलाही बदल नाही.४जिल्हाभरातील रात्रीची संचारबंदी देखील कायम राहणार आहे.४ग्रामिण भागातील नागरिकांनी अत्यावश्यक काम असेल तरच शहरी भागात यावे अन्यथा येण्याचे टाळावे.