शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
3
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
4
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
5
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
6
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
7
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
8
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
9
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
10
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
11
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
12
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
13
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
14
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
15
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
16
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
17
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
18
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
19
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
20
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे माहेरची वाट आणि माहेरची साडी सध्या दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

लॉकडाऊन परिस्थितीत सध्या २५ लोकांचीच अनुमती लग्नकार्यासाठी शासनाने दिली आहे. अशा परिस्थितीतही अनेक ठिकाणी लग्न सोहळे पार पडत आहेत. ...

लॉकडाऊन परिस्थितीत सध्या २५ लोकांचीच अनुमती लग्नकार्यासाठी शासनाने दिली आहे. अशा परिस्थितीतही अनेक ठिकाणी लग्न सोहळे पार पडत आहेत. लग्न झाल्यावर मुलींना माहेरी न जाता सासरीच रममाण होण्याची वेळ सध्या निर्माण झाली आहे. शासनाने कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावले असून, महामंडळाच्या बसेस तसेच खासगी वाहनांवरही बंदी आणल्याने लग्नानंतर महिन्याभरात दोन-तीनदा माहेरी जाणारी नवविवाहित सध्या सासरीच माहेरच्या आठवणींना उजाळा देत आहे.

ज्या विवाहितांच्या लग्नाला दहा- बारा वर्षे झाली आहेत, तेही वर्षभरापासून माहेरी जाण्यासाठी कासावीस होत आहेत. सध्या त्यांच्या मुलांच्या शाळांना सुट्टी असल्यामुळे माहेरी चार दिवस जन्मदात्या आई- वडिलांबरोबर राहून त्यांची सेवा करण्याची प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते. मात्र, कोरोनाने माहेरची वाट दूर केली आहे. त्यामुळे नवविवाहित मुली आपल्या माहेरातील आई, वडील, भाऊ, बहीण व इतर मंडळींशी मोबाईलद्वारे आभासी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. कधी - कधी व्हिडिओ कॉल करून माहेरच्या मंडळीशी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला आपल्या माहेरची आठवण येणे स्वाभाविक आहे; पण सध्या लॉकडाऊनमुळे माहेरच्या पाहुणचाराला सुद्धा त्यांना मुकावे लागत आहे. लग्न कार्याला पंचवीस लोकांचीच परवानगी असल्याने आप्तस्वकीयांच्या लग्नालाही त्यांना उपस्थिती दर्शविता येत नाही.

गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे माहेरच्या साडीपासूनही त्यांना वंचित राहावे लागत आहे. नवविवाहितेसाठी सासरचे घर नवीनच असते. त्यांना एकाकी वाटू नये म्हणून महिनाभरात दोन-तीन वेळा माहेरी आणले जाते किंवा आई-वडील भेटण्यासाठी जातात. मात्र, संचारबंदीमुळे नवविवाहितांचे माहेरी जाणे तूर्तास तरी बंद आहे. तसेच माहेरी एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठीही शासनाने मोजक्या लोकांची अट घातल्याने त्यांना तेथेही हजेरी लावता येत नाही. म्हणून प्रत्येक ग्रामीण तसेच शहरी भागातील नवविवाहितांना केव्हा लॉकडाऊन खुले होईल आणि केव्हा माहेरी जायला भेटेल याचे वेध लागले आहेत.