शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

महाविकास आघाडी सरकारला घरचाच आहेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2021 04:36 IST

नंदुरबार : राज्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे खरेदी करून आदिवासींना भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी ...

नंदुरबार : राज्यातील आदिवासींच्या जमिनी बेकायदेशीरपणे खरेदी करून आदिवासींना भूमिहीन करण्याचा डाव रचला जात आहे. विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्या वर्षभरात सर्वाधिक जमीन हस्तांतरणाची प्रकरणे घडल्याचा आरोप शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांनी केला आहे. सत्ताधारी पक्षाच्या खासदारांनीच सरकारवर आरोप केल्याने तो एक चर्चेचा विषय ठरला आहे.

खा. राजेंद्र गावित यांनी पालघर, रायगड, ठाणे, नाशिक, धुळे जिल्ह्यांतील आदिवासी शेतकऱ्यांची भेट घेतल्यानंतर शुक्रवारी त्यांनी नंदुरबार जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या राज्यात आदिवासींच्या जमिनी बिल्डर, भांडवलदार, बिगर आदिवासी व्यावसायिकांकडून मोठ्या प्रमाणावर खरेदी केल्या जात आहेत. वास्तविक १९७४ च्या जमीन हस्तांतराच्या कायद्यानुसार ते बेकायदेशीर आहे. मात्र, महसूल विभागाने त्याकडे पूर्णता दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यापूर्वी भाजपचे सरकार होते; पण त्या काळातही घडल्या नाहीत तेवढ्या आदिवासी जमीन हस्तांतराच्या घटना या वर्षभरात घडल्या आहेत. वास्तविक राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांची युती असलेल्या महाविकास आघाडीचे सरकार आहे. नेहमीच आदिवासींची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसकडे महसूल खाते आहे. असे असतानाही आदिवासींना न्याय मिळत नाही. आदिवासींच्या जमिनी कमी दरात खरेदी करून बळकावल्या जात आहेत. त्याकडे राज्य शासनाने विशेष लक्ष घालण्याची आवश्यकता आहे. आदिवासींच्या जमिनी खरेदीबाबत राज्य शासनाने ‘आंध्र पॅटर्न’चे अवलोकन करून त्या धर्तीवर राज्यातही धोरण राबविण्याची आवश्यकता आहे. सरकारने जर वेळीच लक्ष घातले नाही तर यासंदर्भात आक्रमक भूमिका घ्यावी लागेल. यासंदर्भात आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदिवासी विकास मंत्री ॲड. के.सी. पाडवी यांचीही भेट घेणार असल्याचे खा. राजेंद्र गावित यांनी सांगितले.