शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण व केंद्रीय भूजल प्राधिकरण कार्यालय स्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्याची स्थापना होऊन जवळपास २२ वर्षे झाली आहेत. या कालावधीत विविध शासकीय कार्यालये ...

या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्याची स्थापना होऊन जवळपास २२ वर्षे झाली आहेत. या कालावधीत विविध शासकीय कार्यालये येथे स्थापन झाली आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांची स्थानिक स्तरावरच महत्त्वाची कामे होऊ लागली आणि जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागत आहे. परंतु जिल्ह्याच्या आरोग्याच्या बाबतीत दूषित पाण्याद्वारे होणारे आजार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंंडळ व केंद्रीय भूजल प्राधिकरण कार्यालयाची स्थापना होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात शुद्ध पाण्याचे प्रकल्प व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. परंतु त्यांच्यावर नियंत्रण करणारी किंवा नोंदणी करणारी यंत्रणा कुठेही दिसून येत नाही. जलप्रक्रिया उद्योगांवर नियंत्रण व नोंदणी नसल्यामुळे पर्यायाने महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. तसेच जलप्रक्रियेवरील शुद्ध मानकांचे योग्यप्रमाणे पालन होत आहे किंवा नाही, याकडे लक्ष देणारी यंत्रणा नसल्यामुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्यामुळे होणारे आजार लक्षणीय आहेत. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय भूजल प्राधिकरण कार्यालयाची नितांत गरज आहे.

जिल्ह्याची एकूण भौगोलिक परिस्थिती पाहता भूगर्भात मोठ्या प्रमाणावर मिथेन, गंधक, नायट्रोजन व इतर खनिजे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचाही परिणाम मानवी शरीरावर होत असतो. त्याकरिता जलशुद्धीकरण प्रकल्पांवर अटी-शर्तींसह परवानगीकरीता नियंत्रण ठेवणारी संस्था नंदुरबार जिल्ह्यात कार्यान्वित होणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जलप्रक्रिया, शुद्धीकरण प्रकल्प यांना अधिकार किंवा परवानगी प्रदान करणारी यंत्रणा जिल्ह्यातच असावी. इतर जिल्ह्यातून परवानगी किंवा नियंत्रण असणे प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. या मागणीवर गांभीर्याने विचार करुन प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय भूजल प्राधिकरण कार्यालयाची जिल्हास्तरीय यंत्रणेचे कार्यालय स्थापन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रकाश भोई यांनी हे निवेदन दिले आहे.