शहरं
Join us  
Trending Stories
1
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
2
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
3
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
4
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
5
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
6
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
7
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
8
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा खोचक टोला
9
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
10
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
11
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
12
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
13
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
14
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
15
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
16
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
17
Mithilesh Tiwari: बिहारच्या शिक्षणमंत्र्यांचे मुलींबद्दल हे कसले विचार? व्हिडीओ झाला व्हायरल, लोक संतापले!
18
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
19
Travel : जगाचा निरोप घेण्यापूर्वी 'या' १५ पर्यटन स्थळांचा अनुभव नक्की घ्या; आयुष्य सार्थकी लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंघर्षतर्फे किसान मुक्ती आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2020 13:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ९ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीतर्फे ९ आॅगस्ट रोजी शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी किसान बचाव कॉपोर्रेट भगाव चा नारा देत देशव्यापी किसान आंदोलनाची हाक देण्यात आली होती़ यांतर्गत लोकसंघर्ष मोर्चातर्फे वतीने धडगांव, अक्कलकुवा, तळोदा आणि शहादा तालुक्यातील गावांमध्ये सोशल डिस्टन्सिंग ठेवत आंदोलन करण्यात आले़
आदिवासी गौरव दिनासोबत जल, जंगल, जमीन या नैसर्गिक संसाधानांवरचे हक्क राखण्यासाठी केंद्र शासनाने शेती व आदिवासींच्या विरोधात केलेल्या कायद्यातील बदलांचा निषेध यावेळी करण्यात आला़ शेतकऱ्यांची त्वरित कर्जमुक्ती करा, शेतीमालाला दीडपट हमीभाव द्या, शेतकरी व आदिवासींच्या विरोधातील काढलेले अध्यादेश तात्काळ मागे घ्या, शेतकºयांचे वीजबिल माफ करत वीज सुधारणा बिल २०२० मागे घ्या, डीझेल च्या किंमती कमी करा, कोरोना काळात शेतकरी व कष्टकरी वर्गाला पूर्ण रेशन, दुधाला हमीभाव आणि आदिवासींनी दाखल केलेले दावे त्वरीत निकाली काढून त्यांना शेतीचा अधिकार देण्याची मागणी करत तीव्र निदर्शने करण्यात आली़ तळोदा, धडगांव, अक्कलकुवा व शहादा तहसीलदार यांना सोमवारी निवेदन देण्यात येणार आहे़ आंदोलनात जिल्हा परिषद सदस्य गणेश पराडके, मुकेश पावरा, नारायण पावरा , रामदास तडवी, काथ्या वसावे, अशोक पाडावी, रमेश नाईक, देवीसिंग वसावे, झीलाबाई वसावे, निशांत मगरे दिलवर पाडवी यांनी सहभाग नोंदवला़
चारही तालुक्यातील गावागावात आदिवासी दिन कार्यक्रमासह निर्दशने करुन किसान मुक्ती आंदोलन करण्यात आले़ यावेळी शासनाने शेतीकडे गांभिर्याने पाहून शेतकºयांना समस्यांच्या गर्तेतून बाहेर काढावे, देशाची अर्थव्यवस्था ही शेतीशिवाय अपूर्ण असनू खºया अर्थाने राष्ट्राला आर्थिक महासत्ता म्हणून प्रगती करायची असेल तर शेतकरी हा त्यातील एक महत्वाचा घटक आहे हे विसरू नये़ किसान मुक्ती आंदोलनाची दखल शासनाने घ्यावी अन्यथा तीव्र आंदोलनाचा असा इशारा देण्यात आला आहे़