होलिकोत्सव (आध्यात्म)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:17 IST2021-03-29T04:17:53+5:302021-03-29T04:17:53+5:30
चिखलात ‘कमळ’ तसा त्याच्या घरात प्रल्हादासारखा भक्तपुत्र जन्मला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदांच्या आश्रमात राहिली. तेथील ...

होलिकोत्सव (आध्यात्म)
चिखलात ‘कमळ’ तसा त्याच्या घरात प्रल्हादासारखा भक्तपुत्र जन्मला. प्रल्हाद जेव्हा गर्भात होता त्यावेळी त्याची आई नारदांच्या आश्रमात राहिली. तेथील संस्कारांचा परिणाम प्रल्हादावर झाला होता. त्याच्या वडिलांनी त्याला बदलण्याचा फार प्रयत्न केला पण असमर्थ ठरले. नंतर वडिलांनी प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला. त्यातील एक म्हणजे त्याला जिवंत अग्नीत फेकून दिले. अग्नीतून उठून पळू नये म्हणून त्याला त्याच्या आत्याच्या मांडीवर बसविले. हिरण्यकश्यपूच्या बहिणीला होलिकेला वरदान होते की, तिने सद्वृत्तीच्या माणसाला त्रास दिला नाही तर अग्नी तिला जाळणार नाही. प्रल्हादाला मांडीवर घेऊन अग्नीमध्ये बसायला कबूल केले. परिणाम व्हायचा तोच झाला, होलिका जळून खाक झाली. मात्र ईश्वरनिष्ठ प्रल्हाद हसत-खेळत बाहेर आला.
होलिकादहनामुळे खूश झालेल्या लोकांनी उत्सव साजरा केला. लोक एकमेकांवर रंग-गुलाल उडवू लागले. काही धूळ उडवायला लागले आणि ‘धुळवड’ निर्माण झाली. होळीमध्ये केवळ निकामी वस्तू किंवा कचरा जाळणे असा नसून आपल्या जीवनात असलेले त्रास व खोटे विचार तसेच मनाचा मळ किंवा कचराही जाळला पाहिजे. हा हेतू होलिकोत्सवात पाहिजे.
होळीचा उत्सव फाल्गुनच्या रंगाने आपले जीवन रंगीत बनविणार. वसंतातही संयमाची दिशा देणारा मानव मनात, समाजात असलेल्या दुष्टवृत्तीचा पराभव होतो ही गोष्ट आपल्याला ‘होळी’ समजावते.