शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

शहादा वार्तापत्र-कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेची बाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 1:14 PM

शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, २७५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आजपर्यंत तालुक्यातून तीन हजार ...

शहादा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग वाढतच असून, २७५ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. आजपर्यंत तालुक्यातून तीन हजार २७६ रुग्णांपैकी दोन हजार ९३५ जण बरे झाले आहेत. जिल्ह्यात शहादा तालुका हॉटस्पॉट ठरू पाहत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या अधिकाधिक रुग्णांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून त्यांचे विलगीकरण करण्यात येत असले, तरी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. शासन निर्देशाचे पालन करून वाढत्या संसर्गावर निकडीच्या उपाय म्हणून लग्न समारंभ, धार्मिक कार्यक्रम यासह विविध समारंभ आटोपशीर घेणे महत्त्वाचे आहे.शहादा तालुक्यात सुरुवातीच्या काळात मोठ्या प्रमाणावर रुग्णसंख्या आढळून आली होती. जिल्ह्यात पहिल्या कोरोनाबाधिताचा मृत्यू तालुक्यातच झाला होता. दरम्यानच्या काळात प्रशासनाच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने, तसेच उपाययोजनांची त्यात भर पडल्याने गेले तीन महिने रुग्णसंख्या नगण्य झाली होती, परंतु गेल्या महिन्याभरापासून रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. ग्रामीण भागात बाधितांची संख्या वाढत असून, ती चिंतेची बाब ठरत आहे. तालुक्यातील कलमाडी, तऱ्हाडी, जावदा आदी गावांमध्ये रुग्ण संख्या वाढत आहे. आरोग्य यंत्रणा गावात पथकामार्फत सर्वे करून कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग, तसेच हायरिस्क कॉन्टॅक्ट तपासणीवर भर असला, तरी नागरिकांनी आरोग्य यंत्रणेला सहकार्य करणे गरजेचे आहे.

ईश्वर पाटील

लाेकमत न्यूज नेटवर्क शहादा :  तालुक्यात अचानक एवढी रुग्ण संख्या वाढीचे नेमके कारण काय? कोरोनाचा नवीन ट्रेंड तर नाही ना? याचा शोध आरोग्य यंत्रणेने घेणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे तालुक्यात परदेशवारी करणाऱ्यांची संख्या मोठी आहे, तसेच नाशिक, मुंबई, पुणे या मोठ्या शहरांशी नियमित संपर्क, तसेच ये-जा सुरू असते, याचाही शोध आरोग्य यंत्रणेने घ्यावा. बाहेरून आलेल्यांची तपासणी करून आवश्यक वाटल्यास विलगीकरणाच्या सूचना देणे गरजेचे आहे. रविवारी सकाळी बिलाडी त.सा. व बामखेडा या ठिकाणी चार ते पाच कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने, प्रांताधिकारी डॉ.चेतन गिरसे, तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.राजेंद्र वळवी या अधिकाऱ्यांनी दोन्ही गावांना प्रत्यक्ष भेटी दिल्या. सोमवारी या दोन्ही गावांत आरोग्य पथकामार्फत सर्वेक्षण करून तत्काळ उपाययोजना करण्याचे प्रांताधिकारी डॉ.गिरासे यांनी सांगितले.शहरासह ग्रामीण भागात कोरोना संसर्गजन्य रुग्णांची वाढती संख्या बघता, नागरिकांनी शासकीय नियमावलीनुसार सामाजिक उपक्रम राबवायचे आहेत. आरोग्याची काळजी घेत, मास्क लावून सोशल डिस्टन्सिंग नियमाचे पालन करावे. धार्मिक व सार्वजनिक कार्यक्रम करताना, शासनाच्या नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा संसर्ग कमी होण्यास मदत होणार आहे.