शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

कांदा बियाण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘देशाटन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक नाही. परिणामी शेतकरी परजिल्ह्यातून बियाणे खरेदी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक नाही. परिणामी शेतकरी परजिल्ह्यातून बियाणे खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून शेतकरी नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यात भेटी देत असल्याचे दिसून आले आहे.‘लोकमत’ने याबाबत पडताळणी केली असता, जिल्ह्यातील अनेक भागात यंदा कांदा लागवडीसाठी बियाणेच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील वितरक आणि कांदा बियाणे विक्रेते यांच्याकडे बियाणे शिल्लक नसल्याचा दावा त्यांच्याकडून होत आहे. परंतु काही ठिकाणी दीड हजार रूपये किलो दराने मिळणारे बियाणे शेतकरी चक्क तीन हजार रूपये किलो दर देवून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील शेतकºयांचा समावेश आहे. जिल्ह्यात साधारणपणे रांगडा कांद्याची नोव्हेंबर महिन्यापासून लागवड सुरू करण्यात येते. यंदाही शेतकरी कांदा लागवडीच्या प्रयत्नात होते. परंतु गेल्या काही महिन्यात कांदा बियाणे निर्मिती प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. यातून बियाणे उत्पादक कंपन्यांकडे बियाणे नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. यातून जिल्ह्यात कांदा बियाणे टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर होण्याची शक्यता नसल्याने शेतकरी नातेवाईक तसेच ओळखीच्यांना संपर्क करुन बियाणे मागणी करत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षात कांदा दरांमध्ये होणाºया घसरण आणि वाढीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कांदा लागवडीत वाढ करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा पाउसही चांगला झाला असल्याने शेतकºयांकडून कांदा लागवडीवर भर देण्यात येत आहे.४नंदुरबार तालुक्यात यंदा सर्वाधिक कांदा लागवड होण्याची शक्यता होती. शेतकºयांनी मराठवाड्यातील कन्नड आणि औरंगाबाद परिसरातून बियाण्याची आवक केली आहे. हे बियाणे अत्यंत महाग दरांनी मागणवण्यात आले आहे.४जिल्ह्यात गेल्या हंगामात कांदा उत्पादन हे एकरी साठ ते सत्तर किलो पर्यंत आले होते. परिणामी बियाणे तयार होण्याची प्रक्रिया झालेली नाही. म्हणून शेतकरी धुळे आणि नाशिक जिल्ह्यातही सातत्याने चाचपणी करुन बियाण्याची मागणी करत आहेत.४जिल्ह्यात पावसाळी कांदाही खराब झाला असल्याने शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.यंदा कांदा बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकºयांचे हाल होत आहेत. शेतकरी सर्वत्र संपर्क करुन कानोसा घेत आहेत. परंतु यश पदरात पडत नाही. बियाणे टाकण्याची वेळ टळत असल्याने अनेक जण वाढीव आणि चढ्या दराने कांद्याची खरेदी करत आहेत. ही स्थिती नंदुरबार तालुक्यात सर्वत्र आहे.-समाधान पाटील,शेतकरी, आसाणे ता. नंदुरबार.कृषी विभाग शेतकºयांच्या बियाणे टंचाईवर लक्ष ठेवून आहे. ३४ क्विंटल बियाणे व्यापाºयांकडे होते. हे सर्व बियाणे विक्री झाले आहे.-एन.डी.पाडवी, बियाणे गुणनियंत्रण अधिकारी, कृषी विभाग, नंदुरबार.