शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
2
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
3
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
4
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
5
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
6
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
7
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
8
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
9
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
10
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
11
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
12
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
13
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
14
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
15
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
16
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
17
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
18
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
19
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
20
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!

कांदा बियाण्यासाठी शेतकऱ्यांचे ‘देशाटन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 13:06 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात यंदा कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक नाही. परिणामी शेतकरी परजिल्ह्यातून बियाणे खरेदी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात यंदा कांदा लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांकडे बियाणे शिल्लक नाही. परिणामी शेतकरी परजिल्ह्यातून बियाणे खरेदी करण्याचा प्रयत्न करत आहेत. यातून शेतकरी नाशिक जिल्ह्यासह मराठवाड्यात भेटी देत असल्याचे दिसून आले आहे.‘लोकमत’ने याबाबत पडताळणी केली असता, जिल्ह्यातील अनेक भागात यंदा कांदा लागवडीसाठी बियाणेच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील वितरक आणि कांदा बियाणे विक्रेते यांच्याकडे बियाणे शिल्लक नसल्याचा दावा त्यांच्याकडून होत आहे. परंतु काही ठिकाणी दीड हजार रूपये किलो दराने मिळणारे बियाणे शेतकरी चक्क तीन हजार रूपये किलो दर देवून खरेदी करत असल्याचे समोर आले आहे. यात प्रामुख्याने नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील शेतकºयांचा समावेश आहे. जिल्ह्यात साधारणपणे रांगडा कांद्याची नोव्हेंबर महिन्यापासून लागवड सुरू करण्यात येते. यंदाही शेतकरी कांदा लागवडीच्या प्रयत्नात होते. परंतु गेल्या काही महिन्यात कांदा बियाणे निर्मिती प्रक्रियेवर परिणाम झाला असल्याने अडचणी निर्माण झाल्या होत्या. यातून बियाणे उत्पादक कंपन्यांकडे बियाणे नसल्याने समस्या निर्माण झाली आहे. यातून जिल्ह्यात कांदा बियाणे टंचाई निर्माण झाली आहे. ही टंचाई दूर होण्याची शक्यता नसल्याने शेतकरी नातेवाईक तसेच ओळखीच्यांना संपर्क करुन बियाणे मागणी करत असल्याचे दिसून आले आहे. गेल्या काही वर्षात कांदा दरांमध्ये होणाºया घसरण आणि वाढीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी कांदा लागवडीत वाढ करण्याच्या प्रयत्नात आहेत. यंदा पाउसही चांगला झाला असल्याने शेतकºयांकडून कांदा लागवडीवर भर देण्यात येत आहे.४नंदुरबार तालुक्यात यंदा सर्वाधिक कांदा लागवड होण्याची शक्यता होती. शेतकºयांनी मराठवाड्यातील कन्नड आणि औरंगाबाद परिसरातून बियाण्याची आवक केली आहे. हे बियाणे अत्यंत महाग दरांनी मागणवण्यात आले आहे.४जिल्ह्यात गेल्या हंगामात कांदा उत्पादन हे एकरी साठ ते सत्तर किलो पर्यंत आले होते. परिणामी बियाणे तयार होण्याची प्रक्रिया झालेली नाही. म्हणून शेतकरी धुळे आणि नाशिक जिल्ह्यातही सातत्याने चाचपणी करुन बियाण्याची मागणी करत आहेत.४जिल्ह्यात पावसाळी कांदाही खराब झाला असल्याने शेतकºयांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे.यंदा कांदा बियाणे उपलब्ध नसल्याने शेतकºयांचे हाल होत आहेत. शेतकरी सर्वत्र संपर्क करुन कानोसा घेत आहेत. परंतु यश पदरात पडत नाही. बियाणे टाकण्याची वेळ टळत असल्याने अनेक जण वाढीव आणि चढ्या दराने कांद्याची खरेदी करत आहेत. ही स्थिती नंदुरबार तालुक्यात सर्वत्र आहे.-समाधान पाटील,शेतकरी, आसाणे ता. नंदुरबार.कृषी विभाग शेतकºयांच्या बियाणे टंचाईवर लक्ष ठेवून आहे. ३४ क्विंटल बियाणे व्यापाºयांकडे होते. हे सर्व बियाणे विक्री झाले आहे.-एन.डी.पाडवी, बियाणे गुणनियंत्रण अधिकारी, कृषी विभाग, नंदुरबार.