शहरं
Join us  
Trending Stories
1
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
2
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
3
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
4
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
5
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
6
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
7
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
8
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
9
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
10
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
11
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
12
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
13
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
14
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
15
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
16
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
17
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट
18
मनोज जरांगे पाटील यांची ८ जून रोजी होणारी सभा रद्द, या दोन कारणांमुळे घेतला निर्णय
19
Fact Check: Video - मुंबईत भाजपाच्या किटमध्ये सोन्याची बिस्किटं सापडली?; जाणून घ्या, 'सत्य'
20
...तर ईडी आरोपीला पीएमएलए कायद्यानुसार अटक करू शकत नाही; सर्वोच्च न्यायालयाची महत्वाची टिप्पणी

आदेश झुगारुन जिल्ह्याबाहेर होतेय चाऱ्याची निर्यात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:19 PM

कार्यवाही व्हावी : जळगाव व धुळ्यात मागणी वाढली

कोठार : चाळीसगाव तालुक्यातून कडब्याची मागणी वाढल्याने तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील चाऱ्याला मोठ्या प्रमाणात मागणी आहे़ बाहेरील जिल्ह्यात चारा वाहतूक करण्यास बंदी असतानाही सर्रासपणे जिल्ह्याबाहेर चाºयाची वाहतूक केली जात आहे़जिल्हयातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भविष्यात चाराटंचाई निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने साधारणत: आॅक्टोबर महिन्यापासून जिल्ह्याबाहेर चारा वाहतुकीवर बंदी आणली होती. या आदेशान्वये जिल्ह्यातील चारा परराज्यातील किंवा परजिल्ह्यातील वाहतुकीवर बंदी घातली गेली आहे. परंतु जिल्ह्यात चारा वाहतूक व निर्यातबंदी असताना चाºयाची सर्रास विक्री व वाहतूक होत आहे़ चाºयाच्या जिल्ह्याबाहेर होणाºया वाहतुकीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तळोदा तालुक्यातील पशुपालकांनी तहसीलदारांना निवेदन दिले आहे़ चाºयाची जिल्हाबाहेर होणारी विक्री व वाहतूकीवर आळा बसावा यासाठी प्रशासनाकडून ठिकठिकाणी ‘चेकपोस्ट’ उभारले होते. मात्र चेकपोस्ट उभारणी करूनदेखील चारा निर्यात रोखण्यात यश आलेले दिसत नाही.दिवसाढवळ्या सर्रासपणे चाराची जिल्ह्याबाहेर वाहतूक व विक्री होत असताना याबाबत प्रशासन एवढे अनभिज्ञ कसे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना प्रशासनाने या विषयाकडे संवेदनशीलपणे बघण्याची गरज असताना प्रशासन मात्र चारा वाहतूक बंदीबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे़तळोदा, अक्कलकुवा तालुक्यात उत्पादित होणाºया कडब्याला दरवर्षी चाळीसगाव, कन्नड, पारोळा, धरणगाव, पाचोरा, भडगाव, शिंदखेडा, दोंडाईचा, नरडाणा, चिमठाणे, परिसरात मोठी मागणी असते. यावर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ज्वारी, मका यांसारख्या पिकांचे उत्पादन कमी प्रमाणात आले आहे. त्याचा परिमाण कडबा उत्पादनावरदेखील झाला आहे. यावर्षी कडब्याचे उत्पादन कमी आहे. तरीदेखील चाळीसगाव परिसरात कडब्याची मागणी वाढली आहे. साडेचार हजार ते सात हजार प्रती शेकडा असा दर कडब्याच्या पेंढ्याला मिळत आहे़ तळोदा, अक्कलकुवा परिसरातून अन्य भागात चारा निर्यात करणारी साखळी कार्यरत असल्याचे सांगण्यात येते.तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातून अजूनही दररोज दहा ते पंधरा ट्रक चाºयाची वाहतूक करीत आहेत़ प्रशासनाकडून आडकाठी येऊ नये म्हणून रात्रीच्या वेळी चारा वाहतूक करण्याची नामी शक्कल जिल्हा बाहेरील चारा वाहतूकदारांनी शोधून काढली होती. मात्र आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन निवडणुकीच्या नियोजन व तयारीत व्यस्त आहे. याचा फायदा घेऊन तळोदा, अक्कलकुवा परिसरातून चाºयाची वाहतूक करणाऱ्यांनी घेतला आहे़ त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देत बाहेर जाणाºया चाºयाची वाहतूक थांबवावी अशी मागणी होत आहे़