शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोगमध्ये धक्कादायक निकाल, सरपंचपदाच्या पोटनिवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नीचा पराभव
2
Top Marathi News LIVE Updates: उत्तर प्रदेशात अग्नितांडव! ८ फ्लॅट्स जळून खाक; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
3
वादग्रस्त 'VSR'च्या विमानातून पार्थ पवारांचा प्रवास; वाद वाढताच म्हणाले, "अशी चूक पुन्हा होणार नाही"
4
Suvendu Adhikari : "TMC कडून बोगस मतदानासाठी ७५० खोट्या बोटांची खरेदी"; सुवेंदु अधिकारींचा गंभीर आरोप
5
VIDEO: बापरे... प्रियांश आर्याचा षटकार थेट चाहत्याच्या तोंडावर आदळला, वाहू लागली रक्ताची धार
6
अधिक मास २०२६: मे मध्ये सुरू होणार अधिक मास तथा धोंड्याचा महिना; खगोलशास्त्राच्या नजरेतून पाहा 
7
Summer Vacation 2026: ट्रॅव्हलिंगदरम्यान दिसायचंय स्टायलिश आणि राहायचंय कम्फर्टेबल? पॅकिंग करताना 'या' ५ मस्ट हॅव अॅक्सेसरिज विसरू नका
8
जखमी पतीला रुग्णालयात नेण्यासाठी मागितले पैसे, नंतर पत्नीकडून रुग्णवाहिकाही स्वच्छ करून घेतली
9
Mira Road Stabbing Case: घरातल्यांनी हाकललं, बायकोनंही सोडलं; आरोपी Zaib Zuber याच्या आयुष्यात याआधी काय घडलं?
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर वाढले; लग्नसराईच्या काळात आज चांदी ११०० रुपयांनी महागली, सोन्याचे नवे दर काय?
11
एक गोळीबार अन् उडाली ‘व्हाइट हाउस’ची झोप; सत्तारचनेत 'डेझिग्नेटेड सर्व्हायव्हर' म्हणजे काय?
12
Video - EVM मध्ये बिघाड झाल्याने मतदार संतापले; भाजपा नेत्यावर हल्ला, केला लाठीचार्ज
13
पंजाबविरुद्धच्या लढतीदरम्यान ड्रेसिंग रूमध्येच केलं स्मोकिंग, रियान पराग अडचणीत, व्हिडीओ व्हायरल
14
अनिल अंबानींच्या ३०३४ कोटींच्या संपत्तीवर टाच; फ्लॅटपासून ते फार्महाऊस पर्यंत काय काय जप्त?
15
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नेमकं काय प्यायला द्यायचा?
16
शेअर बाजाराची ग्रीन झोनमध्ये सुरुवात, सेन्सेक्स ३५० अंकांनी, तर निफ्टी १०० अंकांनी वधारला, 'या' शेअर्सवर आज नजर
17
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
18
PSL 2026: बाबर आझमचे वादळी शतक! तब्बल ७ वर्षांनी केला पुन्हा 'तो' पराक्रम; संघही फायनलमध्ये
19
India Heatwave Alert: उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
20
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

आपत्कालीन स्थितीत स्वत:ला शांत ठेवल्यावर सर्व काही सुरळीत होतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:26 IST

नंदुरबार शहरात कोणत्याही भागात आग लागल्यास फोन आल्यानंतर दोन तयार वाहनांपैकी एक वाहन तातडीने मार्गाला लागते. अंतर कितीही असो ...

नंदुरबार शहरात कोणत्याही भागात आग लागल्यास फोन आल्यानंतर दोन तयार वाहनांपैकी एक वाहन तातडीने मार्गाला लागते. अंतर कितीही असो केवळ १० मिनीटात वाहन पोहोचायला हवे असे निश्चित आहे. परंतू या १० मिनीटाच्या काळात किमान ५० किंवा त्यापेक्षा अधिक फोन हे साबळे यांना अटेंड करावे लागतात. गाडी निघाली का, येथपासून ते आली कशी नाही अजून, अरे काय करता तुम्ही अशा तिखट प्रश्नांचा माराही सहन करावा लागतो. यातून मनस्थिती खराब होण्याची शक्यता अधिक असते. परंतू आग लागलेली व्यक्ती संकटात आहे. त्याला अधिक गरज असल्याचा विचार मनात ठेवून उर्मटपणे उत्तर न देता, केवळ सत्यता सांगून समाधान केले जाते. यातून समोरचा आश्वस्त होत असल्याचे साबळे सांगतात. अत्यंत कठीण अशा कामासाठी डोक्यावर बर्फ आणि तोंडावर साखर या दोघांचीच गरज असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. दरम्यान बाहेरगावी गेल्यास दुसरा कर्मचारी नियुक्त करुन जातो. परंतू अनेकांकडे मोबाईल नंबर असल्याने ते फोन करुन आगीच्या घटनेची माहिती देतात. अशावेळी सर्व व्यवस्था करुन देेण्यास प्राधान्य द्यावे लागते.

इतरांच्या कुटूंबांची काळजी

नंदुरबार येथील अग्नीशमन दलाकडे चार वाहने आहेत. यातील दोन वाहने ही कायम तैनात असतात. एखादी घटना घडल्यास फोन आल्यावर समोरच्या व्यक्तीला माहिती देणेही एक काैशल्य आहे. साबळे हे अगदीच घाबरुन न जाता समोरच्याला स्पष्ट आणि मोजक्या शब्दात पत्ता सांगतात.

नंदुरबार शहरासोबतच बाहेरगावीही अग्नीशमन वाहन पाठवण्याचे आदेश आहेत. समोरुन संपर्क करणा-याची संपूर्ण माहिती केवळ काही वेळात घेत चालकाला त्याचा उलगडा करुन द्यावा लागतो. ही सर्व प्रक्रिया करताना फक्त आणि फक्त संयम बाळगणे हेच महत्त्वाचे असल्याचे साबळे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. यातून गोंधळ कमी होवून योग्य ठिकाणी गाडी जाते.n अत्यावश्यक सेवेत काम करताना स्वत:ला मानसिकदृष्ट्या सक्षम ठेवणेही गरजेचे असते. कोणत्याही वेळ संकटात सापडलेले संपर्क करणार याची जाणीव ठेवत काम करावे लागत असल्याचे येथील इतर कर्मचा-यांनी सांगितले.

आगीच्या घटना ह्या सांगून होत नाहीत. रात्री-अपरात्री कधीही फोन येवू शकतो. यातून मग आपल्यापेक्षा समोरच्याचे म्हणणे ऐकून घेणे गरजेचे असते. कुटूंबियांना कामाचे स्वरुप माहिती असल्याने त्यांनी कधीही त्रास न करुन घेता प्रोत्साहन दिले.

-जयराज साबळे, मोटरवाहन निरीक्षक. नंदुरबार.