शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

३५० हेक्टर केळी बागांच्या नुकसानीचा अंदाज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ३५० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसामुळे तळोदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या ३५० हेक्टर क्षेत्रावरील केळीच्या बागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तवला असून रविवारपासून कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष पंचनाम्यांना सुरुवात केली आहे. असे असले तरी पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर पूर्ण करून शासनाने तातडीने नुकसान भरपाई देण्याची अपेक्षा शेतकºयांनी व्यक्त केली आहे.शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास प्रचंड वादळी वाºयासह मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. या वादळामुळे बोरद, खरवड, मोड, खेडले, तºहावद, धानोरा, मोरवड, तळवे, आमलाड या पूर्व भागातील गावांमधील शेतकºयांच्या केळीच्या बागा अक्षरश: उद्ध्वस्त झाल्या आहेत. शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास आसमानी संकटाने हिरावून घेतला आहे. यात शेतकºयांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. अनेक अल्पभूधारक शेतकºयांच्या केळीच्या बागाही नष्ट झाल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय काही पपईच्या बागादेखील आडव्या पडल्या आहेत. कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार साधारण ३५० हेक्टर क्षेत्रावरील केळी पिकाचे नुकसान झाल्याचे अधिकाºयांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्वच प्रमुख लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष शेतात जाऊन नुकसानीची पाहणी केली आहे. तळोदा कृषी कार्यालयाकडून शेतपिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही रविवारपासूनच करण्यात आली आहे. पंचनाम्यांची कार्यवाही कृषी विभागाने तात्काळ हाती घेतली असली तरी त्यास गती देण्याची अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त होत आहे.आमदारांकडून पाहणीआमदार राजेश पाडवी यांनी शनिवारी उपविभागीय अधिकारी अविशांत पांडा, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले यांच्यासह मोड, बोरद, खरवड, मोरवड, आमलाड या गावांना भेट देऊन पिकांच्या नुकसानीची पाहणी केली. याशिवाय घरांच्या नुकसानीचीही पाहणी केली. पंचनाम्याचे काम त्वरित पूर्ण करण्याच्या सूचना आमदार पाडवी यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या आहेत.बोरद परिसरातखासदारांकडून पाहणीतळोदा तालुक्यातील मोड, बोरद, खरवड, तºहावद, खेडले येथे वादळ व पावसामुळे पडझड झालेल्या घरांची व शेतपिकांच्या नुकसानीची पाहणी रविवारी खासदार डॉ.हीना गावीत यांनी केली. वादळात ज्यांच्या घरांच्या नुकसान झाले आहे अशा बाधीतांची तात्पुरती सोय जि.प. शाळांमध्ये करण्याची सूचना खासदार डॉ.हीना गावीत यांनी केली. पडझड झालेली घरे व नुकसान झालेल्या शेतपिकांची पाहणी केल्यानंतर संबंधित विभागांना तातडीने पंचनामे पूर्ण करावेत व नुकसानग्रस्तांना मदत मिळवून द्यावी, असे सांगितले. खंडित झालेला वीजपुरवठा त्वरित दुरुस्ती करून सुरळीत करावा व ग्रामपंचातींनी जनरेटर लावून पाणीपुरवठा करण्याची सूचनाही त्यांनी केली. या वेळी पं.स.चे माजी सभापती जितेंद्र पाडवी, तहसीलदार पंकज लोखंडे, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे, नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे, बांधकाम विभागाने शाखा अभियंता नितीन वसावे, वीज कंपनीचे सहायक कार्यकारी अभियंता सचिन काळे, तालुका कृषी अधिकारी नरेंद्र महाले, सरपंच जयसिंग माळी, ग्रामविस्तार अधिकारी जाधव, शांतीलाल बावा, मंडळ अधिकारी माया मराठे, तलाठी अरुण धनगर यांच्यासह अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.या वादळी पावसामुळे मोड, बोरद गावासह सरदार सरोवर प्रकल्पात बाधीत झालेल्या मोड पुनर्वसन, तºहावद, रेवानगर या वसाहतींमधील जवळपास शंभरावर घरांचे नुकसान झाले आहे. महसूल प्रशासनाने या नुकसानग्रस्त घरांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाहीही रविवारपासून सुरू केली असल्याचे बाधीतांनी सांगितले. या वादळात घरांचेही मोठे नुकसान झाल्याचे सांगण्यातआले.वादळी पावसात नुकसान झालेल्या शेतकºयांच्या केळीच्या बागांचे नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले असून काम पूर्ण झाल्यानंतर अहवाल प्रशासनाकडे देण्यात येईल.-नरेंद्र महाले,तालुका कृषी अधिकारी, तळोदा.