शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण रद्द झाल्याने मराठा समाजाची निराशा- प्रतिक्रीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2021 04:32 IST

केंद्र व राज्याचा समन्वयाचा अभाव राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयाअभावी आरक्षण रद्द होणे मराठा समाजाच्या दृष्टीने निराशाजनक आहे. ...

केंद्र व राज्याचा समन्वयाचा अभाव

राज्य व केंद्र सरकारच्या समन्वयाअभावी आरक्षण रद्द होणे मराठा समाजाच्या दृष्टीने निराशाजनक आहे. राज्य सरकार जीव तोडून प्रयत्न करत असतांनाच केंद्र सरकारनेही हातभार लावला असता तर आज निर्णय मराठा समाजाच्या हिताचा झाला असता. मराठा समाज ९०% शेतीवर गुजराण करत असतो. दुष्काळ अवकाळीने शेतकरी पिचलाय. बेरोजगार तरुणांची फौज प्रत्येक गावखेड्यात तयार होत आहे. १०% संपन्न मराठ्यांकडे पाहून आपण ९०% समाजावर अन्याय करत आहोत. ही बाजू समजून घ्यायला हवी होती. केंद्राने ठरविले तर संसदेत कायदा करून मराठा समाजाला घटनात्मक कायमस्वरूपी आरक्षण मिळू शकते.

- राजेंद्र पाटील, विभागीय सचिव, मराठा सेवा संघ, संयोजक सकल मराठा क्रांती मोर्चा, नंदुरबार.

अनपेक्षित आणि धक्कादायक निकाल

सर्वोच्च न्यायालयाने दिलेला मराठा आरक्षण रद्द करण्याचा निकाल हा अनपेक्षित आणि धक्कादायक आहे. त्यामुळे समाजातील गरीब कुटुंबासह विद्यार्थ्यांचे खूप मोठं नुकसान करणारा हा निर्णय आहे. शांततेने केलेले आंदोलन आणि मूक मोर्चाने काही साध्य होत नसेल तर समाजाला दुसरा मार्ग अवलंबवावा लागेल. आरक्षण कोणत्याही परिस्थितीत घेणारच हे मात्र निश्चित.

- संतोष मराठे, मराठा आरक्षण समन्वय समिती संपर्क प्रमुख, महाराष्ट्र राज्य.

मागासवर्गीय आयोगाचा अहवालाचीही दखल नाही

मराठा आरक्षणासंदर्भतील निर्णय अनपेक्षित, अनाकलनीय, निराश करणारा आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल आणि शिफारस असूनही असा निर्णय येणे हे धक्कादायक वाटते. ‘देशातील अन्य राज्यात आरक्षणाची मर्यादा पन्नास टक्क्यांच्या पुढे आहे, असे असताना मराठा आरक्षणासंदर्भात त्याचा विचार का करण्यात आला नाही. नवीन न्यायपीठानेही ही बाब विचारात का घेतली नाही, हे पटत नाही. इतर राज्यांत चालते, मग महाराष्ट्राबाबतच हा दुजाभाव का,’ असा प्रश्न साहजिकच उपस्थित होतो. आता राज्य सरकार समाजबांधवांना कसं धीर देते, ही भरपाई कशी भरून काढते हे महत्त्वाचे आहे.

- मधुकर पाटील, पदाधिकारी, मराठा सेवा संघ, नंदुरबार.

तोंडी आलेला घास हिरावून घेतला

आरक्षणासाठी लढत आलेला मराठा समाज आज संतप्त होणे स्वाभाविक आहे. कारण एवढ्या मोठ्या संख्येने काढले गेलेले मोर्चे, अनेक लोकांनी दिलेले बलिदान व जगाने आदर्श घ्यावा असे शिस्तबद्ध मोर्चे काढूनही जर कधी आरक्षण दिले जात नसेल याचे फार मोठे दुःख वाटते. त्यात युवकवर्ग कमालीचा नाराज झालेला दिसून येत आहे. तोंडी आलेला घास हिरावून घेतल्यासारखे प्रत्येकाला वाटते. राजकारण व श्रेय बाजूला ठेऊन सकारात्मक मार्ग काढणे हाच मराठा समाजासाठी योग्य उपाय ठरू शकतो.

- विठ्ठल मराठे, मुख्य समन्वयक, मराठा समाज परिवर्तन चळवळ, नंदुरबार.

सत्य माहिती न्यायालयापर्यंत पोहोचू दिली नाही

ज्यांनी मराठा समाजाची फसवणूक करून न्यायालयापर्यंत सत्य माहिती पोहोचवण्याचं काम केलेलं नाही, अशा प्रवृत्तीचा नाश करावा लागेल. त्यासाठी आपण भव्य दिव्य असं पुन्हा आंदोलन करू पण ती वेळ आजची नसून येणाऱ्या पुढील कालावधीची ठेवावी लागणार आहे. याचा सर्व मराठा समाजाने विचार करणे आवश्यक आहे. कोणत्याही राजकीय नेत्याच्या भाषणाला बळी पडून समाजामध्ये तेढ निर्माण होईल, असे कृत्य आपल्याकडून होता कामा नये ही अपेक्षा.

- नितीन जगताप, समन्वयक, सकल मराठा क्रांती मोर्चा, नंदूरबार.