शहरं
Join us  
Trending Stories
1
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
2
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
3
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
4
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
5
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
6
इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
7
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
8
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
9
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
10
पेट्रोल-डिझेल गाड्या इतिहासजमा होणार; नितीन गडकरींचा वाहन उत्पादकांना इशारा...
11
IPL 2026: अजब गजब आरोप! वैभव सूर्यवंशीच्या बॅटबद्दल बोलताना PAK एक्सपर्टने तोडले अकलेचे तारे
12
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
13
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची क्रेझ! प्रदर्शनाआधीच हजारो तिकिटांची विक्री; वाचा रिपोर्ट
14
कंपन्या AI साठी कर्मचाऱ्यांना काढतायत नंतर पस्तावतायत! पगारापेक्षा जास्तच होतोय खर्च, काय म्हणतायत कंपन्यांचे सीईओ... 
15
तिसऱ्यांदा बोनस शेअर देणार 'ही' बँक; पाहा किती Shares मिळणार? डिविडंडचीही घोषणा
16
‘शिवाजी कोण होता?’ वाचनावरून तणाव; पोलिसांनी आंदोलन चिरडल्याचा आरोप
17
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
18
“अरविंद केजरीवाल कार्यालयात महात्मा गांधींची प्रतिमा का लावत नाहीत”; काँग्रेसचा थेट सवाल
19
Harsha Richhariya : "एकही आरोप सिद्ध झाला तर सर्व संपत्ती..."; हर्षा रिछारियाचं सडेतोड उत्तर, दिलं थेट आव्हान
20
"माझी मुलं श्रेयस अय्यरला हाक मारताना..."; प्रिती झिंटाने IPLच्या 'सरपंच'बद्दल केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

वडाळी ते काकर्दा मार्गावरील रंगूमदी नदीवर पूल उभारण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:31 IST

मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने पाच वर्षांची हमी दिलेली असते. मात्र, या रस्त्याकडे कोणीही फिरकूनदेखील पाहिले नाही. त्यामुळे या रस्त्यासंदर्भात तातडीने ...

मार्गाच्या दुरुस्तीसाठी ठेकेदाराने पाच वर्षांची हमी दिलेली असते. मात्र, या रस्त्याकडे कोणीही फिरकूनदेखील पाहिले नाही. त्यामुळे या रस्त्यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्यात येत नाही. या मार्गाने काकर्दा, खापरखेडा, अभणपुरा तसेच स्वाध्याय परिवाराचे प्रेरणास्थान परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांच्या संकल्पनेतील भावकृषी येथे जाता येत असल्याने या रस्त्यावर वाहनांची नेहमीच वर्दळ असते. हा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक चारला जोडला गेला असल्याने गुजरात व मध्यप्रदेशात जाण्यासाठी हा रस्ता सोयीचा आहे. या रस्त्यावर बऱ्याच ठिकाणी प्राणघातक वळणे असल्याने संबंधित वाहनचालकाला दिशादर्शक फलक नसल्याने रस्त्याचा अंदाज येत नाही. हा रस्ता दोन्ही बाजूने काटेरी झुडपांनी व्यापला असून, वाहनधारकांचे वेगावर नियंत्रण नसल्याने समोरील वळणे दिसत नसून, पर्यायाने या ठिकाणी अपघात होतात. यावर दिशादर्शक फलक लावणे किंवा गतिरोधक टाकणे आवश्यक असताना सदर ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे अत्यंत वर्दळीच्या रस्त्यावर जीवघेणा अपघातात प्राण गमावणाऱ्यांच्या संख्याप्रमाणेच गंभीर जखमींची संख्याही अलीकडेच वाढल्याचे दिसून आले आहे. त्या रस्त्याच्या समस्येकडे लोकप्रतिनिधी व संबंधित विभागासह, ठेकेदाराने तात्काळ लक्ष घालावे, अशी मागणी परिसरातील ग्रामस्थ वाहनधारकांकडून होत आहे.

वडाळीपासून सहा किलोमीटरवर काकर्दा ते वडाळी रस्ता हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून झाला असून, या रस्त्याच्या दोन्ही बाजूंना काटेरी झुडपे झाली आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीला मुहूर्त मिळत नसल्याने शेतकऱ्यांनाही याचा त्रास होत आहे. या मार्गाला लागूनच परिसरातील शेतकऱ्यांचे शेतशिवार आहेत.

- आत्माराम बैसाणे, शेतकरी, वडाळी