शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

जिल्ह्यात मृत्यूसंख्येसह मृत्यूदरातही झाली वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2020 11:51 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या मृत्यूची संख्या ५२ झाली आहे. यामुळे मृत्यूदरही ४.८५ पर्यंत पोहचला आहे. दरम्यान, ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील कोरोनाबाधीतांच्या मृत्यूची संख्या ५२ झाली आहे. यामुळे मृत्यूदरही ४.८५ पर्यंत पोहचला आहे. दरम्यान, जिल्हा रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी आरटीपीसीआर चाचणी प्रयोगशाळेचे उद्घाटन होऊनही चाचणी अहवालांची वेटींग तब्बल ७०० पर्यंत आहे. त्यामुळे संशयीत अनेकांची घालमेल कायम आहे.जिल्ह्यातील कोरोना बाधीत आ िमृत्यूची संख्या कमी होण्याचे नाव घेत नसल्याची स्थिती आहे. दिवसेदिवस आकडा वाढतच चालला आहे. मृतांची संख्या देखील वाढत आहे. रविवारी १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. एकुण ५२ मृत्यूपैकी सर्वाधिक ३० मृत्यू हे नंदुरबार तालुक्यातील आहेत. त्यामुळे शहर आणि तालुक्यात चिंतेचे सावट पसरले आहे.मृत्यूदर वाढतोय...वाढत्या मृत्यूसंख्येमुळे जिल्ह्याचा कोरोना मृत्यूदरही वाढत असल्याचे चित्र आहे. आतापर्यंत चार च्या घरात असलेला मृत्यूदर आता पाचच्या घरात गेला आहे. सद्यस्थितीत हा दर ४.८५ पर्यंत गेला आहे.जिल्ह्यात सर्वाधिक मृत्यू हे नंदुरबार शहर व तालुक्यात आहेत. आतापर्यंत ३०जणांच्या मृत्यूची नोंद नंदुरबारात झाली आहे. याशिवाय शहादा तालुक्यात १६जणांचा मृत्यू झाला आहे. तळोदा व नवापूर तालुक्यातील प्रत्येकी तिघांचा मृत्यू झाला आहे.वृद्धांची संख्या अधीकमृत्यू झालेल्यांमध्ये वद्धांची संख्या सर्वाधिक आहे. ५२ पैकी ३६ जण हे ६० पेक्षा अधीक वयाचे आहेत. १४ जण हे ४० ते ६०वर्ष वयाच्या दरम्यानचे आहेत. तर दोनजण हे ४० पेक्षा कमी वयाचे आहेत. याचा अर्थ वद्धांच्या मृत्यूदर हा अधीक आहे. जे वद्ध मृत्यू झाले आहेत त्यांना इतर व्याधींनीही ग्रासले होते असे जिल्हा रुग्णालय प्रशासनाचे म्हणने आहे.त्यामुळे व्याधीग्रस्त वद्धांना घराबाहेर निघू न देणे, प्रवासाला न नेणे हाच प्रमुख उपाय असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.बाधीतांची संख्या वाढतेयजिल्ह्यात बाधीतांची संख्या देखील वाढत आहे. अतापर्यंत ११०० च्या घरात आकडा गेला आहे. अजूनही तब्बल ७०० अहवालांची प्रतिक्षा कायम आहे. त्यामुळे बाधीतांचा आकडा आणखी मोठ्या संख्येने वाढण्याची भिती व्यक्त होत आहे.

नंदुरबारात आरटीपीसीआर प्रयोगशाळेचे उद्घाटन करण्यात आले. मात्र या ठिकाणी अजूनही स्वॅब तपासणीची गती अतीशय संथ गतीने सुरू असल्याचे चित्र आहे. या प्रयोगशाळेत एका दिवसात १२०० स्वॅब तपासणीची क्षमता आहे. परंतु तरीही गेल्या दोन दिवसात स्वॅब वेटींगची संख्या ही ७०० पार राहत आहे. याचा अर्थ अद्यापही धुळे प्रयोगशाळेवरच अवलंबून राहावे लागत असल्याचे दिसून येत आहे. वेटींग वाढत असल्याने स्वॅब दिलेल्या अनेकांचे जीव टांगणीला आहेत. ज्या संशयीतांचा मृत्यू झाला आहे त्या संशयीतांचे अहवालही आलेले नाहीत. काहीजण तर स्वॅब देण्याच्या वेळ त्यांची प्रकृती खालावलेली होती, परंतु स्वॅब दिल्यानंतर पाच दिवसातही अहवाल न येताच त्यांची प्रकृती ठणठणीत झाली आहे. आता त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला तर त्यांना पुन्हा दहा दिवस रुग्णालयात काढावे लागणार आहेत.