शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
2
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
5
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
6
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
7
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
8
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
9
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
10
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
11
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
12
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
13
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
14
भारतीय ड्रायव्हर्संना डोनाल्ड ट्रम्प यांचा झटका! वर्कर व्हिसा मिळणार नाही, अमेरिकेतील नोकऱ्या जाणार
15
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर
16
Pune: हनी ट्रॅप प्रकरणातील प्रफुल लोढाचे आणखी एक कांड; पिंपरी पोलिसांनी केली अटक; महिलेच्या तक्रारीत काय?
17
जोधपूरला जाणारे एअर इंडियाचे विमान अचानक परतले, मुंबई विमानतळावर गोंधळ! नेमकं झालं काय?
18
'कॅस्पियन समुद्र' गायब होतोय का? पाच वर्षात ३ फूट पाणी कमी झालं; 'या' ५ देशांना धोका, कारण...
19
डी-गँगच्या 'ड्रग्ज फॅक्टरी'वर धाड, 92 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, मुंबई-ठाण्याचंही कनेक्शन
20
Rain Alert : गणपतीच्या आगमनाला पावसाचा 'ताशा'! पुढचे काही दिवस 'मुसळधार' कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना इशारा?

ग्रामीण भागात स्वच्छाग्रही करताहेत जाणीव जागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2020 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छाग्रहींची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना विषाणू संसर्गजन्य परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत स्वच्छाग्रहींची नियुक्ती करण्यात आली आहे़ ग्रामीण स्तरावर हे स्वच्छाग्रही ग्रामीण भागात स्वच्छ हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करुन दाखवत जाणीव जागृती करत आहेत़ यातून ग्रामस्थांमध्ये वैयक्तिक व परिसर स्वच्छतेचे महत्त्व वाढत आहे़जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजनांना वेग देण्यात येत आहे़ यात ग्रामीण भागासाठी अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे़ यांतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीत सरपंच व ग्रामसेवक तसेच इतर प्रशासकीय यंत्रणेच्या माध्यमातून गावागावात औषध फवारणी करून गाव निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. ग्रामस्तरावर कार्यरत असलेल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी आणि स्वच्छाग्रही यांच्यामार्फत कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांमध्ये मास्क लावणे , हात धुणे, तोंडाला नाकाला रुमाल बांधणे, सामाजिक अंतर राखणे याविषयी जाणीव जागृती करण्यात येत आहे. ग्रामपंचायतस्तरावर कोरोना हद्दपार करण्यासाठी स्वच्छाग्रहींना सहभागी करून घेणेबाबत राज्यस्तरावरून सूचना प्राप्त होत्या. त्यानुसार पाणी व स्वच्छता विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. वर्षा फडोळ यांनी गट विकास अधिकारी, विस्तार अधिकारी, गट संसाधन केंद्राच्या कर्मचाऱ्यांमार्फत स्वच्छाग्रहींना या आपत्कालीन परिस्थितीत आवश्यक ती सुरक्षिततेची खबरदारी घेऊन गावात काम करण्याचे प्रशिक्षण दिले होते़ त्यानुसार जिल्ह्यातील स्वच्छाग्रहींनी ग्रामीण भागात काम सुरु केले आहे़ यात प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करुन ग्रामीण भागात कोरोनाला लांब ठेवण्याबाबत सांगितले जात आहे़स्वच्छ भारत मिशन अंतर्गत ग्रामपंचायतस्तरावर स्वच्छतेविषयक बाबींवर प्रशासनाला सहकार्य करणे करीता व स्वच्छते विषयक ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत एक किंवा दोन स्वयंसेवकांची नियुक्ती करण्यात आदेश ूदेण्यात आले होते़ यांतर्गत आतापर्यंत ५८६ ग्रामपंचायतींमध्ये १ हजार १४८ स्वच्छाग्रही नियुक्त झाले आहेत़ त्यांच्याकडून दिवसभरात त्या-त्या गावांमध्ये भेटी देऊन स्वच्छतेविषयी माहिती देण्यात येत आहे़ खासकरुन स्वच्छाग्रही म्हणून नियुक्त असलेले प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करत आहेत़ यातून हात धुणे आणि स्वच्छता राखणे यावर प्रबोधन होत आहे़ ग्रामीण भागात शिक्षित युवकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवला असून गावातील महिला आणि युवतीही पुढे येत आहेत़ येत्या काळात कोरोनाला जिल्ह्यातून हद्दपार करण्यासाठी स्वच्छाग्रहींचे कार्य प्रभावीपणे कामी येणार असल्याचे बोलले जात आहे़स्वच्छाग्रहींकडून ग्रामस्थांच्या गृहभेटींवर सर्वाधिक भर दिला जात आहे़या भेटीतून सामाजिक अंतर राखणे, खोकताना व शिंकताना तोंडावर रुमाल धरणे, मास्क वापरणे ,हात धुणे याविषयी वैयक्तिकरीत्या किंवा इतर कर्मचाऱ्यांसोबत सोबत माहिती देण्यात येत आहे़सर्वच ठिकाणी प्रारंभी स्वच्छाग्रही ग्रामस्थांना हात धुण्याची पद्धत, हात कसे धुवावेत याचे प्रात्यक्षिक करून दाखवत आहेत़ग्रामपंचायतीमार्फत वाटप करण्यात येत असलेले मास्क व सॅनेटायझरचे वाटप करण्याच्या कामातही स्वच्छाग्रही पुढाकार घेतला आहे.ग्रामस्थांमध्ये शौचालय वापर, वैयक्तिक स्वच्छता, परिसर स्वच्छता याविषयी माहिती देण्यावर भर दिला जात आहे़जिल्ह्यातील ग्रामीण भागात सध्या कोरोनाबाबत भिती आहे़ या मोहिमेमुळे ग्रामस्थांमध्ये कोरोनाबाबत असलेले गैरसमज व भिती दूर होऊन सोशल डिस्टन्सिंगचा प्रचार आणि प्रसार होत आहे़