शहरं
Join us  
Trending Stories
1
उमेदवारी अर्ज मागे घेऊन काँग्रेस उमेदवार भाजपत; तिसऱ्या जागी विजय निश्चित
2
एआयद्वारे फेक व्हिडीओ; अघटित घडविण्याचा डाव; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विराेधकांवर हल्लाबाेल
3
सेक्स स्कँडल : प्रज्वलची पक्षातून हकालपट्टी; माजी पंतप्रधान देवेगौडांचे कुटुंब आरोपांनी घेरले
4
भाजप व रा. स्व. संघाची संविधान बदलण्याची योजना : राहुल गांधी
5
तीन विधानसभा निवडणुकीत मतांची टक्केवारी घसरली, तरीही राज ठाकरे महायुतीला का हवे आहेत?
6
पारा वाढता वाढे, देशभरात उकाडा; वाढत्या तापमानाने नागरिक हैराण, राज्यातही उष्णता वाढणार
7
राहुल शेवाळे यांच्या स्थावर मालमत्तेत सात कोटींची वाढ; २०१९'ला स्थावर मालमत्ता नसल्याचे नमूद होते
8
अरविंद सावंत यांच्याकडे एकच कार; संपत्ती पाच वर्षांत दुप्पट
9
अनिल देसाई यांच्या मालमत्तेत पावणेतीन कोटींची वाढ; स्थावर मालमत्तेत वाढ नाही
10
कांद्याची फसवी फाेडणी; सरकारचे शेतमाल निर्यातीचे धाेरण नेहमीच ग्राहकहिताचे
11
मुख्यमंत्री खूप दिवस गैरहजर राहू शकत नाहीत; विद्यार्थ्यांचे हक्क पायदळी तुडवता येणार नाहीत; दिल्ली हायकोर्ट
12
राजन विचारे यांच्या मालमत्तेत ११ कोटींची वाढ; रत्नागिरी जिल्ह्यात शेतजमीन
13
नागपूर विमानतळ उडविण्याची धमकी; ई-मेलनंतर प्रशासन अलर्ट मोडवर; सुरक्षा व्यवस्थेत वाढ
14
‘ठाण्या’चे नाक दाबून तीन मतदारसंघ भाजपने घेतले सोडवून
15
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
16
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
भाजप नेते दुष्यंत गौतम यांच्या कारला अपघात, मणक्याला दुखापत
18
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
19
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
20
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे

नियुक्तीपासूनच रोजंदारांचे प्रलंबित राहिले मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 12:02 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने ७८७ कर्मचारी नेमण्यात आले आहे. त्यांची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : आदिवासी विकास विभागाच्या तळोदा प्रकल्प कार्यालयांतर्गत आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने ७८७ कर्मचारी नेमण्यात आले आहे. त्यांची जून २०१९ पासून नियुक्त करण्यात आले असले तरी त्यांना अद्याप मानधन मिळाले नाही. त्यामुळे हे कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे.तळोदा प्रकल्प कार्यालयामार्फत अक्कलकुवा, धडगाव व तळोदा या तीन तालुक्यांमध्ये शासकीय आश्रमशाळा चालविण्यात येत आहे. या शाळांमध्ये सेवा देणारे अनेक कर्मचारी निवृत्त झाले तर काहींचा मृत्यूही झाला. परंतु त्या जागा पुढे भरण्यात आल्या नाही. रिक्त जागांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी सर्व शाळांवर पात्रता पूर्ण करणाऱ्या ुउमेदवारांना रोजंदारीने नेमण्यात आले आहे. त्यात अनेक शिक्षकांसह वर्ग चारमधी कर्मचाऱ्यांनाही नेमण्यात आले आहे.या कर्मचाºयांना दरवर्षी शाळा सुरू होतांनाच नियुक्तपत्र देण्यात येते. तसे या शैक्षणिक वर्षासाठीही जून २०१९ मध्ये नियुक्ती पत्रे देण्यात आली होती. परंतु या रोजंदारीने सेवा देणाºया कर्मचाºयांना अद्याप मानधन देण्यात आले नाही. त्यामुळे हे कर्मचारी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. या कर्मचाºयांच्या कौटुंबिक समस्या व त्यांच्या आर्थिक अडचणी लक्षात त्यांना तातडीने प्रलंबित मानधन देण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे.तळोदा प्रकल्पांतर्गत बहुतांश शासकीय आदिवासी आश्रम शाळांमधी विद्यार्थ्यांची संपर्ण जबाबदारी केवळ रोजंदारीने सेवा देणाºया कर्मचाºयांवर अवलंबून आहे. त्यामुळे या कर्मचाºयांना आर्थिक असो वा कौटुंबिक कुठल्याही समस्या येणार नाही. पुर्णत: जबाबदारी प्रशासन स्तरावरुन होणे अपेक्षित आहे. परंतु तसे होत नाही. त्यामुळे या कर्मचाºयांमधून प्रशासनाच्या भूमिकेबाबत नाराजीचा सूर उमटू लागला आहे. ही नाराजी व्यक्त केली जात असतांनाच नऊ महिन्यांपासून प्रलंबित राहिलेले मानधन तातडीने देत या कर्मचाºयांना आर्थिक आधार द्यावा, अशी मागणी तीन्ही तालुक्यांमध्ये कार्यरत असलेल्या रोजंदारी कर्मचाºयांमधून करण्यात येत आहे.४आदिवासी आश्रमशाळांमध्ये रोजंदारीने नेमण्यात आलेल्या कर्मचाºयांकडून महिनाभर काम करुन घेतले जात असून मानधन मात्र केवळ २१ दिवसांचेच मिळत असल्याच्या व्यथा या कर्मचाºयांकडून मांडण्यात येत आहे. मानधनासाठी शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्यात येते मात्र काम करुन घेतांना कर्मचाºयांचा कुठलाही विचार केला जात नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.४रोजंदारीने ज्ञानदान करणाºया शिक्षकांना ३५ ते ४५ मिनीटाच्या पाच तासिका देण्यात आल्या आहे. परंतु हे शिक्षक नेमून दिलेल्या तासिकांपेक्षा अधिक योगदान देत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यात सकाळी ११ वाजेपासून सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत थांबावेच लागत असल्याने हा कालावधी पाच तासिकांपेक्षा अधिक होत असल्याचे सांगण्यात येते.शासनामार्फत तातडीच्या कामांसाठी निधी उपलब्ध करुन दिल्याचे म्हटले जाते. अशा तातडीच्या कामांमध्ये नऊ महिन्यांनंतर का असेना या रोजंदारीने सेवा देणाºया कर्मचाºयांचा विचार होणे अपेक्षित होते. परंतु तसे शासन यंत्रणेमार्फत होत नाही. त्यामुळे या कर्मचाºयांची सेवा बेदखल ठरत आहे. इमर कामांप्रमाणेच या सेवाचीही दखल व्हावी.आश्रमशाळांमध्ये कार्यरत असणाºया रोजंदारी कर्मचाºयांमध्ये शिक्षक व चतुर्थ श्रेणी कर्मचाºयांचा समावेश आहे. त्यात प्राथमिक शिक्षकांना दरमहा १३ हजार १२५, माध्यमिक शिक्षकांना १५ हजार ५००, उच्च माध्यमिक शिक्षकांना १५ हजार ५००, शिपाई प्रयोगशाळा परिचर यांना नऊ हजार तर स्वयंपाकीण व कामाठी यांना १२ हजार असे मानधन देण्याची तरतुद करण्यात आली आहे.तीन्ही तालुक्यातील शासकीय आदिवासी आश्रशाळांमध्ये रोजंदारीने अधिक्षकांची नियुक्त करण्यात आली नसून नियमित सेवेतील उमेदवारांकडेच ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे. परंतु नियमित अधिक्षिका उपलब्ध होत नसल्याचे काही अधिक्षिकांची रोजंदारीनेच नियुक्ती करण्यात आली आहे. या महिला अधिक्षिकांना शिक्षकांप्रमाणेच दरमहा १५ हजार मानधन देण्याची तरतुद करण्यात आली आहे.