शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
2
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
3
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
4
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
5
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
6
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
7
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
8
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
9
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
10
Marathi News LIVE: डोंबिवली रेल्वे स्थानकाच्या फलाटावर विद्युत जनित्राचा स्फोट, सेवा अनिश्चित काळासाठी बंद
11
"जनतेला त्यागाचा उपदेश करण्यापेक्षा PM मोदींनीच राष्ट्रहितासाठी..."; काँग्रेसचा टोला
12
अंगावर पेट्रोल ओतलं, हात-पाय बांधले अन्... पोलिसांना अडकवण्यासाठी महिला यूट्यूबरने रचला अपहरणाचा 'ड्रामा'
13
"मी खूप घाबरले होते...", दिशा परदेशीने संजय दत्तसोबत काम करतानाचा सांगितला अनुभव
14
PM Narendra Modi: एक वर्ष सोनं खरेदी करू नका, हे आवाहन कशासाठी? त्यात देशाचा काय फायदा? सोप्या शब्दांत समजून घ्या 'अर्थ'कारण
15
Photos: खूपच सुंदर दिसते निशिगंधा वाड यांची लेक ईश्वरी; पाहा तिचे ग्लॅमरस फोटो
16
Astro Tip: वाईट स्वप्नांपासून हवीये मुक्ती? रोज रात्री झोपण्यापूर्वी आवर्जून ऐका 'हे' प्रभावी स्तोत्र!
17
“जगाने निर्बंध लादायचे प्रयत्न केले, पण भारत कुणापुढे झुकला नाही”; पोखरणवर PM मोदी थेट बोलले
18
IPS TanuShree : खाकी वर्दीचं स्वप्न! लग्न, बाळ, घराची जबाबदारी सांभाळत 'ती' झाली IPS; आव्हानांवर केली मात
19
Travel : कोकणचा किनारा अन् शांतता अथांग... गोवाही विसरायला लावतील महाराष्ट्रातील 'हे' ५ सुपरहिट बीचेस
20
Solo Trip: ऑफिस आणि घरापलीकडचं जग! स्त्रियांनी आयुष्यात एकदा तरी 'एकट्याने' का फिरावं?
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे शेतकऱ्यांना उभारी खरीप क्षेत्राची ९९ टक्के भरारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पावसाने जोर धरला असल्याने जिल्ह्यात थांबवण्यात आलेल्या पेरण्यांचे आकडे पुन्हा वाढत असून सोमवारअखेरीस ९९ टक्के क्षेत्रावर पिकांच्या पेरण्या पूर्ण झाल्याची माहिती आहे़ शेतकऱ्यांनी सरासरी ४० टक्के पाऊस असताना ९० टक्के पेरण्या गेल्या १५ दिवसांपूर्वीच पूर्ण केल्या होत्या़
जिल्ह्यात पाऊस बरसणार असल्याची माहिती असून येत्या दोन-चार दिवसात १०० टक्के पेरणीक्षेत्रावर खरीप पिके दिसून येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे़ शेतकºयांनी यंदा प्रामुख्याने कापूस, सोयाबीन, भात, ज्वारी आणि मका या पिकांवर भर दिला आहे़ पावसाअभावी यंदा कडधान्य पिक पेरणीत घट येऊन क्षेत्रही कमी झाल्याचे दिसून आले आहे़ गेल्या वर्षी जिल्ह्यात झालेल्या विक्रमी पावसाच्या पार्श्वभूमीवर शेतकºयांनी १०० टक्क्यांपेक्षा अधिक क्षेत्रात पेरण्या केल्या होत्या़ पाऊस उशिराने आल्याने पेरणीचा कालावधी लांबला होता़ यंदाही तीच स्थिती निर्माण झाल्याने शहादा तालुका वगळता इतर पाच तालुक्यातील शेतकºयांनी पावसाचा अंदाज घेत पिकांच्या पेरणीला सुरूवात केली होती़ यातून अद्याप ठिकठिकाणी पेरणीची कामे शेतकरी करत असल्याचे चित्र दिसून येत आहे़
यंदाच्या हंगामात शहादा तालुक्यात ९९ टक्के, तळोदा ११०, धडगाव १०९ तर अक्कलकुवा तालुक्यात १०१ टक्के पेरण्या झाल्या आहेत़ पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने या तालुक्यांमध्ये निर्धारित क्षेत्रापेक्षा वाढीव पेरण्या झाल्या आहेत़
दुसरीकडे सर्वाधिक पसंतीचा कापूस यंदा १ लाख २४ हजार ६६४ हेक्टरवर लागवड करण्यात आला आहे़ यात नंदुरबार ४८ हजार ८१, नवापूर ८ हजार ५३१, शहादा ५० हजार ४८२, तळोदा १० हजार १०६, धडगाव १ हजार १४ तर अक्कलकुवा तालुक्यात ६ हजार ३९० हेक्टरवर कापूस लागवड झाली आहे़
जिल्ह्यात आजअखेरीस १८ हजार ८१ हेक्टर क्षेत्रात भात़, ३० हजार ४७ हेक्टर क्षेत्रात ज्वारी़
३१ हजार ४५५ हेक्टरवर मका़
२१ हजार १४६ हेक्टर सोयाबीन पेरा पूर्ण झाला आहे़
धान्य आणि तेलबिया पिकांचे क्षेत्र वाढताना मात्र कडधान्य पिकांचे क्षेत्र घटले आहे़ १७ हजार हेक्टरव होणार तूर १० हजार, मूग ४ हजार तर उडीद ९ हजार ३२५ हेक्टरपर्यंत आहे़
जिल्ह्यात २ लाख ९५ हजार २१९ हेक्टरवर यंदा पेरण्यांचे नियोजन होते़ त्यातुलनेत आजअखेर २ लाख ८० हजार २०१ हेक्टर क्षेत्रात खरीप पेरण्या पूर्ण करण्यात झाल्या आहेत़ यात नंदुरबार ६७ हजार ८ हेक्टर, नवापूर ५५ हजार १७३, शहादा ७५ हजार ३६८, तळोदा २३ हजार ७४७, धडगाव १९ हजार ७२३ तर अक्कलकुवा तालुक्यात ३९ हजार ६८१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरण्या पूर्ण करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़