शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
2
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
3
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
4
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
5
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
6
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
7
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
8
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
9
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
10
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
11
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
12
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
13
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
14
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
15
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
16
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
17
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
18
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
19
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं
20
शेजाऱ्याशी लफडं, गुपित पतीला कळलं; प्रियकरासोबत मिळून पत्नीने केली हत्या, मृतदेह नदीत फेकला

युवा शेतकऱ्याने ऊस शेतीला फाटा देत काबुली हरभऱ्यातून मिळवले भरघोस उत्पन्न 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 12:30 IST

यशकथा : युवा शेतकऱ्याने या दोन्हीही पिकांना काबुली हरभऱ्याचा पारंपरिक पर्याय निवडला आहे. याद्वारे उत्पन्नात पूर्वीपेक्षा भरघोस वाढ करण्यात या युवा शेतकऱ्याला यश मिळाले आहे.

- युसूफमियाँ नदाफ ( पार्डी, जि. नांदेड )

अर्धापूर तालुक्यातील देळूब (बु.) गावाच्या शिवारात पाणी चांगले असून पूर्वी या गावात केळी, ऊस, हळद पीक मोठ्या प्रमाणात घेतले जायचे़ मात्र केळीवर येणारे रोग, गारपीट, वादळी वाऱ्यामुळे होणारे नुकसान तसेच उसाला लागणारे जास्तीचे पाणी, दरामधील तफावत, वाढता खर्च याला कंटाळून येथील एका युवा शेतकऱ्याने या दोन्हीही पिकांना काबुली हरभऱ्याचा पारंपरिक पर्याय निवडला आहे. याद्वारे उत्पन्नात पूर्वीपेक्षा भरघोस वाढ करण्यात या युवा शेतकऱ्याला यश मिळाले आहे.

तालुक्यात पाण्याची चांगली उपलब्धता असल्याने देळूब येथील युवा शेतकरी नूरखान युसूफजई पठाण यांनी मोठ्या प्रमाणावर काबुली हरभऱ्याची पेरणी केली आहे, ते अगोदर मोठ्या क्षेत्रावर केळी व ऊस घ्यायचे. अलीकडील काही वर्षांपासून सोयाबीन व मुख्य म्हणजे काबुली हरभरा पीक घेऊन त्यांनी शेतीची आर्थिक परिस्थिती बदलली आहे. गेल्या काही वर्षांपासून ४० ते ५० एकरावर काबुली हरभऱ्याची पेरणी करून त्याचे सुयोग्य व्यवस्थापन करून हे पीक यशस्वी केले आहे. केळी पूर्णपणे थांबवून उसाची लागवड कमी करून काबुली हरभऱ्याची मोठ्या प्रमाणात क्षेत्रात वाढ केली आहे 

नूरखान युसूफजई पठाण यांची संयुक्त कुटुंबाची सुमारे ५० एकर जमीन असून, ते केळी  व ऊस पीक घेत होते. मात्र, या पिकाच्या समस्यांमुळे ते कमी करून कमी कालावधीतील सोयाबीन व हरभरा या पारंपरिक हंगामी पिकांकडे ते वळले. खरिपातील सोयाबीन काढल्यानंतर लगेच काबुली हरभरा पेरला. हे त्यांचे सातवे वर्षे आहे. हा हरभरा या परिसरात आणला तो  त्यांनीच. पहिल्या वर्षी त्यांनी फक्त सहा एकरवर तो घेतला. त्याचे मिळणारे उत्पन्न व दर लक्षात घेऊन पुढील वर्षी जास्त क्षेत्र वाढवीत नेले़ 

हरभऱ्याला थंडी चांगली मानवत असल्याने लवकरच पेरणीला सुरुवात करावी लागते़ जमीन भारी सुपीक व कसदार असावी.  एकरी सुमारे ५५ किलो बियाणे लागते. दरवर्षी बियाणात बदल करावा.बियाण्यांवर रासायनिक बीज प्रक्रिया केल्यामुळे बियाणे बाद होण्याची शक्यता कमी असते. काबुली हरभऱ्याची पेरणी ट्रॅक्टरच्या साह्याने केली जाते. त्याच वेळी खताची पेरणी करावी. पेरणीच्या वेळी डीएपी खताचा वापर करावा तर पेरणीनंतर २० ते २२ दिवसांनी युरिया व पालाश खत दिला जातो.

पहिले पाणी पेरणीच्या वेळी, तर दुसरे २२ ते २५ दिवसांनी दिले जाते. त्यानंतर २५ दिवसांच्या अंतराने दोन सिंचन केले जातात. हरभऱ्याला कमी पाणी  लागत असल्याने तुषार संच फक्त चार तास चालवावा. काबुली हरभऱ्याचे घाटे एकदम टपोरे असतात. सुमारे चार वेळा तरी कीडनाशकाची फवारणी करावी लागते. गेल्या वर्षात ५० एकरमध्ये ७०० क्विंटल काबुली हरभरा झाला होता. त्याला ५४०० रुपये भाव मिळाला होता. हा भाव कमी मिळाला असला तरी खर्च व कमी कष्टामुळे  तो परवडल्याचे पठाण यांनी सांगितले.

टॅग्स :agricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरी