शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅक टू बॅक! उद्धव ठाकरे कणकवलीत सभा घेणार, दुसऱ्याच दिवशी राज यांचीही तोफ धडाडणार
2
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट
3
Narendra Modi : "काँग्रेस इथे मरतेय, तिकडे पाकिस्तान रडतंय; राजपुत्राला पंतप्रधान बनवण्यासाठी उतावीळ"
4
मोबाईलचोरामागे पोलीस धावला... टोळीने घेरलं... पाठीत इंजेक्शन टोचलं... उपचारादरम्यान मृत्यू
5
“शिवसेना-मनसेचा डीएनए एकच, विरोधकांकडे मुद्दे नाहीत म्हणून केवळ टीका सुरु”: श्रीकांत शिंदे
6
शरद पवार करतात ती स्ट्रॅटेजी आम्ही केली की गद्दारी? फोडाफोडीवरून अजित पवारांचा सवाल
7
Sunita Kejriwal : "...तर काय 10 वर्षे जेलमध्ये ठेवणार का?, ही हुकूमशाही"; सुनीता केजरीवाल यांचा संतप्त सवाल
8
जोरदार शक्तिप्रदर्शन, श्रीकांत शिंदेंचा उमेदवारी अर्ज दाखल; महायुतीच्या विकास रथावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
9
'मोदींनी तुम्हाला लायक समजलं नाही'; CM पदाची ऑफर होती म्हणणाऱ्या फडणवीसांना राऊतांचे प्रत्युत्तर
10
"माझ्या 40 वर्षांच्या आयुष्यात असं कधीच घडलं नाही", काँग्रेस प्रवक्त्या राधिका यांचा माजी मुख्यमंत्र्यांवर निशाणा
11
मालकीण-मोलकरणीचा जुळलेला अचूक 'योग', कसा आहे 'नाच गं घुमा?' वाचा
12
दिंडोरीत भाजपाला मोठा धक्का, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची बंडखोरी, अपक्ष निवडणूक लढवणार 
13
SPARC shares: १४ दिवसांपासून घसरत होता शेअर, ४९% नी आपटला; आता खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
14
उच्च कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका; रोजच्या आहारात करा आवश्यक बदल!
15
"अनंत गीतेंचे आयुष्य धर्माच्या नावाखाली निवडणूक लढण्यात गेले, ही निवडणूक भवितव्य घडवणारी"
16
'उर्दू भाषेसोबत अन्याय का?' संजय लीला भन्साळींची 'हीरामंडी'सीरिज पाहून भडकला शीजान खान
17
Fact Check: अधीर रंजन चौधरींनी भाजपाला मतदान करण्याचे आवाहन केलेले नाही! व्हायरल झालेला व्हिडीओ 'अर्धवट'!
18
तुम्हाला ‘श्री स्वामी समर्थ’ नामाचा अर्थ माहिती आहे का? प्रभावी मंत्र अन् सुखी जीवनाची वचने
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : उद्धव ठाकरेंकडूनच कोल्हापूरच्या गादीचा अपमान, उदय सामंत यांचा आरोप
20
सर्पदंशाने तरुणाचा मृत्यू; जिवंत करण्यासाठी मृतदेह दोन दिवस गंगेच्या पाण्यात लटकवला...

सिंचनाची कामे प्राधान्याने सोडविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2019 12:45 AM

गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़

ठळक मुद्देअशोकराव चव्हाण : सुधा प्रकल्पाच्या उंचीसह दिवशीचा प्रश्नही लागणार मार्गी

भोकर : गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़ यापुढेही जिल्ह्यातील सिंचनाची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेणार असून लवकरच सुधा प्रकल्पाची उंची, वाघु नदीवरील पिंपळढव प्रकल्प, दिवशी येथील साठवण तलाव आदी कामे मार्गी लागतील, असा विश्वास माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला.तालुक्याचा अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या सिंचनाच्या मागणीला शासनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र मिळाल्यानंतर माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी रावणगाव, पिंपळढव येथे बुधवारी नागरिकांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी मंचावर जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर, जि.प. सदस्य तथा कार्यक्रमाचे संयोजक बाळासाहेब रावणगावकर, जिल्हा सरचिटणीस संजय देशमुख लहानकर, जगदीश पाटील भोसीकर, उपसभापती सूर्यकांत बिल्लेवाड, गणेश राठोड, गुलाबराव चव्हाण, रामचंद्र मुसळे, बाबूराव सायाळकर, उज्ज्वल केसराळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.चव्हाण म्हणाले, तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना संबंधित विभागाकडून गोदावरी खोºयात पाणी उपलब्धता नसल्याचे कारण सांगितले जात होते. यावर वेळोवेळी शासनस्तरावर बैठका घेवून बाजू मांडून पाठपुरावा करण्यात आला.तसेच गोदावरी खोºयात शंभर टक्के साठवणूक होत नाही आणि २९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो अशी भूमिका मांडली़ नियोजन आणि जलव्यवस्थापन नाशिक यांनी हे म्हणणे मान्य करीत २० जून रोजी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देवून तालुक्यातील रेणापूर सुधा प्रकल्पाची १.१० मीटर उंची वाढविण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. यामुळे २ द.ल.घ.मी. पाणीसाठा वाढून १५० हेक्टर अधिक भाग सिंचनाखाली येणार आहे. तर पिंपळढव येथील वाघु नदीवरील प्रकल्पास मंजुरी मिळून १०७ चौरस किमी क्षेत्रात पाणी साठवण होवून ७०० हेक्टर शेती सिंचनाखाली येणार आहे तर दिवशी येथील प्रकल्पासही मंजुरी मिळाली आहे. उर्वरित पाकी येथील काळडोह साठवणतलाव व जाकापूर साठवण तलावाचाही मार्ग मोकळा झाला आहे.चव्हाण यांचा खासदार चिखलीकरांना टोलाआठ वर्षांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे सर्व शक्य झाले असून नवनिर्वाचित लोकप्रतिनिधी एका महिन्यातच याचे श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहेत. 'काल तूप खाल्लं आणि आज रुप आलं' असं होत नसतं, अशा शब्दात खा.चिखलीकर यांचे नाव न घेता चव्हाण यांनी त्यांना टोला लगावला. यावेळी आनंदराव पाटील, शंकरराव तोटेवाड, परमेश्वर वाघमारे, गिरीश कदम, वसंत जाधव, गंगाधर भोंबे, साईनाथ कोटुरवार आदी उपस्थित होते़माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी शासनाचे पाणी उपलब्धता प्रमाणपत्र सरपंच व नागरिकांना दिले़ तेव्हा ग्रामस्थांनी पिंपळढव परिसरातील वाघु नदीवर साठवण तलाव होणार असल्याच्या आनंदात पेढे वाटण्यात आले़

टॅग्स :NandedनांदेडIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्पAshok Chavanअशोक चव्हाणWaterपाणी