शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
2
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
3
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
4
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
5
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
6
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ
7
"सत्याचा मोर्चा नाही तर ढोंग्यांचा मोर्चा..."; मनसे-मविआच्या मोर्चाला गुणरत्न सदावर्तेंचा विरोध
8
१ नोव्हेंबरपासून 'हे' महत्वाचे नियम बदलणार; बँक खातेधारकांपासून ते सरकारी कर्मचाऱ्यांपर्यंत, सर्वांवरच परिणाम होणार!
9
मित्राने 'नाईस डीपी' म्हणून मेसेज पाठवला, संतप्त पतीने महिला डॉक्टरच्या डोक्यात खलबत्ता मारला, बलापूरमधील धक्कादायक घटना
10
Bacchu Kadu Morcha: रस्त्यावर उतरत सरकारची कोंडी; बच्चू कडू यांच्या प्रमुख मागण्या कोणत्या?
11
Laura Wolvaardt Century : लॉराचा शतकी तोरा! वर्ल्ड कपमध्ये मिताली राजच्या वर्ल्ड रेकॉर्डची बरोबरी
12
जिल्हाधिकाऱ्यांना मुख्य सचिव बनून केला फोन, दिले असे आदेश, पिता-पुत्रासह तिघांना अटक, असं फुटलं बिंग
13
हॉटेलमध्ये आलेल्या 'त्या' डॉक्टर तरूणीची अवस्था काय होती?; मालकाने सांगितला घटनाक्रम
14
२९ वर्षांपूर्वीचे रेखा-काजोलचे आयकॉनिक फोटोशूट नीसा आणि ओरीने केले रीक्रिएट; सोशल मीडियावर खळबळ!
15
'ट्रम्पने 50 वेळा मोदींचा अपमान केला, तरीही मोदी गप्प; इंदिरा गांधींसारखे धाडस हवे'- राहुल गांधी
16
UP: योगी सरकारच्या धोरणांमुळे विमान वाहतुकीत विक्रमी वाढ!
17
सलमान खान स्वत: 'बिग बॉस'चे सगळे एपिसोड्स बघतो का? अखेर निर्मात्यांनी केला खुलासा
18
बायकोचा खून करून घरात रचला चोरीचा बनाव, पण पतीच्या एका चुकीमुळे झाला 'भांडाफोड'...
19
IPO ची वाटही पाहिली नाही! देशातील सर्वात मोठ्या म्युच्युअल फंडने Lenskart ला दिला ₹100 कोटींचा चेक
20
13 दिवसांनंतर सोनं १३०९ नं महागलं, चांदीही ३८३२ नं वधारली, पुन्हा विक्रमी पातळीव पोहोचणार गोल्ड? काय म्हणतात एक्सपर्ट?

देशात आरडीएक्स आलं कुठून? राज ठाकरेंचा मोदींना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:54 IST

सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला. त्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स देशात आलं कुठून याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं.

नांदेड - काँग्रेस सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा नरेंद्र मोदी विरोधात असताना म्हणत होते आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवणं सरकारची जबाबदारी असते. देशात आरडीएक्स आलं कुठून असा सवाल तुम्ही विचारत होता. आज तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला. त्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स देशात आलं कुठून याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये विचारला. गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा नांदेडमध्ये पार पडत आहे. 

यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की,  मी ४ वर्षांपूर्वी बोललो होतो की निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. ते आज खरं ठरतंय. बालाकोट हवाई हल्ल्यात शत्रू राष्ट्राचे किती सैनिक मारले गेले ह्याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडे पण नाहीत पण अमित शाह म्हणाले २५० माणसं मारली गेली. अमित शाहना कुठून मिळाला हा आकडा? देशाच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आणि त्यांचा अभिमान आहे मात्र कुठे बॉम्ब टाकायचा असतो यासाठी विमानं प्रोग्रॅम्ड असतात, पायलट बघत नसतो, वैमानिकांना चुकीची माहिती दिली असा आरोप राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर केला. 

भारतीय जनता पक्षाचे एक नेते म्हणतात की, सैन्याच्या कारवाईचे पुरावे जरी शहिदांच्या नातेवाईकांनी मागितले तर ते देशद्रोही आहेत. योदी आदित्यनाथ आपल्या सैन्याला 'मोदी सेना' म्हणतात, सरकार जवानांना वापरुन घेत आहेत. परवा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले तेव्हाही मोदींनी शहीद जवानांचा वापर करत लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. हेच भाजपाचे राजकारण आहे असा आरोप राज यांनी केला. 

संपूर्ण बहुमताचं सरकार देशाने मोदींच्या हातात दिलं पण त्यांनी काय केलं? नोटबंदी आणली, आधी एफडीआयला विरोध केला आता एफडीआय आणलं, जीएसटीला विरोध केला आणि आता जीएसटी आणून छोट्या व्यापारांच कंबरडं मोडलं. मोदी फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधींबद्दल बोलत आहेत. बेरोजगार तरुणांबद्दल कधी बोलणार? महिला सुरक्षेबद्दल कधी बोलणार? शेतकरी आत्महत्येबद्दल कधी बोलणार? असाही सवाल राज यांनी मोदींना केला.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019