शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

देशात आरडीएक्स आलं कुठून? राज ठाकरेंचा मोदींना सवाल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 19:54 IST

सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला. त्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स देशात आलं कुठून याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं.

नांदेड - काँग्रेस सरकार जेव्हा सत्तेत होतं तेव्हा नरेंद्र मोदी विरोधात असताना म्हणत होते आपल्या देशाची सीमा सुरक्षित ठेवणं सरकारची जबाबदारी असते. देशात आरडीएक्स आलं कुठून असा सवाल तुम्ही विचारत होता. आज तोच प्रश्न मी तुम्हाला विचारतो. सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर जो हल्ला झाला. त्यात देशाचे 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यात वापरण्यात आलेलं आरडीएक्स देशात आलं कुठून याचं उत्तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावं असा प्रश्न मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नांदेडमध्ये विचारला. गुढीपाडवा मेळाव्यानंतर राज ठाकरे यांची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पहिली सभा नांदेडमध्ये पार पडत आहे. 

यावेळी बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की,  मी ४ वर्षांपूर्वी बोललो होतो की निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करतील. ते आज खरं ठरतंय. बालाकोट हवाई हल्ल्यात शत्रू राष्ट्राचे किती सैनिक मारले गेले ह्याचा आकडा हवाई दलाच्या प्रमुखांकडे पण नाहीत पण अमित शाह म्हणाले २५० माणसं मारली गेली. अमित शाहना कुठून मिळाला हा आकडा? देशाच्या सैन्यावर पूर्ण विश्वास आणि त्यांचा अभिमान आहे मात्र कुठे बॉम्ब टाकायचा असतो यासाठी विमानं प्रोग्रॅम्ड असतात, पायलट बघत नसतो, वैमानिकांना चुकीची माहिती दिली असा आरोप राज ठाकरेंनी केंद्र सरकारवर केला. 

भारतीय जनता पक्षाचे एक नेते म्हणतात की, सैन्याच्या कारवाईचे पुरावे जरी शहिदांच्या नातेवाईकांनी मागितले तर ते देशद्रोही आहेत. योदी आदित्यनाथ आपल्या सैन्याला 'मोदी सेना' म्हणतात, सरकार जवानांना वापरुन घेत आहेत. परवा नरेंद्र मोदी महाराष्ट्रात आले तेव्हाही मोदींनी शहीद जवानांचा वापर करत लोकांना मतदान करण्याचं आवाहन केलं. हेच भाजपाचे राजकारण आहे असा आरोप राज यांनी केला. 

संपूर्ण बहुमताचं सरकार देशाने मोदींच्या हातात दिलं पण त्यांनी काय केलं? नोटबंदी आणली, आधी एफडीआयला विरोध केला आता एफडीआय आणलं, जीएसटीला विरोध केला आणि आता जीएसटी आणून छोट्या व्यापारांच कंबरडं मोडलं. मोदी फक्त पंडित नेहरू, इंदिरा गांधींबद्दल बोलत आहेत. बेरोजगार तरुणांबद्दल कधी बोलणार? महिला सुरक्षेबद्दल कधी बोलणार? शेतकरी आत्महत्येबद्दल कधी बोलणार? असाही सवाल राज यांनी मोदींना केला.   

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMNSमनसेRaj Thackerayराज ठाकरेNarendra Modiनरेंद्र मोदीnanded-pcनांदेडMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019