शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

काय केले जाते ‘हॅप्पी व्हिलेज’मध्ये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:58 IST

६ ते ८ जणांचा चमू गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबियांकडून ध्यानधारणा करून घेतो. मागील दीड महिन्यात २० वर्षांवरील ६५० हून अधिक ग्रामस्थांना आणापान देण्यात आले आहे.

नांदेड : दर रविवारी डॉ. संग्राम जोंधळे सुमारे शंभरवर प्रशिक्षित साधकांसह कावलगाव येथे जातात. प्रारंभी गावातील सार्वजनिक सभागृहात सर्व साधकांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी १० मिनिटे ध्यानधारणा करून नियोजन करतात. त्यानंतर ६ ते ८ जणांचा चमू गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबियांकडून ध्यानधारणा करून घेतो. मागील दीड महिन्यात २० वर्षांवरील ६५० हून अधिक ग्रामस्थांना आणापान देण्यात आले आहे. याबरोबरच १० ते १९ या वयोगटातील जयकिसान शाळेतील दीड हजार आणि कावलगावच्या जिल्हा परिषद शाळेतील सुमारे २०० विद्यार्थ्यांचे शिबीर घेण्यात आले. आता गावातील प्रत्येक कुटुंब स्वत:हून ध्यानधारणा करीत आहे.

परिणाम काय?उपक्रमाच्या दीड महिन्यातच ध्यानधारणेमुळे आपलेपणाची भावना वाढल्याचे ग्रामस्थ सांगतात. अनेक वर्षांच्या व्यसनालाही काहींनी मूठमाती दिली आहे. गावातील चौघांचे तंबाखूचे, तर तिघांचे दारूचे व्यसन सुटण्यास मदत मिळाली आहे. ध्यानधारणेमुळे पूर्वीच्या तुलनेत आनंद, उत्साह अधिक वाढला असून, आमची सुखाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

 

व्यसनाच्या पदार्थामुळे मनामध्ये संवेदना निर्माण होऊन त्याची आसक्ती होते आणि ती संवेदना वारंवार हवी वाटते. विपश्यनेमध्ये संवेदनेवर तटस्थपणे बघण्याचा अभ्यास केला जातो. ध्यानामुळे संवेदनेचा अनित्य स्वभाव कळतो आणि त्यानंतर त्या प्रतीची आसक्तीही कमी होते. -डॉ. संग्राम जोंधळे, प्रकल्पप्रमुख, हॅप्पी व्हिलेज

दर रविवारी घरोघरी जाऊन आम्ही कुटुंबियांकडून ध्यानधारणा करुन घेतो. यामुळे गावातील तंटे कमी झाले आहेत. याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. महिलावर्गाचा याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. -उषाताई गायकवाड (परिचारिका, आरोग्य केंद्र)

पहिल्या दिवसापासून या उपक्रमामध्ये मी सहभागी आहे. उपक्रमापासून गावातील वातावरण बदलले आहे. एकमेकांचा द्वेष करण्याऐवजी समजून घेण्याकडे कल वाढला आहे. दररोज काही मिनिटासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबाच्या वागण्या-बोलण्यावरही जाणवतो आहे. - सुकेशनी बि-हाडे (ग्रामस्थ, कावलगाव)

कावलगाव येथील हॅपी व्हिलेज संकल्पनेत सक्रीय सहभाग आहे. आता जिल्ह्यातील इतर गावचे पदाधिकारीही उपक्रम राबविण्याची विनंती करीत आहेत. प्रा. प्रशांत गायकवाड (तज्ज्ञ प्रशिक्षक, विपश्यना)

ध्यानधारणेचा सकारात्मक परिणाम जाणवतो आहे, हे लक्षात येवू लागल्याने ग्रामस्थही रविवारी या साधकांची वाट पाहतात. - बालाजी वाघमारे (सरपंच, कावलगाव)

आनंदाचे मोजमाप‘न्युरोबिक’ उपकरणाच्या माध्यमातून शास्त्रीयदृष्ट्या सुखाच्या स्तराचे मोजमाप करण्यात आले. सध्या दोन हजार गावकऱ्यांच्या या माहितीचे सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण आणि वर्गीकरण करण्यात येतआहे. आणखी साधारण दहा महिने तेथे आम्ही हा उपक्रम राबविणार आहोत. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंद-सुखाचे वरील दोन्ही प्रकारे पुन्हा मोजमाप करण्यात येईल. पुढील टप्प्यात मेंदूचा आलेख (ईईजी) आणि रक्तातील तणाव निर्माण करणारे घटक यांचा अभ्यास करण्याचे नियोजन असल्याची माहिती डॉ. जोंधळे यांनी दिली.

आज माझ्या कुटुंबातील सुमारे १० ते १२ जण दररोज सकाळी ध्यानधारणा करतात. प्रत्येक घरात हा उपक्रम सुरू असून यामुळे गावात एकमेकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. - मारोतीराव पिसाळ, उपसरपंच

मला अनेक वर्षांपासून तंबाखूचे व्यसन होते. मी दररोज सकाळी १० ते १५ मिनिटे ध्यानधारणा आणि विपश्यना सुरु केल्यानंतर माझे मलाच आपण तंबाखू खातो ते चुकीचे आहे, हे पटले. आता या व्यसनापासून मी मुक्त झालो आहे. - निवृत्तीराव देशमुख, साधक

दर रविवारी घरोघरी जाऊन आम्ही कुटुंबियांकडून ध्यानधारणा करुन घेतो. यामुळे गावातील तंटे कमी झाले आहेत. याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. महिलावर्गाचा याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. -उषाताई गायकवाड (परिचारिका, आरोग्य केंद्र)

टॅग्स :NandedनांदेडparabhaniपरभणीMeditationसाधना