शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

काय केले जाते ‘हॅप्पी व्हिलेज’मध्ये?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:58 IST

६ ते ८ जणांचा चमू गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबियांकडून ध्यानधारणा करून घेतो. मागील दीड महिन्यात २० वर्षांवरील ६५० हून अधिक ग्रामस्थांना आणापान देण्यात आले आहे.

नांदेड : दर रविवारी डॉ. संग्राम जोंधळे सुमारे शंभरवर प्रशिक्षित साधकांसह कावलगाव येथे जातात. प्रारंभी गावातील सार्वजनिक सभागृहात सर्व साधकांसह आरोग्य विभागाचे कर्मचारी १० मिनिटे ध्यानधारणा करून नियोजन करतात. त्यानंतर ६ ते ८ जणांचा चमू गावातील प्रत्येकाच्या घरी जाऊन कुटुंबियांकडून ध्यानधारणा करून घेतो. मागील दीड महिन्यात २० वर्षांवरील ६५० हून अधिक ग्रामस्थांना आणापान देण्यात आले आहे. याबरोबरच १० ते १९ या वयोगटातील जयकिसान शाळेतील दीड हजार आणि कावलगावच्या जिल्हा परिषद शाळेतील सुमारे २०० विद्यार्थ्यांचे शिबीर घेण्यात आले. आता गावातील प्रत्येक कुटुंब स्वत:हून ध्यानधारणा करीत आहे.

परिणाम काय?उपक्रमाच्या दीड महिन्यातच ध्यानधारणेमुळे आपलेपणाची भावना वाढल्याचे ग्रामस्थ सांगतात. अनेक वर्षांच्या व्यसनालाही काहींनी मूठमाती दिली आहे. गावातील चौघांचे तंबाखूचे, तर तिघांचे दारूचे व्यसन सुटण्यास मदत मिळाली आहे. ध्यानधारणेमुळे पूर्वीच्या तुलनेत आनंद, उत्साह अधिक वाढला असून, आमची सुखाच्या दिशेने वाटचाल सुरू झाल्याच्या भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

 

व्यसनाच्या पदार्थामुळे मनामध्ये संवेदना निर्माण होऊन त्याची आसक्ती होते आणि ती संवेदना वारंवार हवी वाटते. विपश्यनेमध्ये संवेदनेवर तटस्थपणे बघण्याचा अभ्यास केला जातो. ध्यानामुळे संवेदनेचा अनित्य स्वभाव कळतो आणि त्यानंतर त्या प्रतीची आसक्तीही कमी होते. -डॉ. संग्राम जोंधळे, प्रकल्पप्रमुख, हॅप्पी व्हिलेज

दर रविवारी घरोघरी जाऊन आम्ही कुटुंबियांकडून ध्यानधारणा करुन घेतो. यामुळे गावातील तंटे कमी झाले आहेत. याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. महिलावर्गाचा याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. -उषाताई गायकवाड (परिचारिका, आरोग्य केंद्र)

पहिल्या दिवसापासून या उपक्रमामध्ये मी सहभागी आहे. उपक्रमापासून गावातील वातावरण बदलले आहे. एकमेकांचा द्वेष करण्याऐवजी समजून घेण्याकडे कल वाढला आहे. दररोज काही मिनिटासाठी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र येतात. त्याचा सकारात्मक परिणाम कुटुंबाच्या वागण्या-बोलण्यावरही जाणवतो आहे. - सुकेशनी बि-हाडे (ग्रामस्थ, कावलगाव)

कावलगाव येथील हॅपी व्हिलेज संकल्पनेत सक्रीय सहभाग आहे. आता जिल्ह्यातील इतर गावचे पदाधिकारीही उपक्रम राबविण्याची विनंती करीत आहेत. प्रा. प्रशांत गायकवाड (तज्ज्ञ प्रशिक्षक, विपश्यना)

ध्यानधारणेचा सकारात्मक परिणाम जाणवतो आहे, हे लक्षात येवू लागल्याने ग्रामस्थही रविवारी या साधकांची वाट पाहतात. - बालाजी वाघमारे (सरपंच, कावलगाव)

आनंदाचे मोजमाप‘न्युरोबिक’ उपकरणाच्या माध्यमातून शास्त्रीयदृष्ट्या सुखाच्या स्तराचे मोजमाप करण्यात आले. सध्या दोन हजार गावकऱ्यांच्या या माहितीचे सॉफ्टवेअरद्वारे विश्लेषण आणि वर्गीकरण करण्यात येतआहे. आणखी साधारण दहा महिने तेथे आम्ही हा उपक्रम राबविणार आहोत. त्यानंतर शेवटच्या टप्प्यात गावातील प्रत्येक व्यक्तीच्या आनंद-सुखाचे वरील दोन्ही प्रकारे पुन्हा मोजमाप करण्यात येईल. पुढील टप्प्यात मेंदूचा आलेख (ईईजी) आणि रक्तातील तणाव निर्माण करणारे घटक यांचा अभ्यास करण्याचे नियोजन असल्याची माहिती डॉ. जोंधळे यांनी दिली.

आज माझ्या कुटुंबातील सुमारे १० ते १२ जण दररोज सकाळी ध्यानधारणा करतात. प्रत्येक घरात हा उपक्रम सुरू असून यामुळे गावात एकमेकांमध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. - मारोतीराव पिसाळ, उपसरपंच

मला अनेक वर्षांपासून तंबाखूचे व्यसन होते. मी दररोज सकाळी १० ते १५ मिनिटे ध्यानधारणा आणि विपश्यना सुरु केल्यानंतर माझे मलाच आपण तंबाखू खातो ते चुकीचे आहे, हे पटले. आता या व्यसनापासून मी मुक्त झालो आहे. - निवृत्तीराव देशमुख, साधक

दर रविवारी घरोघरी जाऊन आम्ही कुटुंबियांकडून ध्यानधारणा करुन घेतो. यामुळे गावातील तंटे कमी झाले आहेत. याबरोबरच प्राथमिक आरोग्य केंद्रात येणा-या रुग्णांचे प्रमाणही कमी झाले आहे. महिलावर्गाचा याला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. -उषाताई गायकवाड (परिचारिका, आरोग्य केंद्र)

टॅग्स :NandedनांदेडparabhaniपरभणीMeditationसाधना